मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

९/११ कारस्थान - काहि शोध

वडिल · · काथ्याकूट
९ /११ /२००१ हा दिवस ९/११ म्हणुन जगभर प्रसिध्दिस आला. ११ सप्टेंबर ला अमेरीकेतील न्यु यॉर्क शहरातील सर्वात उंच इमारती दोन विमानां चा वापर करुन पाडल्या. ह्या घटने मागे इस्लामी अतिरेकी होते असे जग जाहिर करण्यात आले. गेल्या दहा वर्षात ह्या घटने मागचा शोध चालु आहे पण अनेक गोष्टि संशयास्पद वाटत आहेत. वेब वर अनेक संस्थळे काहि पुरावे देवुन ह्या घटने मागिल सत्यता पडताळुन पहात आहेत. काहि नवे पुरावे पुढे येत आहेत ज्यामुळे अमेरीकन सरकार आणि काहि यहुदि ( ज्यु) लोकं , सि आय ए ( अमेरीकी गुप्त हेर संस्था) आदि ९/११ घटने मागे असावेत असे संकेत आहेत. मायकल मोर सारख्या डाररेक्टर ने ९/११ फॅरनहाइट नावाचा बोधपट हि काढला आहे. ९/११ मागे कारस्थान हे कुणा १५ इस्लामी युवकांचे नसुन ते बहुतेक एका मोठया गुप्त यंत्रणेचे असावे असे अनेक पुरावे पुढे येत आहेत. गेल्या दहा वर्षात वयैक्तिक रित्या मला हि हे कारस्थान अमेरीकी सिआय ए मधिल काहि लोकांनी घडवुन आणले आहे असे वाटत आहे. ह्या कारस्थाना चा ठोक असा काहि पुरावा अमेरीकी सरकार देवु शकत नाहिये. १५ इस्लामी जिहादि इतक्या मोठ्या प्रमाणावर काहि करु शकतील असे पुरावे नाहित. गेल्या दहा वर्षात "बीन लादेन" नावाच इसम ह्या मागे आहे असे काहि पुरावे नाहित. "बीन लादेन" असा कोणी आहे का नाहि हि सुध्दा शंका आहे. ज्या इमारती पाडण्यात आल्या त्या केवळ २ तासात दोन विमानांनी पाडण्याची शक्यता कमी आहे. त्या अनेक स्फोट घडवुन २० मिनीटाच्या अंतरात पडल्या असे पुरावे आहेत. ९/११ च्या घटने च्या आधि केवळ १ आठवडा ह्या इमारतींचे विमे उतरवण्यात आले होते आणि ज्या लोकांना ह्याचा फायदा झाला ते सर्व ज्यु किंवा उच्च पदस्त सरकारी गुप्त हेर खात्यातील अधिकारी होते. ९ /११ ला पडलेल्या इमारती ( वर्ल्ड ट्रेड सेन्टर) मधे काम करणारे ४५% उच्च अधिकारी हे ज्यु होते पण ९/११ /२००१ ह्या दिवशी सर्व गैर हजर होते. मेलेल्या २००० लोकांन मधे फक्त १०-१५ ज्यु लोकांचा समावेश आहे. ९/११ घटने सारख्या घटने ची कवायत अमेरीकि गुप्तहेर संघटने ने १९९६ मधे केली होती अशी नोंद आहे. असे अजुन अनेक पुरावे आहेत. ९ /११ मुळे सर्वात फायदा जर कोणाचा झाला असेल तर तो जॉर्ज बुश, चेनी आणि त्यांच्या मित्रांचा. शिवाय सर्व जागाकडुन मिळालेली सहानुभुती, अफगाणिस्तान आणि इराक वर हल्ले करण्याचे कारण ! ९/११ चे कारस्थान कोणी रचले हे जरी आत्ता सांगता येत नसेल तरी ते फायद्याचे मात्र जॉर्ज बुश, अमेरीका आणि काहि निवडक ज्यु लोकांचे होते हे खरे ! अमेरीकेचे खरे रुप जगापुढे येत आहे. विकिलिक्स हि ह्याची सुरवात आहे. ( अनेक पुस्तके आणि संस्थळे उपलब्ध आहेत जेथे हे पुरावे उपलब्ध आहेत)

वाचने 15369 वाचनखूण प्रतिक्रिया 95

In reply to by श्रावण मोडक

धमाल मुलगा 22/12/2010 - 20:09
अजुन ष्टार्सची वेंट्री नाय आली(म्हंजे सकाळ नसंल उजाडली..) . पॉपकॉर्न इंटरव्हलच्या टैमाला आणू. सध्या बसल्या बसल्या फक्क्या मारायला चणे-फुटाणे आणलेत आणि चपटी! या हिकडं...ह्या खुर्चीव बसा.. :)

गांधीवादी 22/12/2010 - 19:58
अश्या प्रकारची माहिती मला ४-५ वर्षे अगोदर पासूनच माहित होती. पण पुढे काय ? http://www.911truth.org/ इथे काही माहिती आहे. अवांतर : आपला इथला आयडी केवळ दोनच दिवसापासूनच कार्यरत दिसतो आहे. आपल्याविषयी काही थोडीफार माहिती देता येईल का ?

In reply to by गांधीवादी

सुधीर काळे 23/12/2010 - 14:54
मीही २-३ वर्षांपासून असे अनेक संदर्भ वाचतोय्, यू-ट्यूबवरील व्हीडियोज पहातोय्. पण अजून कांहीं पटत नाहीं. बघू पुढे काय-काय बाहेर येते ते! पण अमेरिकन लोक दुसर्‍यांना मारतील, पण आपल्याच लोकांना असे मारू शकतील असे वाटत नाहीं. इराकवर हल्ला करण्यासाठी त्याल्ला९/११ची गरज नव्हती कारण इराकचा त्या घटनेशी कुणीच संबंध लावल्याचे वाचनात नाहीं. अफगाणिस्तानची गोष्ट वेगळी. क्लिंटनच्या काळापासून दूतावासांवरील हल्ले वगैरे त्यांनी बर्‍याच कुरापती काढल्या होत्या. आशा अनेक सबबी असताना त्यांना ९/११ गरज होती असे वाटत नाहीं!

अनामिक 22/12/2010 - 19:51
या विषयावर हेरंबच्या ब्लॉगवर विस्तृतपणे वाचता येईल. शिवाय लूज चेंज ९/११ ही डॉक्युमेंट्री फिल्म तु-नळीवर उपलब्ध आहे. फिल्म पाहिल्यावर काही मुद्दे असे मांडले आहेत की आपला गोंधळ ऊडतो खरा.

अमोल खरे 22/12/2010 - 20:22
पण अमेरिका हे सर्व करेल असं वाटत नाही. एकतर अमेरिकेला जे करायचं आहे ते सर्व ती बिन्धास्त करु शकते. त्यासाठी ह्या सर्व गोष्टींची काही गरज नाही. पण हे सर्व वाचुन गोंधळ उडतो खरा.

In reply to by अमोल खरे

वडिल 22/12/2010 - 20:38
का बरं ? अमेरीका काहिहि करु शकते... आमच्या इन्दिरा गांधीची हत्या , राजीवजींची हत्या, संजय गांधींची संशयास्पद हत्या हे सर्व काय कोणी भारतीय करेल ? लाल बहादुर शास्त्रीजीं चा गुढ मृत्यु ? या सर्व हत्याकांडान मधे मोठया गुप्तहेर यंत्रणेचा हात असण्याची शक्यता आहे. त्यावर एक वेगळा लेख परत कधी तरी !

