Skip to main content

अक्षय्य तृतीया

लेखक सरनौबत यांनी शुक्रवार, 28/04/2017 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षय्य तृतीया म्हणलं कि मुहूर्ताची सोनेखरेदी, आंब्याच्या सीझन मुळे दुपारच्या जेवणाला आमरस पुरी अश्या गोष्टी आठवतात. मला मात्र ह्या दिवशी कायम 'घोसाळ्याचा (घोसावळ्याचा) वेल आणि बालपणीचे दिवस' आठवतात. ह्या दिवशी कुठलंही झाड लावलं तर ते उत्तम येतं असं बाबा म्हणायचे. चैत्र-वैशाख मध्ये तापलेली जमीन आणि पुढे दीड महिन्याने सुरु होणारा पावसाळा हे त्यामागील शास्त्रीय कारण असेल कदाचित. तेव्हा मात्र शुभ मुहूर्तावर झाड लावलं कि छान येतं असंच वाटायचं. अक्षय्य तृतीयेच्या काही दिवस आधी बाबांबरोबर पुण्याच्या मंडईत जाऊन घोसाळ्याच्या बिया आणायच्या. वाटीत पाणी घेऊन २ दिवस त्यात ठेवायच्या.

अनवट किल्ले ५ : असाच लोभ असावा (Asawa )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 28/04/2017 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
पालघर डोंगररांगेतला सर्वात उत्तरे कडला किल्ला "असावा" बघण्याचा प्लॅन केला. आज सोबत कोणीच नव्हते, त्यामूळे एकला चालो रे ला पर्याय नव्हता. बोईसर स्टेशनला उतरलो आणि पुर्वेकडे नजर गेल्यानंतर सपाट माथ्याच्या डोंगराचे दर्शन झाले. हाच असावा गड असणार याची खुणगाठ बांधून स्टेशन बाहेर आलो आणि चिल्हार फट्याकडे जाणारी सहा आसनी रिक्षा पकडली आणि निघालो आणखी एका मोहिमेवर. किल्ला पुर्वेला असला तरी चिल्हार फाट्याकडे जाणार्‍या बस किंवा सहा आसनी रिक्षा बोईसर पश्चिमेकडुन सुटतात हे ध्यानात ठेवावे. असावा किल्ल्याला यावयाचे झाले तर दोन मार्ग आहेत.

मिसळपाव भटकंती विशेषांक : १) ताम्हीणी घाट

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 28/04/2017 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव भटकंती विशेषांक : १) ताम्हीणी घाट आत्ताशी कुठे वैशाख सुरु झालाय , अजुन अख्खा ज्येष्ठ यायचाय आणि आजकाल तर आषाढस्य प्रथमे दिने ही नुसता रखरखाटच असतो. पण आपल्याला मात्र आत्ता पासुनच श्रावणाचे वेध लागायला लागलेत. कसं आहे की "पाऊस तर मनात असतो ना " असं कोणीतरी पुर्वी म्हणालं होतं तेव्हा पासुन मनात ढग दाटुन येतात आणि आपण आपले चिंब चिंब होऊन जातो ... हां तर ते असो . तुर्तास तो विषय नाही .

ॐ नम: शिवाय

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 28/04/2017 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
देवाधिदेव महादेव स्मशानात बसलेले असतात... त्यांचे गण बेभान होऊन ॐ नम: शिवाय म्हणत नाचतं असतात.. शिवरात्र असते...महादेव आपल्या भक्ता समवेत,,शिवरात्रीचा आनंद लुटत असतात..अनेक भक्त महादेवाच्या भेटीस येत असतात.. त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेत असतात.. असाच एक बुद्धिवादी भक्त महादेवाच्या भेटीला आला... उघडे नागडे भस्म चर्चित अनेक गण बेभान होऊन नाचत होते.. ते पहाताच तो महादेवास म्हणाला स्वामी आपण ब्रह्मांड निर्मिते..सा-या तंत्र विद्ये चे आपण जनक.. अन अश्या उघड्या नागड्या गांजेशस गणात आपण कसे रमता?

विनोद खन्ना

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 28/04/2017 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज विनोद खन्ना आपल्या मध्ये नाहीत एक आठवण ...... गोष्ट जुनी आहे.. अभिनेता विनोद खन्ना यांच्या आयुष्यातला नाजुक काळ होता तो पत्नी गीतांजली बरोबर फाटले होते.. स्मिता पाटील त्यांच्या जवळ येत होती.. त्या सुमारात विनोद ओशो कडे सल्ल्या साठी गेले होते.. आपली समस्या सांगितल्यावर भगवान ओशो म्हणाले.. "फिल्म जीवन मे तो आप ऍक्टींग कर रहे हो उसे जीवन समजो और निजी जीवन जो जि रहे हो उसमे ऍक्टींग करो" Act like you are living life Live life like you are acting ................................ मनका मित मध्ये ब्रेक मिळाला अन विनोद खन्ना उदयास आला तशी लिना चंदावरकर पण.. तिला पण ब्रेक याच सिनेमात मिळाला

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ५)

लेखक Anand More यांनी गुरुवार, 27/04/2017 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात इंग्रजांचे, मिशनऱ्यांचे, वसाहतवादाचे, भांडवलवादाचे आणि आधुनिक विज्ञानाचे आगमन जवळपास एकाच वेळी झाले. त्यावेळी भारतीय समाज कसा होता? परमार्थाच्या आवरणाखाली लपवलेला पण सदासर्वकाळ जागृत असलेला स्वार्थ; पुनर्जन्म संकल्पनेतुन स्वकेंद्री बनलेल्या व्यक्तींच्या छोट्या छोट्या वर्तुळांचा बनलेला समाज; जन्माधारीत जातीव्यवस्थेतून तयार झालेली शोषणमूलक समाजव्यवस्था; दैवतीकरण, बालविवाह, हुंडा व सतीप्रथा या सर्वांतून होणारे स्त्रीशोषण आणि कामसूत्राचा इतिहास असूनही लैंगिक संबंधांमध्ये असलेला चोरटेपणा; हे सर्व आपले पूर्वसंचित होते.

शेक्सपिअरचे “यक्ष”गान

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 27/04/2017 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
"द टेम्पेस्ट –(झंझावात)". भाषाप्रभू शेक्सपिअरच्या साहित्यिक कारकिर्दीतले त्याचं (बहुधा) हे शेवटचं नाटक. त्याच्या इतर प्रत्येक कलाकृती सारखंच - मानवी जीवनाची व्यामिश्रता अन सद्-असद भाव-भावनांचे कंगोरे अलगद उलगडून दाखवणारं. त्याची प्रत्येक कलाकृती त्रिपुरीच्या दीपमाळेसारखी उजळलेली,भुरळ घालणारी. त्या दीपमाळेतला मला भुरळ घालणारा एक छोटासा दीप म्हणजे हे “यक्ष”गान. या नाटकात “एरियल” नावाचा एक यक्ष आहे. समुद्री झंजावातात नष्ट झालेल्या जहाजात आपला पिता मृत्यू पावलाय अशी समजूत झालेल्या नेपल्सच्या राजपुत्राचे सांत्वन करताना हा यक्ष ही कविता म्हणतो. ही कविता म्हणजे केवळ सांत्वन नाही.