Skip to main content

(चार दिवस मिळाले असता )

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 14/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा वाचक सुज्ञ आहेत. बसावे फक्त मित्रां सोबत अशी कल्पना आहे दोन वेळा मधुशाले सोबत जिणे महनता आहे फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने उज्वल भविष्याचा मार्ग दावला हर प्याल्या,चकण्याने हे माझे भाग्य आहे,मित्रांसवे बसाया मिळाते हरीवंशा विन मधुशालेचे महत्व कुणाला कळते दुःख ना फटके आसपास आपले अथवा परक्याचे का जाया करता,साधन हेच आहे,आनंदी जगण्याचे... चार दिवस मिळाले असता चारजणांसवे घालवावे इहलोकीचे तन,मन,धन इहलोकीच व्यतीत करावे चार दिवस मिळाले असतां,खाऊन पिऊन जगावे फुका शब्दच्छल करूनी का लोकांस उगा पिडावे?

वरवर लहान वाटणारे अनुभव.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातील वरवर लहान वाटणाऱ्या गोष्टी सर्वांसाठी इतक्या लहान नसतात. शेतात काम करताना माझ्या सभोवतालचं नैसर्गिक सौंदर्य आणि काही नकळत होणारी नैसर्गिक परिवर्तनं लक्षपूर्वक पाहिल्याने मला हे कळू शकलं. माझ्या लहानपणी माझ्या आजोबांच्या शेतात काम करताना मला याची जाणीव झाली. मला नांगर चालवायला आणि मी ओढत असलेली अवजारं पाहणं, जमिनीवर काम करणं आवडायचं.

काय करावे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
काय करावे तजवीज आहे काय करावे मन उद्विग्न आहे काय करावे काफिला मार्गस्थ असताना स्तब्ध झाला आहे काय करावे प्रसन्नता शोधीत असताना अनुपस्थित झाली आहे काय करावे मित्राची जरूरत असताना नाराज झाला आहे काय करावे संवाद मनस्थितीचा असताना नियम लागू झाला आहे काय करावे हर एक व्यक्ती अपुला फायदा शोधीत आहे काय करावे चोहिकडून फक्त आश्वासन प्राप्त होत आहे
काव्यरस

"जीवन पूर्णतः जगा" म्हणजे काय रे भाऊ?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मला वाटतं की बीचवर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ रात्रीची आहे. मला माझे पाय उबदार वाळूमध्ये रुतून ठेवण्यात मजा येते.भरतीच्या लाटेचं किनाऱ्यावर वेगाने येणारं पाणी पायावर घ्यायला मला मजा येते. माझ्या सर्व समुद्रकिनाऱ्यावरील अनुभवांपैकी, सर्वात सुंदर आठवणी, तारांकित आकाशाखाली सूर्य मावळल्यानंतरच्या आहेत.

त्याच्या सारखा नशिबवान तोच.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 13/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
लोकांनी अनेक शतके ह्या पृथ्वीवर पार केली आहेत आणि लोक बदलत आले आहेत. असं करत असताना त्यांच्यामध्ये नवीन विश्वास जागृत होत गेला असावा.ते गरजेप्रमाणे नवीन तंत्रज्ञान निर्माण करीत गेले असावेत. तेव्हा ते काय असावेत आणि आता काय आहेत याचा विचार केल्यावर जाणवतं की,बदल चांगला ही वाटतो आणि वाटत ही नाही. जेव्हा माणूस पहिल्यांदा बोलू शकला आणि चालू शकला तेव्हा तो दिवसभर घरांमध्ये राहिला नसावा. आपले काही दिवस बाहेर ही घालवत असणार. निसर्गाशी एकरूप होत असताना तो त्यातून आनंद ही घेत असावा. त्याच्या श्रद्धेचा देव ही त्याला निसर्गात सापडत असावा.

अत्तर

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 12/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
अत्तर ------------------------------------------------ संध्याकाळची वेळ होती . राजू घराबाहेर होता. पोरांशी खेळत .मुलांचा आरडाओरडा चालू होता. खेळ रंगात आला होता. त्याचे वडील तालुक्याच्या गावाला गेले होते. ते आले. येताना त्यांनी बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. त्यांच्या हातातली बंदाची पिशवी चांगलीच फुगलेली दिसत होती. राजू तेरा- चौदा वर्षांचा होता . तो स्वतःला मोठा समजू लागला असला , तरी त्याचं पोरपण मध्येच उठून दिसायचं.वडिलांना येताना पाहून त्याने खेळणं सोडलं. तो पळत पळत त्यांच्या मागे आला. ‘अप्पा काय आणलं ?’ असं कुतूहलाने विचारत त्याने अप्पांच्या हातातली पिशवी घेतली. तो घरात शिरला .

