२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती.
या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्टिचे निरुपण माझ्या बुद्धीने देत आहे. हे निरुपण असेच असेल किंवा असावे असा आग्रह नाही. हे निरुपण तुम्ही मानावेच असाही आग्रह नाही. मानल्यास माझी हरकत नाही. या विषयावर चर्चा करण्यास माझी ना नाही.. मी त्यात भाग घेईलच असे नाही. असो. सदर निरुपण मिपावर अंधश्रध्दा फैलावणारे आहे असा संपादकांचा समज होत असल्यास सदर लेखन उडवले तरी माझी हरकत नाही.
ही कथा माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज". या पुस्तकाचे लेखक आहेत - डॉ वासुदेव व्यंकटेश देशमुख. कथा ठळक टाईपात असुन त्यावरचे माझे निरुपण नेहमीच्या ठशात आहे याची नोंद घ्यावी.
एका प्रसंगी आंबेजोगाईच्या परिसरात काही ब्राह्मण दत्तदर्शनाच्या इच्छेने तप करत होते. समर्थांना ओळखून त्यांनी आपला हेतू सांगून त्यांचे साह्य मागितले. समर्थांनी त्यांना "भाव दृढ करा" असे सांगून ते ही त्यांचेजवळ बसले.
कोणताही मनुष्य देवभक्ति ज्या अनेक हेतुंनी करत असतो त्यात देवाचे दर्शन, देवाची माहिती त्याचप्रमाणे मनातल्या सुप्त इच्छांची पूर्ती, कुठे द्वेष भावनेवर आधारीत कुणाचे वाईट व्हावे ही इच्छा तर कुठे सगळ्यांचे चांगले व्हावे ही इच्छा असते. मनातील अनेक भावनांचा विचार करता मनुष्य ज्या काही विविध इच्छा मनात बाळगतो त्या सर्वांचे प्रतिबिंब देव भक्ति या भावनेच्या आविष्कारात आढळते. परंतु वरकरणी मनुष्य मला देवदर्शनाचीच आस आहे, बाकी ऐहिक सुखाची लालसा अजिबात नाही असेच दाखवत गुरुला मार्ग विचारतो. गुरु अशा विविध पद्धतीच्या साधकांना चांगला ओळखुन असल्याने त्यांच्यातले योग्य साधक कोणते हे परिक्षेने ठरवतो.
याकथेत सुद्धा हे रुपकाच्या माध्यमातुन सुचवले आहे. गुरुकडे शरण आलेल्यांकडे हौशे, गवसे, नवसे असतात. त्यातले नक्की कसे कोण आहेत हे काही काळ गेल्यावर समजते. गुरु सर्व साधकांना, शिष्यांना परमेश्वरापाशी भाव दृढ करा असे सांगतात. स्वतः त्यांच्याबरोबर असतात. विविध दृष्टांत आणि कथांच्या सहाय्याने मुल तत्वज्ञानाचा उपदेश देतात. कित्येक शिष्य अशा प्रसंगी आपण गुरुला विचारले काय आणि गुरु सांगतो काय या विचाराने गडबडून जातात. देव आपल्याला शक्ती देईल, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल या आशेने आपण आलो पण इथे गुरुने ही तर वेगळीच पोपटपंची लावली असा अनेक शिष्यांचा ग्रह होतो आणि ते शिष्य अशा गुरुला सोडून जातात. मात्र खरा गुरु त्यांचे सुद्धा भलेच होवो असाच आशीर्वाद देतो. कसे घडते हे आता आपण रुपककथेत पाहू.
एक प्रहर रात्र उलटल्यावर दत्तप्रभू गारुड्याच्या रूपात पत्नी, पाच मुले, हल्यावर लादलेली गोणी,हातात पाच कोंबडे व बोकड अशा परिवारासह तेथे येऊन थांबले.
