मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका मधमाशीचं प्रेत

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या आजोबांच्या शेतात एक मोठ्ठं फणसाचं झाडं होतं.बरेच पक्षी निरनिराळ्या फांद्यांवर घरटी बांधून रहायचे.एका उंच फांदीवर एक मोठं मधमाशांचे पोळं होतं.पण आणखी काही फांद्यांवर लहान लहान पोळी होती. ज्याजावेळेला मध काढून घेण्यासाठी लोक यायचे तेव्हा मी शेतातून कुठेतरी लांब जात असे. मला असं वाटतं की मधमाश्या मारल्या जाऊ नयेत. जेव्हा या उडणाऱ्या मधमाशीसारख्या कीटकांपैकी एखाद्याच्या बाह्यांगावर चिरडण्याचा दाब पाडला जातो हे मी पाहतो तेव्हा मला माझ्या पोटात गोळा आल्याचं जाणवतं.

आई घरात असतां घर,घरासम भासले

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
क्षीण आवाज ऐकून किती पहारे ठेवावे आजचा श्रावण पाहून किती चेहरे रंगवावे आई घरात असतां, घर घरासम भासले आता मुलांनी,घराचे बहूत विभाग केले आशेचे खूले गगन अमूचे बाबा होते आता सगळे स्वप्न हळुवार भंग झाले सर्व नातीगोती तुकडे तुकडे होऊन विभागली कुणास ठाउक दुःख्खें किती हिश्शात विभागली एक नियम नाही हर एका मध्ये हर रूपांवर दुसरे रूप विभागले आई घरात असतां घर,घरासम भासले

एकटेपणा

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एकटेपणा काल मी आणि प्रो. देसाई दोघेच तळ्यावर आलो होतो.मी त्यांना गप्पांच्या ओघात विचारलं, “भाऊसाहेब,इंग्रजीत “Live me alone “ असं एखादा एखाद्याला म्हणतो. बरेच वेळेला वृद्धावस्थेत एकाकी पडून रहाण्याचा कल असतो. पण करत्या-सवरत्या वयात तुम्हाला कधी अशा ह्या एकटेपणाची आवश्यकता वाटली का?” मला प्रो देसाई म्हणाले, “माझा एकाकीपणाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. शांत रस्त्यावरून एकटाच धावण्यापासून, खिडकीजवळ बसून पाऊस पडतो ते पाहण्यापर्यंत एकटेपणाचे अनेक प्रकार असू शकतात.

समुद्र किनाऱ्यावर वाळूत पाय खुपसून बसायला मला आवडतं.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
“लोकांना समुद्र का आवडतो? याचे कारण असं की लोकांना ज्या गोष्टींचा विचार करायला आवडतं त्या गोष्टींचा विचार करायला लावण्याची शक्ती समुद्रात असते.असं कुणी तरी म्हटलं आहे. माझा सागराच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, त्याहूनही अधिक, वाळूमध्ये बोटं खुपसून राहणं मला आवडतं. समुद्रकिनारा हे एक मजेदार, घटना घडवणारं, खेळकर आणि अस्तव्यस्तीक ठिकाण आहे, त्याच वेळी ते आश्चर्यकारकपणे सुखद, शांत, उपचार करणारं ठिकाण आहे.

महात्मा गांधीं म्हणालेत, "डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल”

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी काल प्रो. देसायांना म्हणालो, “रागाची भावना, रागाची जोमाने येणारी इर्षा,जंगली राग जो तुमच्या शरीरात फोफावतो तुमच्या मुठी घट्ट करून, तुमचं मन आसूरी करतं, तुमच्यातली श्वापदांची उत्कट प्रवृत्ती बाहेर आणतो. दुसऱ्यांवर दुःख ओढवण्याची अंगातली तळमळ,असं केल्यावर वाटणारी समाधानी आणि तृप्तीची तळमळ. या सर्व सूडाच्या भावना आहेत. या सूडाच्या भावना,वैयक्तिक वेदना आणि दु:ख यांचा एक समूह आहे.

सेपियन्स-(ऐसी अक्षरे -१७)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ट युवल नोव्हल हरारी हे नाव आता कोणाला माहित नाही हे फार कमी आहे. आपण कोण आहोत? आपण इथपर्यंत कसे आलो? येताना काय काय मागे सुटले आहे ?काय काय गाठोड घेऊन इथे आलो आहोत? ते गाठोड आहे का ते ओझं आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा माणूस एका झटक्यात (ह्या पुस्तकात) देतो.

लपविलास तू हापूस आंबा -- विम्बल्डन

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
“सहा महिन्यापूर्वी रघुनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला.हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.” आता मुंबईत लवकरच पाऊस येईल.केरळात पाऊस पडायला लागला.दहा जून पर्यंत पाऊस मुंबईला येईल.बाजारात निरनीराळे प्रकारचे आंबे दिसत असतील.

माझं challenge (आव्हान)

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आ.ई.तु.झी.आ.ठ.व.ण.ये.ते हा माझा लेख वाचत असताना किंवा वाचून झाल्यावर ,माझ्या आईची आठवण येऊन ही “ माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही किंवा मला हुंदका आला नाही” असा एखाद्या ही वाचकाने प्रतिसाद द्यावा.असं मी आव्हान करतो.Challenge देतो.

हिमालयातून सुरू झालेली माझी गोष्ट. . .

मार्गी ·
लेखनप्रकार
माझा जन्म झाला हिमालयाच्या पर्वतीय परिसरामध्ये. उत्तराखंडच्या पिथौरागढ़ जिल्ह्यात सद्गड नावाच्या अतिशय सुंदर गावाजवळ. हिमालयाच्या पर्वत रांगांच्या मधोमध! सगळीकडे डोंगर, झाडं, पशु- पक्षी अशा वातावरणात मी जन्मलो. अतिशय थंड वातावरण होतं ते. मी आणि माझे भाऊ- बहीण डोंगरात खेळायचो. खूप सुंदर परिसर आणि हीss शांतता होती तिथे. सगळीकडे हिरवंगार वातावरण, माती, शेतं आणि भरपूर थंडी. शिवाय आम्ही जिथे राहायचो तिथे खूप बकर्‍या सोबत असायच्या. मी बकर्‍या आणि गायी- बैलांसोबत खेळायचो. माझे दिवस खूप मजेत जात होते. आजूबाजूला असलेले डोंगर- झाडं मला ओळखीचे वाटायला लागले होते.

आ. ई. तु झी. आ. ठ. व. ण. ये. ते

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं. मॉं (ऊली) म्हणजेच आई म्हणजे सबकुछ माऊली! “आई, आई …. (मै आई,बेटा मै आई)” म्हणजेच, “अगं मी येते!, अरे मी येते!