मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका रात्री !

मराठे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सोनालीनं धाडकन् खोलीचा दरवाजा उघडला. उद्याच्या परिक्षेची तयारी करण्यासाठी आज रात्रभर तिला जागरण करायला लागणार होतं. तिची रूमपार्टनर नेहा जरा लवकरच झोपायची. त्यामुळे सोनाली पुस्तकं, वह्या वगैरे सामान घेउन ह्या वेगळ्या खोलीत आली होती. ही खोली तशी मोठिच होती पण तळ मजल्यावर, म्हणजे काहीशी तळघरासारखीच होती. त्यामुळे कोणी ह्या खोलीत राहात नसे. सोनालीनं पुस्तकात डोकं घातलं आणि अभ्यास चालू केला. किती वेळ गेला हे कळलंच नाही. कुठलंतरी एक पुस्तक वर आपल्या खोलीतच विसरल्यामुळं ती उठली. रात्रीचे दोन वाजले होते. बराच वेळ बसून अंग आंबून गेलं होतं.

कान्द्या चे चढे भाव आणि मा कृषि मंत्र्यांच्या घोषणे नी भावात आलेले ५० % घसरण. कारण ?

वडिल ·

In reply to by टारझन

अविनाशकुलकर्णी 23/12/2010 - 11:37
लवासा ...ला काहि झाले कि असे होते?का योगायोग?..कांदे महाग होतात..साहित्य संमेलने उधलन्याच्या धमक्या..जाणता राजा चे प्रयोग बंद पडतात

सुनील 23/12/2010 - 01:18
"इतर" हा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मतदान केले नाही. असे समजते की, हिंदू सामुहिकरीत्या जैन धर्मात धर्मांतरीत होणार अशी जोरदार अफवा व्यापारी वर्गात पसरली आणि आता कांद्याला गिर्‍हाईक मिळणार नाही अशा भितीने त्यांनी भाव उतरवले! बाकी, कांद्याच्या निर्यातीवर बंधन आल्यामुळे भाव उतरले, अशीही एक अफवा प्रचलीत आहे!

In reply to by मुलूखावेगळी

टारझन 23/12/2010 - 11:21
तुला गं काय माहित ? :) बाकी त्या ष्टेटमेंट मधे काही अर्थ नाहीये .. :) कारण कांद्याची खरेदी म्हैलामंडळ करतं :)

महेश-मया 23/12/2010 - 11:41
सकाळीच ट्रेन मधे मा. पवार साहेबाना शीव्या दील्यात, अजुन डोके शात झाले नाही, अजुन तापवु नका

गणेशा 23/12/2010 - 17:35
कांद्याचे वाढलेले/कमी झालेले भाव आणि सरकार यांचा तसा जास्त संबंध नाही असे मला वाटते .. उगाचच सरकारचा संबंध जोडला जातो असे वाटते.. पावसा मुळे नुकसान झालेले असल्याने भाव वाढले होते असे वाटते ... कदाचीत हे भाव दलालांनीच वाधवले असतील ही .. त्यांच्यावर कारवाई होउ शकते ह्या बातमीने ही कांद्याचे भाव कमी झाले असु शकतील असो ..

In reply to by गणेशा

चिंतामणी 23/12/2010 - 18:08
किमती नियंत्रणात आणायचे काम कोण करणार? ते जाउ द्यात. सरकारात असलेल्यांच्या शेरेबाजीमुळे एका दिवसात कांद्याचे भाव रू.१०० वर गेले हे तर बरोबर आहे ना.

In reply to by चिंतामणी

किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार नक्कीच मदत करु शकते (किंमत नियंत्रण सरकार करते हे मला माहित नाहि कदाचीत माझा अभ्यास नाहिये त्याचा .. त्यामुळॅ चुकले असल्यास सोडुन देणे ) .. परंतु .. जर अवकाळी आलेल्या निसर्गाच्या संकटामुळे ही भाव वाढले जावु शकतात ... हे भाव सरकारणे नाही तर दलालांनी वाढवण्याची शक्यता जास्त असते असे मला वाटते . ( जे नाशिक मध्ये झाले आहे असे वाटते ) ... पुणे कींवा मुंबईत घरांच्या किंमती .. जागेच्या किंमती खुप वाढल्या आहेत .. याला कारण माणसांचे जास्त प्रमाण आणि जागा कमी पडत आहे असेच आहे .. त्यामुळे तेथील जागेची किंमत बिल्डर आणि दलालांनी पर्यायाने ज्याची जागा आहे त्याने ही वाढवलेली आहे असे माझे मत आहे .. तसेच कांद्याचे असेल असे माझे मत आहे. कृषी मंत्री असलेले आपले नेते .. अन्न नागरी पुरवठा मंत्री पण आहेत .. त्यामुळे जसे उत्पादकांचा फायदा तसेच त्याच्या कस्टमरचा हा ही फायदा त्यांना पहावा लागत असेन हे नक्कीच वाटते .. असो .. जास्त खोल अभ्यास नसल्याने माझे मत चुकीचे वाटल्यास सर्वानी सोडुन देणे .. बाकीच्यांची मते वाचत आहे ..

ईन्टरफेल 26/12/2010 - 19:32
कुठल्याहि पर्यायाला मत देत नाहि ! कारन किति शेतकर्याकडे कांदा शिल्लक आहे? जास्त कांदा व्यापारी साठेबाजांकडेच आहे ! आसे आमचे ठाम मत आहे !

