ढोल ताशा पथके की वेठबिगारी ?
नमस्कार मंडळी
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!
कालच अनंतचतुर्दशी झाली आणि गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशी अवस्था झाली. आधी महिनाभर तयारी आणि मग दहा दिवस जागून कामे करून थकलेले कार्यकर्ते मंडपातच आडवे झाले किंवा श्रमपरिहाराला गेले. पण दिवस भर आणि मग रात्रभर रस्त्यावर वादन करणारी आणि वेगवेगळ्या मानाच्या/ बिनमानाच्या गणपतींसमोर वादन करून सलामी देणारी ढोलपथके कुठे गेली?त्यांचे ते एकसारखे दिसणारे सुंदर झब्बे लेंगे, टोप्या, मुलींच्या नथी, साड्या आणि मुख्य म्हणजे ते अजस्त्र ढोल , कडकडते ताशे ,ते वाजवताना बेधुंद होऊन नाचणारे वादक , नाचणारे झेंडे ते सर्व कुठे गेले?
( वर्दी )
अर्धोन्मीलित डोळे, स्वप्नांची गर्दी झाली
"ती",येत आहे याची अवचित वर्दी आली
हृदयात प्रेम वारू, फुरफूरू लागला होता
मनात प्रेम ज्वर माझ्या,दाटू लागला होता
वाजे डोक्यात प्रेमघंटा,फुटती प्रितीचे धुमारे
पडे मन अंगणात,आठवांचा प्राजक्त सडा रे
झाले तप्त श्वास माझे,गात्रे सुखावून गेली
पहाटफुटणी मनीचा,अंधार विझवून गेली
नयनात श्रावण धारां,अंगी कडाडते विज
उरी दाटल्या प्रमादांचे सांगीन तीला मी गुज
नाद पैजंणाचा कानी येता,जागला प्रेम दर्दी
उघडता नयन, तया कळाले ,
उफ्फ sssssss की "ती",.........सर्दी होती.
त्वमेव सर्वमम देव देवः
सातारा -कास पठार
महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे शहर म्हणजे 'राजधानी सातारा'.राजगड,रायगड,जिंजी नंतर महाराष्ट्राची चौथी राजधानी
सातारा जाणून घेण्यासाठी पाहण्याची इच्छा होतीच.साताऱ्यात संध्याकाळी चार वाजता पोहचल्यावर फ्रेश होऊन अजिंक्यतारा किल्ल्यावर गेलो.
श्री गणेश लेखमाला २०२४ - फॉल्ट लाइन एक्स्प्लॉयटेशन - दुभंग विस्तार
फॉल्ट लाइन एक्स्प्लॉयटेशन - दुभंग विस्तार
जगातील कुठल्याही समाजात काही गोष्टी सर्वसहमतीच्या असतात, तर काही गोष्टींबाबत दुमत असते. जगात जिथे जिथे मानवी समाज आहे, तेथे सत्ता, संपत्ती, स्त्री, जमीन आदी अनेक कारणांवर लोकांमध्ये वादविवाद असतात. या वादविवादात पूर्वी भांडणे आणि युद्धे होत आणि राजा तसेच राजघराणे बदलले जाई. औद्योगिक क्रांती आपल्याला मध्ययुगीन जगातून आधुनिक जगाकडे घेऊन आली. त्याबरोबर नवनवीन तंत्रज्ञान, विचारधारा, आयुष्याची नवनवीन मांडणी समोर येत गेली.
नवीन तंत्रज्ञान घेऊन नवीन बाजारपेठा शोधत असणाऱ्या युरोपात जगाची बाजारपेठ ताब्यात घ्यायची स्पर्धा लागली.
भयंकर प्रामाणिकपणे काम करणारा कलासाधक: संकर्षण कर्हाडे
✪ ‘व्हायफळ' गप्पा पॉडकास्टवर उलगडत जाणारा संकर्षणचा प्रवास
✪ ओळखीच्या चेहर्याच्या मागे असलेल्या दिलदार माणसाचा परिचय
✪ परभणी, अंबेजोगाई, औरंगाबादच्या आठवणी व लहानपणीच्या खोड्या
✪ प्रशांत दामले, श्रेयस तळपदे व सिनियर्सकडून त्याचं शिकणं आपण शिकावं असं!
✪ “स्टेजवरचा माज खाली दाखवलास तर तो स्टेजवर उतरवला जाईल!”
✪ “तुला मनलं होतं ना तुला बक्षीस द्यायचं हाय, रताळ्या!”
✪ “Soak the pressure and be there!”
✪ पुस्तकं व माणसं वाचणारा अवलिया
संकर्षण कर्हाडे! बस नाम ही काफी है! घराघरात पोहचलेला चेहरा! कलाकार, नाटककार, अभिनेता, सूत्र संचालक, लेखक आणि कवी!
श्री गणेश लेखमाला २०२४ - आनंदाचा कोपरा-माझी बाल्कनी
मोहम्मदवाडीचा सुर्योदय
कवीवर्य अभिजित दाते यांची गझल सेवानिवृत्त मंडळींची कथा,व्यथा नेमक्या शब्दांत मांडते.
गोंजारतो अताशा माझ्याच वेदना मी
सांगा तरी नशा ही दुसर्या कशात आहे
खेळात या नव्याने माझ्यात जन्मतो मी
माझ्या शहास अंती माझीच मात आहे
सेवानिवृत्तांकडे लोकांचे फारसे लक्ष नसते, जणू साईडला टाकलेली मालगाडी.कुण्या कवितेची ओळ
निबिडात दडलेल्या
निळ्याभोर पाखराची
लवलवती लकेर
जेव्हा कानावर येते....
निळ्यासावळ्या निर्झरा
फेसाळत, कवळून
पाणभोवर्याची माया
जेव्हा पैंजण बांधते...
मावळतीच्या बिलोरी
आभाळाला तोलूनिया
एक इवले पाखरू
जेव्हा पंखावर घेते...
काजळल्या नभावर
निळी रेष रेखाटत
दिशा, कोन झुगारून
जेव्हा उल्का कोसळते....
.....काळजात रुजलेल्या
कुण्या कवितेची ओळ
ध्यानीमनी नसताना
तेव्हा ओठावर येते
मिसळपाव