संध्याखंत
गोफातली एक जुनी चारोळी, प्राजू यांची 'सांज' आणि ऋषिकेशची 'झांज' ही कविता यांच्यापासून स्फुरलेली/बनवलेली/पाडलेली ही मिसळ-कविता :)
"गायी परतुनि आल्या
अवचित झाली सांज
दीप लागू लागले
मंदिरी वाजे झांज
पिले बिलगती आईला
झाड आवरे पाने
क्षितिज लाजले किंचित
रेखीत रंगीत गाणे
सारे काही जिथल्या तिथे
मलाच नाही थारा
विश्व मानिते ज्याला मी
मग्न तो जगदाधारा"
रात्र येई गोकुळी
राधा करिते खंत
कान्हा दिसे ना का कुठे
रुपे जरी अनंत
Taxonomy upgrade extras
मिसळपाव