वाहुनी तू रहावे
नसे सोय बोलून सत्यात काही जगाला हवे ते असत्यात राही उगा मौन राखून विश्वा पहावे वहात्या जगा वाहुनी तू रहावे
घळे आसवांतून पाषाण लेणी मुकी साचताना उरी दैव देणी अबोलाच बोलून गाईल गाणी स्थितप्रज्ञ राहूनही काळ वाणी
झरे ज्ञान मर्मातले होत ओळी जरी सांडले वेचले घेत झोळी शिदोरीच वाटेत ही चालवावी उपाशी जिवा तेवढी चाखवावी
निसर्गास वाटेल जेही मनाशी अनाहूत साकार होई जगाशी जुळल्यास योग कृतीही करावी नसे अन्यथा शांतता बाळगावी
मिसळपाव
इराण हा देश आंतरराष्ट्रीय राजकारणात सतत गाजत आला आहे. सर्वप्रथम या विषयी भयावह भावनाच येते. तिथे झालेल्या 'इस्लामिक क्रांती' १९७९ नंतर हा देश खूपच गूढ झाला. हळू हळू वाचनातून समजत होतेच की इराण हा आर्याचा देश होता.