गुरु शिष्याला या विश्वाचे रहस्य, जीव कोण, ईश्वर कोण आहे हे सांगणार आहे. पण त्याची तयारी आहे का हे पण पाहिले पाहिजे. केवळ काही ऐहिक वस्तुंच्या लालसेने देवाची भक्ती करणारा शिष्य यथार्थ स्वरुप समजुन घेण्यास पात्र नसतोच पण त्याला स्वस्वरुप सांगून काही उपयोग नसतो. म्हणून गुरु त्याला मायेचे स्वरुप समजावुन सांगायचा प्रयत्न करतो. कधी कैवल्याद्वैताच्या मायावादाच्या सहाय्याने किंवा कधी सांख्ययोगाच्या सहाय्याने गुरु समजावुन सांगतो. गारुड्याचे रुपक वापरुन गुरु मूळ पुरुष गारुडी असुन त्याची पत्नी ही प्रकृती आहे असे रुपक मांडतो. पंच ज्ञानेंद्रिये म्हणजे कोंबड्याचे रुपच. कधी कोंबडा पाहीला आहे... दिसेल त्या कोंबडीशी संग करत सतत खाणे, हिंडणे यातच वेळ घालवणारा. पण दुसरा कोंबडा तिथे येताच भांडण करणारा. मनुष्याची पंचेद्रिये विषयांचा भोग घेण्यासाठी अशीच सदैव आतुर असतात. त्यात आडकाठी आली की भडकतात. अजुन हवे अजुन हवे हा सतत घोष चालू असते. कधीही तृप्त न होणारी इंद्रिये अगदी त्या कोंबड्याप्रमाणेच असतात.
माणसाचे मन मोठे विचित्र असते. मी केले मी करेन या अहंभावनेने सदैव ग्रासलेले मन अतिशय अहंकारी आणि उद्दाम असते. कर्तृत्वाचा डांगोरा पिटतांना मूळ स्वभावाशी फारकत घेत मी माझे यात मनुष्य अगदी बोकडाप्रमाणे वर्तन करतो. आपल्याच मस्तीत मश्गुल, संपूर्ण रस्ता स्वत:च्याच बापाच्या मालकीचा आहे हा उद्दाम पणा अंगी बाळगत, उग्र दर्प सोडत बोकड रस्त्याने जातांना बघा म्हणजे तुम्हाला पटेल नक्की काय म्हणायचे आहे ते ! पाच मूले म्हणजे पंचतत्वे. ज्यांच्या सहाय्याने हे विश्व आकाराला आले आहे ते स्थुल आणि सुक्ष्मपंच तत्वे. हल्या हे प्रपंचाचे प्रतिक असुन त्यावर लादलेल्या गोण्या म्हणजे मनुष्याच्या इच्छा आकांक्षाची असलेली गोळाबेरीज.
त्या वेळी बरोबरच्या स्त्रीला "भूक लागली" असे म्हणून स्वयंपाक करायला सांगीतले.
गुरु त्याच्याकडे आलेल्या शिष्याला जगाचे स्वरुप रुपकाच्या माध्यमातुन सांगत आहेत. मूळ पुरुष जेव्हा प्रकृतीच्या सहाय्याने स्थुल आणि सूक्ष्म पंचतत्वाच्या सहाय्याने शरीररुपाने जगात येतो तेव्हा पंचेद्रियांच्या आणि मनाच्या कचाट्यात सापडून त्याचा ठिकाणी कामना जागृत होते. भुक लागली या वाक्याने मला हे हवे, मला ते हवे ही मनुष्याच्या मनात जागृत होणारी सुप्त इच्छा जी पुढे विचार बनुन कृतीला प्रेरणा देते ती जागृत होते असे सांगतो.
तिने एक चूल मांडून तीवर एक हंडी चढविली व कोंबडे , बोकड त्यात कापून घातले तरी हंडी भरत नाही असे पाहून क्रमाक्रमाने तो हल्या व पोरेही कापून त्यात घातली.
जेव्हा मनुष्य आपली इच्छापुर्ती व्हावी म्हणुन धडपडू लागतो तेव्हा विषयांचा भोग घेता घेता त्याला त्यातच गोडी वाटु लागते. भोग संपता संपत नाहीत आणि इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. एक इच्छा
पूर्ण होते न होते तोच दूसरी इच्छा आ वासून उभी रहाते. अक्राळ विक्राळ असा इच्छेचा हा पगडा जणू समस्त प्राणीजगतावर अनादी अनंत काळापासून आहे. इच्छा पूर्ण झाली असे वाटुन सुख वाटते तोच दुसरी इच्छा पूर्ण नाही म्हणुन दु:ख वाटु लागते. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तो पहिलीचे सूख संपते आणि त्यातले दु:ख समोर येते. एक धरावे तर दुसरे सुटते. अक्षरशः जीवाचे रान करावे आणि हातात शून्य यावे अशी अवस्था होत जाते. स्वामी विवेकानंदांच्या शब्दात सांगायचे तर जे तरुण आहेत, ज्यांच्या डोळ्यासमोर भव्य दिव्य स्वप्ने आहेत त्यांना हे लक्षात येणार नाही, पण ज्यांनी चार पावसाळे पाहिले आहेत त्यांना कळेल मला काय म्हणायचे आहे ते. हीच माया. सगळ्यांना जखडून टाकणारी पण त्याचवेळी कर्म करण्यास प्रवृत्त करणारी माया ती हीच.
