साहित्य :
दोन वाटी तांदूळ, ४ वाट्या बारीक चिरलेला पालक, थोडेसे मसाला व कच्चे शेंगदाणे, ३-४ लाल मिरच्या, पाणी, १ चमचा धने-जिरेपूड, ४ चमचे तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग, ३-४ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी ओले खोबरे, २ चमचे टोमॅटो सॉस , मीठ चवीपुरते.
कृती :
हिरव्या मिरच्या उभ्या चिराव्या . तांदूळ धुवून ठेवावे. पालक पाण्यात ठेवावा , त्यात अर्धा चमचा हळद घालावी. १५- ते २० मिनिटांनी पालक चाळणीवर हाताने काढून ठेवावा. म्हणजे माती पाण्यात खाली बसेल . नंतर चाळणीतला पालक धुवावा. अलगद पाणी पिळून काढावे.