मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

“आनंदी असणं म्हणजे काय हो भाऊसाहेब?”

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हा प्रश्न मी काल प्रो. देसायांना विचारला. ते म्हणाले, “ सामंत, तुम्ही छान प्रश्न मला विचारला आहे. आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमतील त्या घडण्णऱ्या गोष्टींचा आनंद घेणं. हे आनंदी असणं कार्यसिद्ध होण्यासाठी निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे मार्ग असूं शकतात. त्यांच्याकडे विविध नैतिकता, मूल्यं, कर्तव्यं आणि कार्य सूची असूं शकतात. आपल्या जीवनातील सर्व कृती या एकाच उद्देशाकडे, आनंदी असण्याकडे,या मुख्य ध्येयाकडे,नेमस्त होतात. माझ्यासाठी, म्हणाल तर मी जगत असलेल्या जीवनाचा आनंद घेणं कठीण होईल, जर मी सर्व काही मला त्रास देत आहे अशी समजूत करून राहिन.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श(भाग २)

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सुम्याच्या संसारातल्या त्या जीवघेण्या आठवणी सुम्याला लग्न होऊन दोन वर्ष झाली.तिला एक स्वरूप सुंदर मुलगी झाली.अगदी सुम्यासारखी दिसायची. सुम्या आपल्या नवर्‍याबरोबर पुण्यात रहायची.तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा.सुम्याला खूप आनंद व्हायचा. कोकणात आईकडून चवदार स्वयंपाक कसा करायचा ते शिकल्यामुळे तिच्या जेवणावर तिचा नवरा खूष असायचा. सुम्याला एकटी असताना गुरूनाथची खूप आठवण यायची.गुरूनाथसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करायचा.पण ते प्रेम बालीश तरूण वयातलं होतं.भविष्य कसं असेल त्याची त्या वयावर पर्वाही नसते आणि जाणीवही नसते.

अक्षय्य तृतीया

बाजीगर ·
लेखनविषय:
काव्यरस
घ्या कविता.... सोनार आठवण करुन देतात, पेपरमधे पानभर जाहीराती देतात... अलीबाबाची गुहा, सापडल्यासारखे, दागिन्यांचे फोटोज । कंगन हार कर्णफूलं कंठे तोडे नाणी कलश, चळत बिस्किटोज ।। कुणालाच आठवत नाहित । घामटलेले खाणकामगार,त्यांचे कूपोषित अशिक्षीत बायकामुलं ।। भट्टीत तापून सुलाखून । कामगार तारवटलेल्या डोळ्यांनी, घडवतोय बारीक नक्षी फूलं।। मालक गुलजार हसतोय । पेठेत अजून एक नवे, दालन उघडतांना दिसतोय ।। #कवी नेहमीचा..... हार के जितनेवाला....बाजीगर

आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट

चौकस२१२ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट प्रकाश नारायण संत यांचं लंपन कादंबरीवर दिग्दर्शन निपूण धर्माधिकारी "लंपन" https://www.youtube.com/watch?v=Urf8cvCo5Ws झलक बघून फक्त एक शंकेची पाल मनात चुकचुकली ती म्हणजे लंपन जिथे वाढतो ते महाराष्ट्र्र कर्नाटक सीमेचं भागातील गाव आणि तेथील भाषा या चित्रपटात कितपत तशीच उतरली आहे ?? कारण त्या कादंबरीचं गोडव्या मागचे कारण ते छोटं गाव आणि तिथली भाषा आणि व्यक्ती शाळा कादंबरी ची आठवण झाली ! किंवा दळवीनच्या ठणठणपाळ (बहुतेक हेंच नाव होते ) या त्यांच्या कोकणातील लहानपणाच्या जीवनाबद्दल च्या कादंबरीची आठवण झाली !

समुद्राच्या लाटांवर माझ्या विचारांची खलबल.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कधी कधी अ-वास्तव विषयावर लिहिणं सुद्धा मनोरंजक असू शकतं.माझा खालिल लेख तसाच काहिसा नमुना आहे. मला समुद्राजवळ बसून निळ्या काळ्या लाटांकडे पाहयाला आवडतं. मला असं वाटतं की जर मी तिथे बराच वेळ बसलो आणि माझ्या “मनाला” खरोखर इकडे तिकडे फिरू दिलं तर लाटांपर्यंत पोहोचेपर्यंत वाळूमध्ये, कमी झालेल्या पाण्यात पडून, माझं मन वाळूत रूतलं जाईल. आणि पुन्हा एखादी मोठी लाट येऊन पाण्याबरोबर फरफटत जाईल. आणि माझे विचार पुन्हा एकदा समुद्रात नेले जातील. किनाऱ्यावर माझं शरीर खारट वाऱ्याची झुळूक अंगावर घेऊन, माझ्या विचारांना मंथन करणाऱ्या लाटांच्या आवाजाचा आनंद घेत राहिन .मी अनेकदा माझ्या विचारांना उभारी देतो.

