Skip to main content

घाव.....गजलेमधून

लेखक तिरकीट यांनी रविवार, 26/07/2020 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतल्या काही नवकवींच्या गजल ऐकल्या कि असं वाटतं मराठीत गजलेला दुःख सोडून विषय आहेत का नाहीत. मध्ये एक अशीच गजल ऐकली आणि साधारण विशीतल्या त्या गजलकाराचा गळा एकाच गजलेत तीन वेळा कापला गेला. म्हटलं अरे देवा!!! गळा कापणे, पाठीवर घाव करणे, गेला बाजार पारिजातकाचा उल्लेख ह्याच्या पुढे गजल आहे का नाही. खालच्या ओळी थोड्याश्या वैतागाने लिहिल्यात. वृत्तांच्या गणितात बसत असतील तर गजल म्हणू नाहीतर कविता, तेही नसेल तर मुक्तछंद आहेच.....
काव्यरस

मुक्या प्राण्यांची सेवा

लेखक सुरज जाधव यांनी शनिवार, 25/07/2020 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक - 22/07/2020 नेहमी प्रमाणे सकाळी 5.30 ला उठून धर हॅण्डल मार फायन्डल करत माझ आवडत मार्ग बहिरवली कडे निघालो, अतिशय निसर्गरम्य घनदाट जंगल आणि रस्त्याच्या एक बाजूने जगबुडी खाडी..खाडी पट्टा म्हणून ओळखलंजाणाऱ्या रस्त्याला सध्या लॉकडाऊन मुळे वाहनांची वर्दळ खूप कमी आहे,, तसा हा पट्टा वाळू-माफिया पट्टा म्हणून पण प्रसिद्ध आहे...

फॉरेस्ट गम्प- एका मुलाची कथा

लेखक भीमराव यांनी शनिवार, 25/07/2020 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
काल पर्यंत मला हा चित्रपट काय आहे खरच माहित नव्हतं. अगदी सहजच मिळाला आणि वेळ घालवायला दुसरं काही नाही म्हणून पाहिला. आणि काही तरी वेगळं पाहिलंय याची जाणीव झाली. एका अनोळखी गावात बस स्टॉपवर बसलेला एक तरुण. शेजारीच ठेवलेली आटोपशीर बॅग. लोकं येतायत आणि जात आहेत. त्यालाही कुठे तरी जायचं आहे, पत्ता विचारावा तर कसा आणि कोणाला? शेजारीच बसची वाट पाहत बसलेल्या एका बाई बरोबर तो बोलायला सुरुवात करतो. तसं बघायला गेलं तर त्याला फक्त नऊ नंबर च्या बस शी देणं घेणं असतं, पण तो अगदी सुरूवातीपासूनची गोष्ट चालू करतो. आणि एक एक करत आपल्या समोर उलगडत जाते त्याच्या आयुष्याची कथा.

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ३ )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 24/07/2020 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचा भाग आपण येथे वाचु शकता पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग २ ) पन्हाळ्यावर एकच लगबग सुरु होती. दारुगोळ्याच्या कोठ्याची तपासणी सुरु होती. कोल्हापुर परिसरातील बैलगाड्या धान्य भरुन रोज पन्हाळ्याचा चढ चढीत होत्या. गंगा,जमूना कोठीत छतापर्यंत धान्याच्या पोत्यांची रास लागलेली. गडाचा चोख बंदोबस्त झालेला होता. आणि एके दिवशी लांब पुर्वेकडून मोठी धुळ उडू लागली.गर्जना एकू येउ लागल्या, हिरवा चांदतारा फडकताना दिसत होता. जोहर पन्हाळ्याच्या रोखाने येत होता. पन्हाळ्याचा औरसचौरस आकार लांबूनच नजरेस येत होता.

नजर..

