रांजण खळगी
पुण्यापासून अंदाजे 80 किमी वर आहे अहमदनगर जिल्हयातील टाकळी हाजी व निघोज हे गाव. आणी ह्या दोन गावांच्या दरम्यान आहेत आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक रित्या तयार झालेली खळगी (रांजण खळगी) ज्याची नोंद ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहेत. बरीच वर्ष जाऊ जाऊ करत होतो पण इथे जाणे काही होत न्हवते. शेवटी मे महिन्यात अचानक एके दिवशी गेलो बघायला.
शेकडो वर्षे कुकडी नदीच्या पाण्यातून येणारे दगड गोटे ह्या नदीपात्रातील बसाल्ट खडकावरून 'वर्तुळाकार पद्धतीने' फिरल्याने ही सर्व खळगी तयार झाली असावीत असा भूगर्भ शास्त्रन्यांचा कयास आहे. ही क्रिया सतत चालूच असल्याने खळग्यान्चा आकार वाढतच चालला आहे.
॥सांगा तुकारामा : अभंग-२॥
॥सांगा तुकारामा : अभंग-२॥
तुझ्या विठ्ठलाचा । कैसा दुजाभाव ।
चारीमुंड्या गाव । चीत केले ॥१॥
रानातलं पाणी । उद्योगानं नेलं ।
उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥
धरणाचा साठा । शॉवरात गेला ।
तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥
इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं ।
धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥
तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ ।
माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥
इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
गढुळाचे धनी । गावकरी ॥६॥
तुझ्या विठ्ठलाचा । कैसा दुजाभाव ।
चारीमुंड्या गाव । चीत केले ॥१॥
रानातलं पाणी । उद्योगानं नेलं ।
उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥
धरणाचा साठा । शॉवरात गेला ।
तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥
इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं ।
धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥
तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ ।
माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥
इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
गढुळाचे धनी । गावकरी ॥६॥
काव्यरस
काही क्षणिका - स्त्री
(१)
वस्त्रांत देह स्त्रीचा
पुरुषांनी गुंडाळला.
भोगदासी झाली स्त्री
त्या क्षणापासूनच.
(२)
पद्मिनीने म्हणे
चितेत उडी घेतली.
आगीत वासनेच्या
नाही ती जाळली.
(३)
देह वासनेचा
अग्नीत हा जाळला
उरले फक्त आता
अमर प्रेम तराणे.
काव्यरस
लिंब, धोम, भोगावमधील काही क्षण
मध्यंतरी भुईंजनजीकच्या किकलीगावात तिथले अप्रतिम कोरीवकाम असलेले भैरवनाथाचे मंदिर आणि शेदीडशे वीरगळ पाहिलेले होते. त्याच दिवशी नंतर शेरी लिंब येथील बारा मोटेची विहिर आणि धोम-भोगावची पण सफर झाली होती त्याची ही चित्रमय झलक.
वाटेवरच्या लिंब गोवे गावातील दुर्लक्षित वीरगळ
लिंबची विहिर पहिल्या शाहूमहाराजांच्या पत्नी वीरूबाई ह्यांनी बांधवून काढली. ह्या विहिरीचे पाणी आजही वापरात आहे.
१२ मोटेच्या विहिरीचं प्रथमदर्शन.
जन का म्हणतिल, 'हाय हाय !'????
जन का म्हणतिल, 'हाय हाय !'????
केलेच नाही तर राहिल कार्य काय ?
.
पोस्टा तळपतिल, फोटु झळकतिल;
फेसबुके अपुला क्रम आचरतिल,
असेच वाद संवाद पुढे चालतिल,
नसशी तु फरक पडेल का?
.
वाद वर्षतिल, डोके पिकतिल,
गेट टुगेदर हे जोरात चालतिल
कुणा काळजी की न तळतिल,
पुन्हा जिलब्यांचे हे घाणे?
.
सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा लेख कविता लिहितिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
तु सोडले फेसबुक त्यांचे काय जाय ?
.
अभासी जगास्तव काय कुढावे !
मोहिं लाईक्स च्या का गुंतावे ?
डोके पिकवुनी का विन्मुख व्हावे ?
ख-या जगतातील आनंदास???
अक्का महादेवी, कर्नाटकाची संत मीरा ?
ज्यांची मने अध्यात्म अथवा स्त्रीमुक्ती पैकी कशानेही दुखावतात अशांनी पुढे वाचले नाही तरीही चालेल.
*** (मर्त्य मानवी नवरे तुझ्या चुलीत घाल !) ***
Like treasure hid in the ground,
like flavour in the fruit,
like gold in the rock and oil in the seed,
the Absolute is hidden in the heart.
I love the Handsome One:
he has no death
decay or form
no place or side
no end nor birthmarks.
I love him O mother.
॥सांगा तुकारामा : अभंग-१॥
॥सांगा तुकारामा : अभंग-१॥
ठेविले अनंते । तैसे कैसे राहू ।
तूच सांग पाहू । तुकोराया ॥१॥
इथे मंबाजीचे । सत्तांध वारस ।
माझे गळी फास । टाकताहे ॥२॥
आयातुनी माल । शत्रू देशातला ।
माझ्या सृजनाला । बुडविती ॥३॥
माझ्या निर्यातीची । वाट अडविती ।
जागोजागी भिंती । उभारुनी ॥४॥
गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? ।
त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥
लबाडीला चांदी । ऐद्यांना अभय ।
काव्यरस
सौदा
- डॉ. सुधीर रा. देवरे
(इयत्ता नववीत असताना लिहिलेली कथा. त्यावेळी आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारीत झाली होती. कोणताही बदल न करता ब्लॉग म्हणून देत आहे.)
शंकुतलाबाई चुलीजवळ स्वयंपाकात गुंतल्या होत्या. मध्येच काहीतरी उणीव भासल्यामुळे कृष्णाला शेजारी पाजारी पिटाळून मागवून घेत होत्या. आईने सांगितलेल्या वस्तुंची कृष्णा जुळवाजुळव करत होता.
रामचंद्र पाटील ओसरीत उठ बस करीत सारख्या भिंती न्याहाळत होते. एका कोपर्यातली खुर्ची दुसर्या कोपर्यात बसवून सजावट करीत होते. घराचे पडदे नीट लावत होते.
रमन राघव २.०
सामान्यतः समाजात चांगली आणि वाईट अशा दोन प्रव्रुत्तीची माणसं असतात असं मानतात. दोन्ही प्रव्रुत्तींचे रंग ही ठरलेले.....चांगल्यासाठी सफेद तर वाईटासाठी काळा. एवढ साध सरळ सोप असुनही आपण वर्गिकरण करण्यात चुकतो... बर्याच वेळा समोर असणारी व्रुत्ती ही फक्त चांगली वा वाईट एवढ्याच फरकात बसवता येत नाही किंबहुना ते ओळखणही खूप कठीण असतं. चांगला आणि वाईट, सफेद आणि काळा हे दोन्ही रंग जिथे एकमेकांना भिडतात तिथे अजुन एक छटा निर्माण होते....करडी(ग्रे शेड). कदाचित समोर दिसणारं करड्या छटेतलंही असु शकेल. काही प्रव्रुत्त्या, काही माणसं या ही छटेतली असतात...असु शकतात. समोर दिसणार तेवढच खर अस बर्याच वेळा नसतं.
मिसळपाव