सुंदर गीते ही स्मरणात येती

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 12/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
अवकाश आहे म्हणून बसता जुन्या गोष्टी स्मरणात येती कधी सत्याची,कधी असत्याची सुंदर गीते ही स्मरणात येती शताब्दी एकवीसावी अन् समय नवे प्रकृतीने दान केलेली धनराशी स्मरते कमजोर वासे घेऊन जूने घर वसवले मनाशी जुळले ते सुंदर घर स्मरले नदी नाल्यामधे होतो तरत दिनरात्र सारे भोळे येती स्मरणी कागदी नाव चालविणारे सणासुदीची मस्ती आता अंमळ जास्त होई किंतू ईश्वराचे छप्पन छंद स्मरणात येई आता लाखोंची घरे वीजदिपानी सजविती रातकिड्यांच्या लुकलुकणी स्मरणात येती आता लाख रुपयांना किंमत विशेष नाही चवली अन् अठ्ठणीची किंमत स्मरणात येई

ढग हे माझे अनोळखे खरे मित्र.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 12/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मी अनेकदा पावसावर,वादळांवर लिहिलं आहे. पण ह्या गोष्टींचा उगम करणाऱ्या ढगांवर लिहिलं नाही.आज मला माझ्या लहानपणी शेतात काम करतानाच्या आठवणी येऊन,भर पावसाळ्यात शेतात काम करत असताना पावसाची सर आल्यावर धावत घरात जाण्या अगोदर, आकाश कसं ढगाळायचं याची आठवण आली आणि ढग आठवले. मी ढगांकडे माझे अनोळखी मित्र समजून पहायचो आणि पहातो. आभाळात विहरणाऱ्या ढगांकडे विशिष्ट नजरेने त्यांच्याकडे टक लावून मला पाहावसं का वाटायचं, हेच कळत नाही. मला एक गोष्ट माहीत होती: मला माहीत होतं की हवेवर मुक्तपणे राज्य करणारे ढग सुंदर होते. ढगांचा साधेपणा आणि सौंदर्य निर्विवाद होतं.

मौन!

लेखक Bhakti यांनी रविवार, 12/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मन हल्ली अळूमळू झालंय असं उगाच भासतयं .समजतच नाही अस का काटे कोरांटीच्या फुलांशी खेळायला त्याला जमत नाही .एक ओरखडा जरी त्याच्यावर पडला तरी चर्र् आवाज येतो तो देखील सहन होत नाही. भाषेतल्या अक्षर भवर्यात जीव देण्याऐवजी ते अंतरच वाढवत धावतं. संभाषणातला अंतरच मनाचे तीव्र मौन धारण करतात.अंतर्मुखाच्या तळाशी विहारतांना चमचमता ह्या मौनाचा मोती शिंपल्यातून मिळवला जातो. मिटलेल्या गुलाबी ओठांआड,घशात अडकलेल्या शब्दांना कोरड पडते ते मौनाच्या मधात विरघळून जातात. सकाळ- संध्याकाळ मंदिरात होणाऱ्या घंटांचे गुंजराव प्रत्येक नादाला मनाला स्थिर करतात.

लेखक

लेखक भागो यांनी रविवार, 12/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
तो लेखक होता. तो कथा लिहित असे. मधून मधून एखादी कविताही लिहित असे. “चुकलेल्या वाटा.” हा त्याचा एकमेव कथासंग्रह होता. त्याच्या घरात त्याच्या शिवाय अजून दोन मेंबर होते. एक स्त्री आणि एक मुलगा. दुपारी चार वाजता तो तयार झाला. कुठेतरी जायचे होते. कुठे? जिकडे वाट फुटेल तिकडे, जिकडे पाय नेतील तिकडे. तो जायला निघाला तेव्हा ती स्त्री आणि तो मुलगा टीवी बघत होते. “मी जातोय.” Nobody said anything. जा, नका जाऊ, लौकर ये. टेक केअर. काही नाही. कदाचित त्यांना ऐकू गेले नसावे. कोणीतरी बोललेही असेल पण मग ह्याला ऐकू गेले नसणार. टीवी फुल ब्लास्ट.