लेखक मन्या ऽ यांनी शुक्रवार, 24/07/2020 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
नजर.. बालपणीचा पाऊस म्हणजे असे मजामस्ती, शाळेत जाण्याची धांदल ,वाहत्या पाण्यात सोडलेल्या कागदी होड्या आणि अवखळ खेळ तारुण्यात तोच पाऊस म्हणजे गुलाबी जग सारे, प्रेमपत्र, चोरटी बावरलेली नजर आणि पावसातली ती घट्ट मिठी उतारवयात पाऊस तोच ; पण नेत्र असतात पाणावलेले, हक्काची नातीही दुरावलेली, कोणीच नसे सोबती; दोन शब्द बोलायला. पाऊस असे तोच. दरसाल तसाच बरसुन जाई वयाप्रमाणे बदलत जाई ती आहे 'नजर' पावसाला अनुभवण्याची! -दिप्ती भगत २५जून,२०१९

अथ स्त्रीलीळा ।

लेखक आजी यांनी शुक्रवार, 24/07/2020 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझी एक मैत्रीण आहे. टू बेडरुममधे राहते. तिला एक नवरा(सुदैवानं एकच असतो.अधिक लफडी करण्याचे गटस् बहुतेक स्त्रियांमधे नसतात.) आणि दोन मुलगे आहेत. (दोन दोन मुलगे म्हणजे तिचा "स्त्रीजन्म धन्य" झालेला आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात तिचा नवरा बेडरुममध्ये बसून लॅपटॉप जोडून वर्क फ्रॉम होम करत असतो. त्याला कॉनकॉल्स असतात. त्याला डिस्टरबन्स चालत नाही. एक मुलगा सेकंड बेडरुममधे आणि एक मुलगा हॉलमधे झूम वगैरेवर ऑन लाईन शिकत असतात. त्यांनाही शांतता लागते. डिस्टरबन्स चालत नाही. मग मैत्रीणीने बसायचं कुठे? तर स्वयंपाकघरात. गुपचूप. घरात टीव्ही लावायचा नाही. गाणी लावायची नाहीत.

राजयोग - २२

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 24/07/2020 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - २१ *** नक्षत्ररायचा छत्रमाणिक्य या नावाने मोठा राज्याभिषेक सोहळा पार पडला. राज्याच्या खजिन्यामधे फार थोडे धन शिल्लक होते. प्रजेचं सर्वस्व लुटून मुघल सैनिकांना त्यांचा ठरलेला मोबदला देऊन परत पाठवाव लागलं. कठीण दुष्काळ आणि दारिद्र्य सोबत घेऊन छत्रमाणिक्य शासन करू लागला. चारी बाजूंनी फक्त आरोप प्रत्यारोप आणि आक्रोशच ऐकू येऊ लागला.

तुझी वाट

लेखक चांदणशेला यांनी गुरुवार, 23/07/2020 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या वाटेवर उभा मी एकाकी डोळे मुके होऊन झाली नजर बोलकी चोरपावलाने हळूच तू येऊन जा पाखरांचे उदास सूर घेऊन जा जाग्या झाल्या भोवती रानसावल्या आकाशवाटा ढगांना बिलगून बसल्या जीवघेणी ओढ तुझी प्राणात दाटली क्षितीजावर उभी राहीली मावळतीची सावली पापण्यांच्या पंखात अश्रूंचे घन भरले प्रितीची आग ह्रदयात ठेऊन गेले
काव्यरस

सोहळा

लेखक मी-दिपाली यांनी गुरुवार, 23/07/2020 15:38 या दिवशी प्रकाशित केले.

 जाई बरसुनी मेघ
 करी धरेशी सलगी
 धरा येता मोहोरुनी
 विरे मेघ तो बैरागी

आसुसल्या धरणीशी
 गाठ पडता जळाची
 बीज अंकुरुनी येई
 कुस चिरीत आईची

 हात जोडुनिया कोंब
 सांगे भूमीचे मार्दव
 जरा थांब क्षणभर
 करी मेघाला आर्जव

 वीण बांधुनी भुईशी
 करी लवलव पाते
 नवलाईचे हे बंध
 झाले नव्हत्याचे होते

नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 23/07/2020 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती.