Skip to main content

अनुशेषाचा मुक्तीसंग्राम

लेखक pradnya deshpande यांनी बुधवार, 16/09/2015 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
अनुशेषाचा मुक्तीसंग्राम मुक्तीसाग्राम काही कामानिमित्ताने भोपाळ येथे एका परिषदेसाठी गेले असता आप मराठवाडासे आए हो ना? जहा शेतकरी आत्महत्या करते है असा प्रश्न एकाने विचारला तेव्हा रझाकारांशी झुंजणारा मराठवाडा या ओळखीपेक्षा शेतकरी आत्महत्या करणारा अशी नकोशी ओळख देशपातळीवर मराठवाड्याची झाली असल्याची जाणीव झाली. निजामाच्या जोखडातून १७ सप्टेंबर १९४७ रोजी मराठवाडा मुक्त झाला.

अकबर - बिरबल (मेहुण्याची शिफारस)

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 16/09/2015 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
[दृश्य : अकबराच्या लाडक्या बेगमच्या महालातील सुंदर शयनकक्ष. बेगम अकबर बादशाची वाट पाहत पलंगावर फळांचे ताट समोर ठेऊन त्यातील सफरचंद चाकूने कापीत आहे.

भवताल

लेखक शिवोऽहम् यांनी बुधवार, 16/09/2015 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
नवं घर भर रहदारीच्या रस्त्यापासुन म्हटलं तर आत, म्हटलं तर जवळ असं होतं. किल्ल्याचे बुरूज असावे तशा दोन दुमजली इमारती रस्त्यावर तोंड करून उभ्या होत्या, त्यांच्या मधून घराच्या आवारात येणारी वाट होती. घराच्या आजुबाजुला लहानमोठे कारखाने, शेजारी मुन्सिपाल्टीची बंद होऊ घातलेली एक सुस्त शाळा, समोर वेगवेगळी दुकानं, डोक्यावर एक लोकप्रिय इस्पितळ आणि मागच्या बाजुला जरा लांबवर दिसणारं मुसलमानांचं कब्रस्तान असं सेटिंग होतं सगळं. शिवाय समोरचा रस्ता ओलांडला की ख्रिश्चन मिशनचे कंपाऊंड. त्यामुळे सर्व थरातल्या लोकांचा राबता त्या भागात असे.

हि चिकन थाळी कोणची ?

लेखक माहितगार यांनी बुधवार, 16/09/2015 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
१) गेल्या मे महिन्यातील 'खाद्यपदार्थ छायाचित्र चढवा' अभियाना दरम्यान खालील छायाचित्र विकिमीडिया कॉमन्सवर कुणीतरी चढवले. त्यांनी चित्र संचिकेस (फाईलला) नाव Gavara Chicken Bhakari.jpg असे दिले आहे. यातील Gavara हे 'गावरान'चे त्रुटीयूक्त लेखन असेल का ? कि गावरा/गवारा नावाचा काही चिकन प्रकार महाराष्ट्रात आहे आणि आज पर्यंत ऐकण्यात नाही ? हा वेगळा पदार्थ असेल तर कुणी रेसिपी देऊ शकेल का ? २) छायाचित्रातील पांढरा वर्ख असलेला पदार्थ कोणता असेल ? खिर असण्याची शक्यता आहे का ?

"आणि मग एके दिवशी.." (नसीरुद्दिन शाहचे आत्मचरित्र)

लेखक चलत मुसाफिर यांनी बुधवार, 16/09/2015 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
नटनट्यांची आत्मचरित्रे म्हटली की ती खमंग मसालेदार गॉसिपने भरलेली असणार असा एक रूढ समज आहे. काही अंशी तो खरा असेलही. पण त्याच्याशी फक्त अभिनेता असण्या-नसण्याचाच संबंध नसतो. प्रामाणिकपणा आणि वाचनीयता हे दोन गुण कोणत्याही आत्मचरित्रात असावे लागतात आणि सगळ्यांना ते जमत नाही. परिणामी ती रटाळ, नीरस आणि लबाड होऊन जातात. खासकरून राजकीय नेत्यांची आत्मचरित्रे. सत्यकथनाची हिम्मत नसेल तर फिल्मी आत्मचरित्रेही "फ्लॉप" होऊ शकतात. उदा. देव आनंदचे 'Romancing The Life' हे पुस्तक. ही त्याच्या आयुष्यातील अगोदरच सर्वविदीत असलेल्या घटनांची निव्वळ जंत्री आहे. लहानपणीचा काही काळ वगळता नवे हाती काहीच लागत नाही.

एक पाकळी दुभंगलेली

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 16/09/2015 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
वटवृक्षाला बहर आला होता. लाल लाल कळ्यांचा गंध वातावरणात दरवळत होता. कित्येक भ्रमर त्या गंधाला हुंगत कळ्यांपर्यंत पोहोचायचे. शेवंता त्या वटवृक्षाखाली बसायची. जमीनीवर पडलेली एखादी कळी ऊचलायची. कधी डोक्यात सजवायची, कधी पुस्तकात ठेवायची, तर कधी त्याला खाऊनच टाकायची. एक म्हातारा शेजारच्या मंदिराच्या पायरीवर बसुन येणाऱ्या-जाणाऱ्याला चहा-पानाला पैसे मागायचा. शेवंता खेळत हुंदडत या म्हाताऱ्यापाशी यायची. म्हातारा तिला बिडी-काडी आणायला पैसे द्यायचा, तिच्या गोळ्या-बिस्किटांचा हिस्सा त्यात ठरलेला. म्हाताऱ्यानं तिला लळा लावलेला.

वैराग्याकडे पाउले

लेखक शेखरमोघे यांनी बुधवार, 16/09/2015 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
छंद लावला, जोपासला जोपासला वेल, बाग लावला, फुलवला, वाढवला पक्षी आले, आनंदले, वसले, वाढले सर्वां जसे नंदनवनच मिळाले पण आता … नद्या, तळी, निर्झर आटले, टिपूसभर पाणी मिळेनासे झाले आज जरी पक्षांना उडवून घालवले, अखेरचे बागेत पाणी शिंपले, तरी डोळा टिपूस न आले, हीच का वैराग्याकडे पाउले?
काव्यरस

कुमाऊं - पूर्वतयारी

लेखक के.के. यांनी मंगळवार, 15/09/2015 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्का मित्रहो, मिपावर (किंवा कुठेही) लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.

विक्री गीत

लेखक भिंगरी यांनी मंगळवार, 15/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
अंताक्षरी झाली खेळून. आता नविन काहीतरी करूया. बर्‍याच चित्रपटात एखाद्या वस्तुची विक्री गाणे म्हणत केली जाते.चला तर मग अशी गाणी शोधुया सुरुवात नारळाने करू...... लेलो रे लेलो बाबू पीलो नारीयल पानी इस गर्मी आ अपनी प्यास बुझालो लेलो रे लेलो बाबू पीलो नारीयल पानी
काव्यरस

दुःख

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 15/09/2015 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
'देवा मी काही चुकलो असेल तर मला माफ कर,' असे राजू परमेश्वरा कडे रोज प्रार्थना करीत पण परमेश्वर काही त्याला  पावत नव्हता. आज त्याचे शिक्षण पुर्ण झाले असले तरी तो स्वतःच्या पायावर उभा नव्हता , राजू  लहान असतानाच त्याचे वडील मरण पावले ,मग त्याची आई बाहेर घरची कामे करून त्याला व दिपा ला लहानाचे मोठे केले व शाळा शिकवले. पण आता त्याची आई थकलेले होती , घर चालण्यास पुरेसे पैसे मिळत नव्हते , लवकरच दिपा च लग्न करायचे होते, आशा अनेक समस्यांशी तो लढत होता.पण त्याला जाॅब मिळत नव्हता , तो या अपयशाने  खचून जात होता, शेवटी तो परमेश्वरा ला दोष देत.