तरी हंडी भरेना तेव्हा ते पलिकडे बसलेले परदेशी (तपाला बसलेले ब्रह्मण) आहेत असे त्याचे बोलणे ऐकून ब्राह्मण पळून गेले.
अशा प्रकारे गुरु जगाचे स्वरुप सांगतात पण देवभक्ती, गुरुभक्ती केवळ ऐहिक लालसे पोटी आणि काही तरी लाभ व्हावा याच हेतुपोटी करणारे भक्त अशा गुरुला काही कामाचा नाही असे समजुन सोडून जातात. पळून जातात. त्यांना देवाला भेटायचे नसते. देवाचे यथार्थ स्वरुप त्यांना जाणून घ्यायचे नसते. त्यांना हवे असते फक्त इंद्रियांना सुखावणारे सुख. त्याचसाठी ते देवाची भक्ती करत असतात. खरोखर जगात असेच कितीतरी भक्त असतात देवा मला हे दे, देवा मला ते दे असे म्हणत त्याच्याजवळ याचना करणारे. पण देवा मला तु भेटच अशी आर्त विनवणी करणारे किती दुर्मिळ असतात हे आपण जाणतोच.
समर्थ मात्र शांतपणे बसून राहीले, कारण हे कोण आहेत हे त्यांनी ओळखले होते.तेव्हा ते सर्व दृष्य नाहीसे होऊन तिथे श्री दत्तस्वरूप प्रकट झाले. त्यावेळी समर्थांनी त्या ब्राह्मणांनाही दर्शन द्यावे अशी प्रर्थना केली.पण ते सकाम भक्त आहेत त्यांची आत्मसाक्षात्काराची योग्यता नाही असे दत्तप्रभूंनी सांगीतले.पुढे श्रीसमर्थांच्या वाक्यास्तव त्या ब्राह्मणांचे स्वप्नात समाधान केले असे वर्णन आहे.
समर्थांच्या रुपाने एका खर्या भक्ताची, ज्ञानी मनुष्याची आपल्याला ओळख पटते. मायेचे यथार्थ स्वरुप जाणुन सृष्टीतील मिथ्यात्व जाणून लपलेल्या सत्य तत्वाची ओळख अशा भक्ताला पटते. आणि मग मागे लपलेले तत्व त्याला कुणी ब्रह्म म्हणते, कूणी ईश्वर म्हणते, कूणी देव तर कुणी अल्लाह म्हणते ते समोर येते. नव्हे ते काय आहे हे जाणले जाते. समजणे आणि जाणणे ह्या खूप भिन्न गोष्टी आहेत. असा भक्त परमदयाळू असतो, त्याला असे वाटते मला जे समजले, मी जे जाणले ते इतर लोकांना कळावे. भले त्यांच्या इच्छा, आकांक्षा ऐहिक जगातील असु द्या पण त्यांना हे परम तत्व जाणवावे, आकळावे. पण जोपर्यंत मन बाह्य विषयात गुंतले आहे तोपर्यंत हे तत्व जाणवणार नाही. केवळ दिव्यातील तेल संपले म्हणुन जशी ज्योत शांत झाली तसेच केवळ मनातील भावनांना खतपाणी न घालुन संयम केला मन शांत होते. आणि जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत मूलतत्व समजणे अतिशय अवघड आहे. अशक्य आहे.
***
संत एकनाथ दत्ताचे स्वरुप सांगतात. हा दत्त म्हणजे सत्व, रज, तम या त्रिगुणांनी युक्त, निर्माता ब्रह्मदेव, रक्षण कर्ता विष्णू आणि लयकर्ता शिव यांचे एकत्रित रुप आहे. हा संपूर्ण विश्वाचा नियंता, राजा असून ह्याच्यापाशी अज्ञान अजिबात नाही. असे म्हटले जाते की ते अद्वितीय, अनादी अनंत चैतन्य म्हणजेच विश्वाचे सत चित् आनंद स्वरुप कसे आहे हे विचारले की श्रूती केवळ हे नाही हे नाही असे नकारार्थी उत्तर देते कारण ते कसे आहे याचे वर्णन करण्यास मानवी वाणी असमर्थ आहे.
तेव्हा मानवी वाणीतुन उगम पावलेली श्रुती हे नाही हे नाही असेच सांगते. पण याच्यापाशी असे अज्ञान नाही इतकेच काय याचे स्वरुप कसे आहे हे देव, मुनी, योगी यांना ध्यान वा समाधीतुन सुद्धा कळत नाही.