सुनील 22/12/2010 - 20:24
कॉन्स्पिरसी थियर्‍यांची जगात कमी नाही! (भारतातदेखिल कॉन्स्पिरसी थियर्‍यांचा एक मोठ्ठा कारखाना मध्य भारतात कुठेशी आहे, असे म्हणतात बॉ!)

वाहीदा 22/12/2010 - 20:41
अमेरिकेची चंद्रस्वारी हे ही एक कॉन्स्पिरसीच आहे चीन अन अमेरिका हे जगातिल सर्वात नीच अन सर्वात मोठे cunning खिलाडी आहेत अन बुश च्या डोळ्यात अन चेहर्‍यातही त्याचा cunningness झळकून येतो. लाख छुपाओ छुप ना सकेगा राज ये कितना गहरा, दिल की बात बता देता है, असली नक़ली चेहरा !!

मराठे 22/12/2010 - 21:04
२६/११ चा हल्ला पण भारताचीच कॉन्स्पिरसी आहे, कसाब हा खरं म्हणजे हिंदू आहे असं काहिसं कुठल्यश्या पाकी दूरचित्रवाणीवर दाखवलेलं आठवलं!

In reply to by वडिल

अर्धवटराव 23/12/2010 - 03:25
कसाब पाकिस्तानि नसुन २६/११ चा हल्ल हा भारतीय गुप्तचर विभागाचे (किंवा एखाद्या हिंदुवादी संघटनेचे) कारस्थान होते हि शक्यता कि पाक टी.व्ही. वर असा प्रचार होतो हि शक्यता? पहिली शक्यता वाटत असेत तर तुम्ही स्वतः या गुप्तचर संस्थांचे काम फार जवळून अनुभवले असेल असं दिसतय... अन्यथा या गंभीर विषयावर एक भारतीय नागरीक फुकाचा तर्कटपणा करणार नाहि (अशी शक्यता मला वाटतेय). (भारतीय) अर्धवटराव

In reply to by बिपिन कार्यकर्ते

पिवळा डांबिस 23/12/2010 - 12:00
सहमत व्हायला प्रत्यवाय नसावा!! -चिंबोरी

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 23/12/2010 - 13:47
बिका आणि पिडाकाका ह्यांनी सहमत असण्याचे मी समर्थन करतो. - छोटा डॉन

अपूर्व कात्रे 22/12/2010 - 21:14
आता २६/११चा मुंबईवरील हल्ला आणि आधीचे भारतावर झालेले इतर दहशतवादी हल्लेही भारतानेच घडवून आणले असल्याचा शोधही लवकरच लाग्न्ण्याची शक्यता आहे.

In reply to by अपूर्व कात्रे

अपुर्व .... जगात काहिहि अशक्य नाहि. अमिताभ बच्चन जीं चा "डॉन" हा सिनेमा तुम्हि पाहिला आहे का? खरा "डॉन" कोण हे शेवट पर्यंत कोणालाहि कळत नाहि.

बिपिन कार्यकर्ते 22/12/2010 - 21:21
९/११ ला आम्ही सौदी अरेबियामधे होतो. आणि अगदी हेच्च आणि अस्सेच्च आम्ही बरोब्बर २-३ दिवसात, ३-४ हैदराबादी बंधू आणि १-२ पाकिस्तानी बांधवांकडून ऐकलं होतं. अर्थात तेव्हाही हहपुवा झाली होती ऐकून... आजही झाली. असो. दिल बहलाने के लिए गालिब खयाल अच्छा है!!!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हे हसण्यावर घेण्या सारख नाहि हो बिपिन साहेब. इथे पुरावे आहेत. दहा वर्ष शोध झाला आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से कि खुशबू आ नहीं सकती, कभी कागज़ के फूलों से... कहीं पे सोज़ है तू(अमेरिका), कहीं पे साज़ है तू (अमेरिका) जिसे समझा ना कोई, वही एक राज़ है तू (अमेरिका) !! ज़माने में हुई है, इन्हीं से हर खराबी बुलाए छाँव कोई, पुकारे धूप कोई बिप्स, हे तुला उद्धेशून नाही, अमेरिके साठी आहे ;-)

वडिल 22/12/2010 - 21:34
जाउ दे हो वाहिदा जी. बहुतेक बिपिनजी त्यांच्या हैद्राबादि आणि पाकिस्तानी बांधवां बद्दल काहितरी द्वेष बाळगुन असतील.