गणपतीला वाजली थंडी

५० फक्त ·
हो ह्या वर्षी म्ह़णजे गेल्या कित्येक दशकांत थंडी पडली नसल्यासारखी जाहिरात चालली आहे, या वर्षी पुण्यात थंडी पडल्याची. आज संध्याका़ळी स्टार माझा या चॅनेलवर बातम्यामध्ये या संदर्भात एक बातमी पाहिली. पुणे येथील सारसबाग तेथे असलेल्या प्रसिद्ध गणपती मंदिरातील गणपतीच्या मुर्तीला गेल्या दहा वर्षांपासुन थंडिच्या मोसमात, चक्क लोकरीचे स्वेटर व टोपी घालतात म्हणे. एक दोन नाही तर चांगले आठ दहा सेट आहेत तेथे. तिथले पुजारी सांगत होते की या दिवसांत देवाला अभिषेक पण गरम पाण्याचा असतो.

किम्म्त .. विचारांची ..

गणेशा ·
लेखनविषय:
सिग्नलला रीक्षात बसललो असताना समोर एक भिकारी आला सुरकतलेला चेहरा अन थरलेला हात करुन नजरेने त्याच्या मन कासावीस झाले दिवसभराच्या घाईगर्दीत विचार कुठे करतो आपण अश्यावेळेस मग हे विचार अगदी डोक्यावर नाचतात विचार..? अन आपन मध्यमवर्गीय यापलीकडे म्हणा काय करु शकतो..? देश प्रगतीपथावर चाललाय.. सेन्सेक्स वाढतोय..मग ही स्थीती का? विचारले मग मी त्याच म्हतार्‍याला का रे बाबा असा भीक मागतोस...? तसा उसळला माझ्यावर मी अवाक..परत विचार आला परिस्थीती मानसास उद्धट बनविते पुन्हा भावूकपणे मी विचारले तेंव्हा नजरेतून भाव सरकण सरकले त्याच्या एका सेकंदात त्यात दिसली त्याच्या जीवनाची व्यथीत कहानी पुढे..

जा जग !! .. (अध्यात्मिक कदाचीत)

गणेशा ·
लेखनविषय:
मी दिसतो तुज फ़क्त निळा सोगा घातलेला आणि शुभ्र अंगरखा पांघरलेला.. ? वेडे.. अन माझी भेट ..? कश्यासाठी .. ? अग डोकाव आपल्या आत.. अंतरात.. दिसेल तेथेही मीच, तुझे शरीराचे जळमट घातलेला... कश्यास हवे आहे तुला अंगारा ते हि त्या तरल ढगांचा ... ढग ..(हसून).. अग ठग आहेत ते क्षणात येथे ..क्षणात तेथे त्यांपासुन का शक्ती हवी आहे तुला ? वेडे तू जगतेच आहे .. फ़क्त जग सर्वांसाठी.. शोध मलाही दुसर्‍यांच्या मनात.. हो आणि म्हनु नको तेथे का पांघरलेत शरीराची जळमटे... रागवलीस ..? बर सांगतो मी मी आहे असाच निद्रिस्त सर्व मानवात.. ओळख माझी अशीच ..

९/११ कारस्थान - काहि शोध

वडिल ·
९ /११ /२००१ हा दिवस ९/११ म्हणुन जगभर प्रसिध्दिस आला. ११ सप्टेंबर ला अमेरीकेतील न्यु यॉर्क शहरातील सर्वात उंच इमारती दोन विमानां चा वापर करुन पाडल्या. ह्या घटने मागे इस्लामी अतिरेकी होते असे जग जाहिर करण्यात आले. गेल्या दहा वर्षात ह्या घटने मागचा शोध चालु आहे पण अनेक गोष्टि संशयास्पद वाटत आहेत. वेब वर अनेक संस्थळे काहि पुरावे देवुन ह्या घटने मागिल सत्यता पडताळुन पहात आहेत. काहि नवे पुरावे पुढे येत आहेत ज्यामुळे अमेरीकन सरकार आणि काहि यहुदि ( ज्यु) लोकं , सि आय ए ( अमेरीकी गुप्त हेर संस्था) आदि ९/११ घटने मागे असावेत असे संकेत आहेत.

अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार

चिंतातुर जंतू ·
लेखनप्रकार
भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाङ्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. वाङ्मयाची आणि कलेची आस्वाद मीमांसा आणि समीक्षा या विषयांतल्या केळकरांच्या काही लेखांचं संकलन या पुस्तकात आहे. म्हैसूरची भारतीय भाषा संस्था (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिअन लँग्वेजेस), मुंबईची राज्य मराठी विकास संस्था, पुण्याची मराठी अभ्यास परिषद अशा संस्थांमागे केळकरांची प्रेरणा आणि त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. वैखरी, मध्यमा वगैरे त्यांची भाषाविषयक पुस्तकंही मराठीत यापूर्वी रसिकप्रिय झाली आहेत.

मंथूनी नवनीता...व्यर्थ कथा सांडी मार्ग।

प्यारे१ ·
सद्ध्या देव, धर्म, ईश्वर, पुराण असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ. बारीक टा.) असे विचारवंत लोकांचे सुरु असते. आणि ज्यांना हे धर आपटणे सुरु असते ते 'बर्‍याचदा' ज्या कौटुंबिक, सामाजिक वातावरणात वाढलो गेलो त्यातून आलेली भोळसट श्रद्धा असणारे, सारासार विचार न करण्याची, तसा विचार करु न देण्याची दडपशाहीची, भीतीची निर्माण झालेली भावना कारणीभूत झालेले लोक असतात. (देवाचे ना करायलाच हवे असे मत, का कशासाठी ते ठाऊक नसले तरी चालेल ) जुन्या भारतीय तत्वज्ञानामध्ये (अर्थातच वैदिक्/हिन्दू) बरेच मतप्रवाह आहेत आणि त्यामध्ये मूळाकडे जाण्याची प्रेरणा जाणून घेण्याचा प्रयत्न सर्व मार्गांमध्ये आढळतो.