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा
नेति नेति शब्द न ये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥
बाह्य विश्वात आणि आंतर विश्वात तुच केवळ आहेस. पण मी अभागी आहे मला हे समजत नाही, उमजत नाही. विचारांचे सुक्ष्म स्वरुप मनात उगम पावते आणि तिथेच त्याच्यापासुन निरस्त होत मूल स्वरुपाची ओळख न पटल्याने जन्म मरणाच्या फेर्यात अडकुन जातो. अज्ञान हेच जन्ममरणाचे कारण आहे. विवेकाने ज्ञान प्राप्ती झाली की जन्म मरणापासुन मुक्ती मिळते. पण हा विवेक सहजसाध्य नाही.
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त
अभाग्यासी कैसी न कळे ही मात
पराही परतली तेथे कैचा हा हेत
जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥
असा दत्त अचानक माझ्या समोर आला आहे. निर्गुण निराकार परब्रह्म मला सगुण रुपाने समोर दिसल्याबरोबर माझ्या मनाच्या सर्व शंका फिटल्या. त्याने प्रसन्न होऊन मला आशीर्वाद दिला आणि माझा जन्ममरणाचा फेरा संपवला. ज्ञानाने, विवेकाने ते निर्गुण निराकार ब्रह्म माझ्या डोळ्यासमोर साकार झाले. आता कुठला जन्म कुठला मृत्यु ! अनादी मी अनंत मी !
दत्त येऊनिया उभा ठाकला
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला
प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥
मात्र ते निर्गुण निराकार माझ्यासमोर साजिरे रुप घेउन आले आणि आता मला त्याचीच गोडी लागली आहे. माझे मन आता जागृत्,स्वप्न, आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पलिकडे गेले आहे. या अवस्थेत माझे मन उन्मन झाले आहे. यात आता माझे तुझे मी तू हा विषय विषयी हा भेदच उरला नाही. जे जे चेतन असो वा अचेतन, जीव असो वा जड ते सर्व मीच आहे हा भाव आता माझ्या ठि़काणी एकवटला आहे. आणि माझ्या मनात केवळ दत्त असुन त्याचेच निरंतर ध्यान करत आहे.
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन
मी तू पणाची झाली बोळवण
एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ॥४॥
असे हे सर्व घडले ते केवळ त्या गुरुदेव दत्तामुळे. चला त्याची आरती करु त्याला ओवाळु !
आपल्या सर्व प्रपंच्याच्या चिंता त्याच्यामुळे हलक्या होतील, लयाला जातील यात संशय नाही.
जय देव जय देव जय गुरुदत्ता श्री गुरुदत्ता , आरति ओवाळिता हरली भवचिन्ता
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !
श्री गुरुदेव दत्त !!
वाचने
19840
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
_____/\______
जबरदस्त रे नाना
मस्त
खुप छान . धन्यवाद अमोल केळकर
धन्य...
फारच छान
भारतीय तत्वज्ञानानुसार "परा",
In reply to फारच छान by रोमना
धन्यवाद
In reply to भारतीय तत्वज्ञानानुसार "परा", by अवलिया
+१ 'परा' या सूक्ष्म वाणीने
In reply to भारतीय तत्वज्ञानानुसार "परा", by अवलिया
अतिशय सुंदर!!! सिद्धहस्त
इतके सुरेख निरुपण वाचावयास
छान निरुपण. आवडले.
४ शब्द
छान प्रतिसाद, अनुमोदन. अजून
In reply to ४ शब्द by कवितानागेश
सुरेख प्रतिसाद. अवलिया
In reply to ४ शब्द by कवितानागेश
अतीशय उत्तम धागा आणी तितकाच
In reply to ४ शब्द by कवितानागेश
माउ तुझा प्रतिसाद # १
In reply to ४ शब्द by कवितानागेश
त्यांच्या 'बेसिक
In reply to ४ शब्द by कवितानागेश
परत एकदा....
In reply to त्यांच्या 'बेसिक by Pain
भारी
In reply to परत एकदा.... by कवितानागेश
शिबीराचा बराच फायदा झालेला
In reply to परत एकदा.... by कवितानागेश
लवकरच म्हणजे नवीन वर्षाच्या
In reply to शिबीराचा बराच फायदा झालेला by शिल्पा ब
लै भारी. ह.ह.पु.वा.
