मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[ज्योतिष] दिनांक ४ जाने २०११ रोजीचे सूर्यग्रहण

युयुत्सु ·
दिनांक ४ जाने २०११ रोजी सकाळी ९ वाजून ०२ मि सायन मकर राशीत १३ अंशावर ३८ मि अमावस्या होत असून ही अमावस्या सूर्यग्रहणयुक्त असून वर्षारंभीच होत आहे.

घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात अशी घरे ..!!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
घराच्या खाणाखुणा लक्षात ठेवाव्यात अशी घरे आता राहिलीच आहेत कोठे ..?? आमच्या लहानपणची घरे जशी होती तशीच होती कितीक काळ कुणास ठाऊक.? माडीवरचे बळद कितीतरी जुने असावे पुसलेच जात नाही मनातून सिगारेट ओढणारा फेल्ट ह्यात घालणारा पत्री डब्यावरचा अनेक मुखवट्याचा तो डबा त्यात साठवलेल्या कितीतरी चीनी मातीच्या बाहुल्या लोलक,भवरे आणखीन काय नि काय कितीक काळ तसाच होता पुसलाच जात नाही मनातून ....!! डबल ब्यारलची सायकल होती हर्क्युलसची मस्त दणकट मजबूत ...!! आजोबांच्या काळातली मामा वापरून त्याची मुले वापरू लागलेली तशीच होती कितीक काळ कुणास ठाऊक...?

ए.सी.....ते शी.शी....शाळेला चाललो आम्ही

सुनिल पाटकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शिक्षणापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी सरकारने वाडीवाडीवर शाळा सुरु केल्या.सक्तिच्या शिक्षणाचा कायदाही केला आहे.ज्या देशात श्रीमंतांची मुले ए.सी.शाळेमध्ये शिकतात, त्याच देशात ग्रामीण भागात मात्र शिक्षणासाठी मुलांची फरफट होत आहे प्राथमिक शाळा .वापरात नसलेली बक-यांची गलिच्छ शेड ..त्यामध्ये भरणारी प्राथमिक शाळा..शिक्षण व्यवस्थेत भरडणारी मुलं ..आणि त्यांचं भवितव्य घडविणारा तुटलेला फळा ..हि विदारक स्थिती महासत्ताक बनू पाहणा-या भारतात आजही आहे

सांता कलॉज

पियुशा ·
लेखनविषय:
santasanta
सांता कलॉज
गोड़ गुलाबी कुडकुड नारी थंडी पडली होती ..... पांढरा पांढरा बर्फही भुरभुरत होता ...... घरातल्या ख्रिसमस ट्री वर छोटे छोटे स्टार हलत होते......... मी अन बाबानी रात्रि ख्रिसमस ट्री तयार केले होते ........... सगळे गेले शांत झोपी..... मी एकटीच आईच्या मखमली कुशितुन बाहेर आले अं

क्र. दोन : लष्करे-तोएबा

गांधीवादी ·
स्थळ : पाकिस्ताना-अफगाण सीमेवरील एक गाव. लष्करे-तोयबाची छावणी. वेळ : कोणतीही, सकाळ दुपार संध्याकाळ पात्रे : असेच दहा पंधरा अतिरेकी आजूबाजूला बसलेले. तर, अतिरेकी असेच काहीतरी पुढचा प्लान करीत बसलेले असतात, त्याचा म्होरक्या त्यांना काहीतरी मार्गदर्शन करीत असतो. तेवढ्यात त्यांना दुरून त्यांना त्यांचा एक साथीदार पळत येताना दिसतो. साथीदार कसा त्या मॅराथॉन स्पर्धेत पळत असल्यासारखा जोरात पळत येतो.

अनुभव !!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हाताच्या तळव्याएवढ्या टक्कल असलेल्या गृहस्ताच्या तोंडून शब्दाने तिरकी उडी घेतली , "काग्र्याच्युलेशंस !" बंडोजी धिल्लम मिणमिण हसत म्हणाला , "अभिनंदन !!" गालाला मुठभर खड्डा असलेला गृहस्त नुसताच हसला लक्षच नव्हते त्याचे .कणाकणाने गहाळ होत जाणारे भान .म्हणजे आपण आपल्या ह्या प्रचंड धान्य गोदामात एकटेच आहोत .आपल्या एका सहकार्याने दांडी मारली आहे .आणि काम नसल्यामुळे एकजण पसार झाला आहे.

पं. मल्लिकार्जुन मन्सूर जन्मशताब्दी कार्यक्रम

रमताराम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, जयपूर घराण्याचे दिग्गज गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 'मन्सूर संस्मरण मंच' आणि 'पुणे भारत गायन समाज' यांच्या वतीने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्व संगीत रसिकांसाठी खुला आहे. कार्यक्रमाचे पहिले सत्र शनिवार २५ डिसेंबर २०१० रोजी सकाळी १० वाजता भारत गायन समाजाचे प्रि. केतकर सभागृह (शनिपाराजवळ) येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या सत्रात विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर यांचे गायन होईल. दुसरे सत्र दिनांक २६ डिसेंबर २०१० रोजी सायंकाळी ५.३० वाजता एस. एम. जोशी सभागृह (पत्रकार भवन, गांजवे चौक, शास्त्री रस्ता, एस. एम.

दत्तजयंतीच्या निमित्ताने...

अवलिया ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्टिचे निरुपण माझ्या बुद्धीने देत आहे. हे निरुपण असेच असेल किंवा असावे असा आग्रह नाही. हे निरुपण तुम्ही मानावेच असाही आग्रह नाही. मानल्यास माझी हरकत नाही. या विषयावर चर्चा करण्यास माझी ना नाही.. मी त्यात भाग घेईलच असे नाही. असो. सदर निरुपण मिपावर अंधश्रध्दा फैलावणारे आहे असा संपादकांचा समज होत असल्यास सदर लेखन उडवले तरी माझी हरकत नाही. ही कथा माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज".

|| दक्षिणायण ||

सुहास.. ·
लेखनप्रकार
डिसक्लेमर : लेखकास कुठल्याही प्रांताबद्दल तिटकारा नाही पण रस्सम-भाता ऐवजी 'चटणी-भाकरी' खावुन वाढल्याने महाराष्ट्रावर निस्सीम प्रेम आहे. भारतात आर्य होते की द्रवीड ? (नुकताच आयपीएल मधून बाद झालेला,राहुल नव्हे बरे का) हे इतिहासाचा अभ्यास केल्यावरही मला समजणार नाही, अशी खात्री मला माझ्या अतुलनीय, अफाट आणि आडमाप बुद्धीमत्ते विषयी असल्याने मी त्या भानगडीत पडत नाही, पण काही समाजमान्य थोर इतिहास अभ्यासक विचारवंत व्यक्तींशी (म्हणजे काय हो ?) चर्चा केल्यावर दाक्षिणात्य मंडळी म्हणजे द्रवीड आणि इतर भाग म्हणजे आर्य असा एक समज आहे.