( लपविलास तू तगडा खंबा – डोम्बलडन )

चौथा कोनाडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
“सहा महिन्यापूर्वी बाबूनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला. हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.” आता मुंबईत लवकरच थंडी पडायला सुरुवात होईल. उत्तरेत थंडी पडली सुद्धा. वीस डिसेंबरपर्यंत मुंबईत गारवा येईलच. वाईनबाजारात निरनिराळ्या प्रकारच्या रम दिसत असतील. पण थंडी पडायला लागल्यावर वाईनबाजारात ओल्ड मन्कचा तुटवडा निर्माण होणार आणि त्या ओल्ड मन्कचा आस्वाद हवाहवासा वाटत राहणार. म्हणून उन्हाळा सुरु होण्यापूर्वी ओल्ड मन्कची चव घेऊन घेऊन तृप्ती करून घ्यावी म्हणून थंडी संपण्यापूर्वी शेवटचा ओल्ड मॉन्कचा क्रेट मी" अपना वाईन शॉप" मधून विकत घेतो.

न्यूत की द्यूत?

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आकाश गेडाम आणि मोहिनी गजाभिये या नागपूरस्थीत अभ्यासकांचा Study of Vanished South Asian Board Game 'Nyout गेल्या वर्षात प्रकाशित झालेल्या छोट्याशा शोध निबंधात त्यांना वाघोरी टेकड्यांच्या पायथ्याशी चंद्रपूर जिल्ह्यातील एरवा झरी गावाच्या परिसरात (N20’38’53, E79’35’23) एका प्राचीन खेळाच्या खूणा आढळल्याचा उल्लेख आहे.

वाट पहाणं

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वाट पाहाणं “सखी,मंद झाल्या तारका आता तरी येशील का?” हे गाणं माझ्या कानावर पडलं.किती आतुरतेने सखा तिची “वाट” पहात आहे,हा विचार मनात आला आणि वाटलं, आपण आपल्या आयुष्यात किती वेळा वाट पाहतअसतो?आपण छोट्या छोट्या गोष्टींची वाट पाहत असतो. रेस्टॉरंट्समध्ये जेवणासाठी. नवीन चित्रपट पाहण्याकरता तिकिटांसाठी. नव्या फूलांचा सुगंधी वास दरवळून आणणाऱ्या वसंत ऋतु येण्यासाठी. आतुरतेने मोठ्या गोष्टींची वाट पाहतो. मेलमधील आपल्या स्वीकृत पत्रांसाठी.आपल्या कुटुंबांतील व्यक्ती परदेशी असताना काम झाल्यावर परत घरी येण्यासाठी. आपल्या सेवानिवृत्तीसाठी. करिअरच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी.

रोबोटमय जगाने लावला माणसाचा पुर्नशोध

माहितगार ·
लेखनविषय:
रोबोट्सनी जग जिंकले होते माणूस इतिहास जमा झाला होता. पण रोबोट्सना पोट नव्हते, त्वचा झाकण्याची गरज नव्हती आकांक्षा नव्हत्या त्यांचे अर्थशास्त्र ठप्प झाले आता पुढे काय असा प्रश्न पडला जेव्हा त्यांना मिसळपावच्या अर्काईव्हमध्ये माहितगारची एक जुनी कविता आढळली मग त्यांनी पोट असणारे त्वचा झाकाविशी वाटणारे आकांक्षा असणारे जन्म मृत्यू असणारे रोबोट बनवले असा लावला रोबोटमय जगाने माणसाचा पुर्नशोध

एआय रोबोट प्रोफेसर

माहितगार ·
लेखनविषय:
माणसाला शिकण्यासाठी शिकवणारा गुरू लागतो म्हणून मीच बनवला हा एआय रोबोट प्रोफेसर अपल्याला शिकवण्यासाठी यापुढे त्याचे विद्यार्थी रोबोट असतील ?