Skip to main content

तो कवी..ती कवियित्री..

कानडाऊ योगेशु यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
काव्यरस
तो कवी..ती कवियित्री.. ------------------------------------- तो कवी थोर बंडखोर..ती हळवी कवियित्री.. हात एकमेका हाती देवुन हसली मग नियती..

पोटपुजेची ठिकाणे

गणेशा यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
रोमनाचा धागा बघितला .. आणि वाटले ज्याला जिथले पदार्थ आवडतात तो येथे त्या ठिकाणाची माहिती लिहिन .. त्यामुळे केंव्हाही कोठे ही महाराष्ट्रभर फिरलो तरी कळेल की कोठे काय छान मिळते. परवाच एका च्या सांगण्यावरुन .. शिंदेवाडिच्या पुढे कैलास मध्ये रात्री जेवन केले पिठल भाकरी थाली अआणि इतर महाराष्ट्रियन पदार्थ .. जबराट आहे एकदम सगळे .. असो ... खालील माहितीचा बाकीच्यांना उपोयोग होयील असे वाटते. ------------------------------------- मिसळ : १. सिन्नर ची मिसळ ही अतिशय उत्कृष्ठ आहे असे मला वाटते.. नंतर नाशिकची .. २.

अळूवडी

जागु यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य: ८-१० अळूची पाने (धुवुन, मोठ्या पानांचे पाठचे कडक देठ थोडे तासुन) बेसन २ वाट्या अर्धा वाटी तांदळाचे पिठ चिंचेचा कोळ गुळ मिरची पावडर अर्धा ते १ चमचा (तुम्हाला आवडत असेल तसे प्रमाण घ्या) मिठ आल लसुण पेस्ट कांदा चिरुन भाजुन सुके खोबरे किसुन भाजून थोडे कुस्करुन १ चमचा तिळ अर्धा चमचा गरम मसाला किंवा १ चमचा गोडा मसाला तळ्यासाठी तेल पाककृती: अशी ताजी ताजी अळूची पाने घ्या. पानाच्या पाठी देठ असतो थोडा जाडा हे देठ सुरीने थोड

चांगली मिसळ, वडा, भजी कुठे मिळते ?

रोमना यांनी या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली महा-गाई (गायीचा चाराही रु. २/- झाला आहे ) एवढि वाढली आहे की जिभेचे चोचले पुरवायचे म्हंटले, तर नाकी नऊ आणि १ कींवा १/२ नोट संपते. त्यातही जर नवीन पदार्थ चाखायला गेलो, तर पैसेवसूल झाले पाहिजेत अशी चव मिळणे कठीण. तेव्हा अशा मोक्याच्या जागांची यादी जर मिळाली तर अन्नदेवता व लक्ष्मीमातेची कृपाच होईल. मी गिरगांव (गिरणगाव नव्हे) येथे रहात असल्याने, आमच्या जवळची खाद्यभ्रमंती म्हणजे जवाहर मेंशनच्या लगतचा विनय (पूर्वीचे टेंभे) मिसळसाठी प्रसिध्द. रु. २८/- कि ३०/-. गोडट चव, मस्त फरसाण (पण हल्ली डिंमांडमुळे पैसे जास्त व सप्लाय म्हणजे क्वांटीटी कमी झालेली दिसते), वडा ठिक (थोडा गोडट) असतो.

मराठी मुद्दा ....

अवलिया यांनी या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी माणुस यावरुन बरेच वादळ अधुन मधुन उठत असते. ज्यावेळेस जेव्हा जेव्हा मराठी असा संदर्भ असलेला मुद्दा पुढे येतो तेव्हा तथाकथित विचारवंत त्याला नाके मुरडत हा जागतिकीकरणाविरोधी मुद्दा आहे, अशा प्रकारे कुणीही वागु नये इत्यादी मुद्दे उपस्थित करुन मराठी विरोधात मते मांडत असतात. ब्रिटिश भारतात (विशेषतः महाराष्ट्रात ) येण्यापूर्वी इथे (महाराष्ट्र आणि भारतातला बराचसा भुभाग) हिंदू धर्मियांचे राज्य होते. त्याचे कारण महाप्रतापी छत्रपती श्री शिवाजी महाराज हेच होय याबद्दल तरी कुणाच्या मनात शंका नसावी. ज्यांच्या मनात काही शंका असेल त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा.

जागरण गोंधळ : आई देवी अंबेचा जागर मी करीतो

पाषाणभेद यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
जागरण गोंधळः आई देवी अंबेचा जागर मी करीतो
आई देवी अंबेचा जागर मी करीतो जागर करीतो देवी अंबेचा गोंधळ मी घालीतो ||धृ|| आई तू ग माझी गुणी नउवारी पातळ नेसूनी कपाळी मळवट लाल लेवूनी आई बसली सिंहावरी देवी अंबेमातेला वंदन करीतो वंदन करीतो तुळजाभवानीच्या पायी नमीतो पायी नमीतो आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||१|| सुरू होई अश्विन महिना मनी आनंद काही मावेना नवरात्राच्या ग सोहळी नऊ दिवस आरती ओवाळी नऊ दिवसांचे उपास मी करीतो उपास करीतो सप्तश्रूंगीची मी ओटी भरीतो ओटी भरीतो आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||२|| साडीचोळी खणा

" ने मजसी ने परत मातृ भूमीला " या गीताला १०१ वर्ष पूर्ण

चिंतामणी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
उद्या १० डिसेंबर २०१० स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी ब्रायटन च्या समुद्र किनार्यावर १० डिसेंबर १९०९ साली लिहिलेल्या " ने मजसी ने परत मातृ भूमीला सागरा प्राण तळमळला" या गीताला १०१ वर्ष पूर्ण होत आहेत. ज्यांच्या आथक परिश्रमामुळे देशाला स्वातंत्र मिळाल. मरे पर्यंत देशाचीच सेवा करणार्या, आश्या या महान क्रांतीकारकाला विनम्र अभिवादन.