श्रावण सायकल सफर ०९ ऑगस्ट १७
दीर्घ विरहा नंतर आज सायकलिंग ची संधी मिळाली. खर तर अंबरनाथ ते वाडा अशी ६५/७० किमी ची राइड करायचा विचार होता, पण ज्या सायकल मित्रा कडे जाणार होतो त्यालाच अचानक ठाण्यात यावे लागले, अचानक उद्भवलेल्या कौटुंबिक कारणांमुळे. त्याचा रात्री निरोप आला ,त्यामुळे मग वाड्याला जे बघायला जायचं तेच जवळपास कुठे मिळेल याचा विचार करू लागलो. मलंग गड ,नेवाळी परिसर यासाठी योग्य वाटला. जवळ ही आणि रस्ता ही चांगला, रहदारी कमी.
वाड्याला मित्राच्या शेतावर व रानात जायचे होते, सृष्टीला लागलेल्या पाचव्या महिन्यातले सोंदर्य न्याहाळायला. रानभाज्या बघायला, त्या कशा बनवतात हे माहित करून घ्यायला.
मिसळपाव