In reply to परत एकदा.... by कवितानागेश
अवांतरः मेल्यानन्तर पुढचे
In reply to परत एकदा.... by कवितानागेश
+१
In reply to अवांतरः मेल्यानन्तर पुढचे by Pain
++
In reply to +१ by शिल्पा ब
पास
In reply to अवांतरः मेल्यानन्तर पुढचे by Pain
<<<शिवाय आभास, माया, सत्य,
In reply to पास by कवितानागेश
तुम्ही एकाही प्रश्नाचे सरळ
In reply to पास by कवितानागेश
लिमाउजेट
In reply to त्यांच्या 'बेसिक by Pain
कमाल आहे!
In reply to लिमाउजेट by आमोद शिंदे
वा! सावरकरांची ही कविता आणि
In reply to कमाल आहे! by कवितानागेश
स्वा. सावरकरांची "सांत्वन" ही कवीता माहीत आहे का?
In reply to वा! सावरकरांची ही कविता आणि by आमोद शिंदे
काय हो अमोदमामु, उगाच
In reply to वा! सावरकरांची ही कविता आणि by आमोद शिंदे
@ लीमाउजेट : फार खोलवर्चे ४
In reply to ४ शब्द by कवितानागेश
तुम्हाला माउली ही पदवी द्यावी
In reply to @ लीमाउजेट : फार खोलवर्चे ४ by डावखुरा
@टार्झण : कोण बॉ???
In reply to तुम्हाला माउली ही पदवी द्यावी by टारझन
_____/\______
In reply to ४ शब्द by कवितानागेश
या प्रकारच्या कथा अशा
छानच हो नाना!!! अवांतर:
अतिशय सुंदर
दत्तात्रय हरे
वा नाना! सुरेखच हो, प्रसन्न
सुंदर निरुपण
_____/\______
नाना एकदम मस्त................
मनुष्य योनीत याला निरुपण असे
In reply to नाना एकदम मस्त................ by वेताळ
:)
धन्यवाद
सुरेख! निरूपण फार सुरेख केले
अशी गोष्ट असू शकेल, आणि
वा वा
छान निरुपण .आवडले मित्रा
नाना आजोबा, निरुपण
मस्तचं रे नानुडी...
हं - स्पिन डॉक्टर
सहमत
In reply to हं - स्पिन डॉक्टर by सहज
अवलियांनी लिहिले ती शैली
In reply to हं - स्पिन डॉक्टर by सहज
उत्सुकता!
In reply to अवलियांनी लिहिले ती शैली by गवि
हो आपण दिलेला माझा पहिला धागा
In reply to उत्सुकता! by कवितानागेश
वाद
In reply to हो आपण दिलेला माझा पहिला धागा by गवि
हो.. लिहिणार्या व्यक्तीवर
In reply to वाद by कवितानागेश
सहमत
In reply to हो.. लिहिणार्या व्यक्तीवर by गवि
१००% सहमत
In reply to हं - स्पिन डॉक्टर by सहज
उगाच नाही बुवाबाजी वाढत आहे!
In reply to हं - स्पिन डॉक्टर by सहज
जाउ द्या हो !!
In reply to उगाच नाही बुवाबाजी वाढत आहे! by अवलिया
सहमत
In reply to हं - स्पिन डॉक्टर by सहज
सहजराव
In reply to हं - स्पिन डॉक्टर by सहज
स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे.
In reply to हं - स्पिन डॉक्टर by सहज
+१
In reply to हं - स्पिन डॉक्टर by सहज
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
उत्तम
In reply to +१ by क्लिंटन
असे त्यांना अडचणीत टाकणारे
In reply to +१ by क्लिंटन
द्वयर्थी
In reply to हं - स्पिन डॉक्टर by सहज
सहजकाकांची एंट्री आवडली, आमचे
In reply to हं - स्पिन डॉक्टर by सहज
नाना ह्या बुवावाजीच्या
In reply to सहजकाकांची एंट्री आवडली, आमचे by Nile
सहमत आहे. स्वामी विवेकानंद,
In reply to सहजकाकांची एंट्री आवडली, आमचे by Nile
ती गोष्ट सहा आंधळ्यांची
मुळात आंधळेच असणार्यांना
In reply to ती गोष्ट सहा आंधळ्यांची by विजुभाऊ
दोन पैसे:
हा हा हा
In reply to दोन पैसे: by प्यारे१
राजा नागडा आहे
In reply to हा हा हा by कवितानागेश
बाकी मोर नाचताना त्याचा
In reply to दोन पैसे: by प्यारे१
सुंदर
+१
In reply to सुंदर by गुंडोपंत
वाहवा छान चर्चा चालली आहे.
+१
In reply to वाहवा छान चर्चा चालली आहे. by llपुण्याचे पेशवेll
वा! नाना. छान निरुपण. अजुन
वा