In reply to by वडिल

बिपिनजी कोणाच्याही बाबतित द्वेष बाळगणार्‍यातील नाहीत येथे बरेच द्वेष्टी मिपाकर आहेत पण बिपीन त्यातील नाही. सर्वांबरोबर त्याला ही हेच वाटते की अमेरिका योग्य आहे. इतके वर्षे अमेरिका सर्वांना मुर्ख बनवत आले आहे ज्यांना माहित आहे त्यांना माहित आहे, नाही त्यांना नाही , इतकेच असो ह्ळू हळू जगाला कळून चुकेल अमेरिकेचा असली चेहरा

In reply to by वाहीदा

बिपिन कार्यकर्ते 22/12/2010 - 21:46
पावतीबद्दल धन्यवाद. मला अमेरिकेचे प्रेम नाही. पण अशा थियरीज अक्षरशः दोन दिवसात पसरलेल्या बघितल्या आहेत. आणि अमेरिकेचे दुश्मनही तितकेच गलिच्छ आहेत. त्यामुळे विश्वास बसणे शक्य नाही. असो.

योगी९०० 22/12/2010 - 21:43
मी कोठेतरी वाचलेली भारतातली मोठी कॉन्स्पिरसी..(हॅ हॅ हॅ..) राजीव गांधी यांची हत्या आणि सोनिया गांधी यांना भारतातील राजकारणात आणण्याची ही एक मोठी खेळी आहे (कोणाची खेळी ते लक्षात नाही) . सोनियाच्या कॉग्रेसप्रवेशानंतर लगेचच काही काळात कॉग्रेसचे दोन मोठे नेते, राजेश पायलट आणि माधवराव सिंदिया जे एकदम पॉवरफुल होते, यांचा (घडवलेल्या) अपघातात मृत्यू झाला. त्या दोन नेत्यापासून सोनियाच्या अस्तित्वाला धोका होता. शरद पवारांचा ही नंबर लागला असता पण त्यांनी स्वतः राष्ट्रवादी काढून स्वतःचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून काढून घेतले. कॉग्रेसमध्ये असे बुळे नेते राहिले जे पक्षश्रेष्टीपुढे दबून राहू शकतील. ही सर्व खेळी भारत एक महासत्ता बनू नये म्हणून...त्यामधील एक भाग म्हणजे भारतातील जनतेला अस्थिर करणे (महागाई, बेकारी वाढवून).. वाचायला जरी गंमत वाटली तरी शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by योगी९००

राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे. बघु कधी वेळ मिळतो ते.

In reply to by वडिल

योगी९०० 22/12/2010 - 22:05
राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे. वा..!! लवकर लिहा ..वडिल जी तुम्ही एकदम कारस्थानी दिसता..

In reply to by योगी९००

वडिल 22/12/2010 - 22:27
खादाड माउ जी, प्रत्येक शोधकर्त्या ने किंवा वार्ताहाराने ( जरनालिस्ट) सजग राहुन प्रत्येक माहिती ला त्रयस्त पणे पहाणे जरुरीचे असते. तसेच मी करतो. कुठल्याहि गोष्टि वर १००% विश्वास ठेवणे चुकिचे असते. म्हणुन कुठल्याहि राजकारणी किंवा धार्मिक नेत्या वर कधिहि विश्वास ठेवु नका ! भले लोक तुम्हाला कारस्थानी म्हणो किंवा अजुन काहि !!!

In reply to by वडिल

विजुभाऊ 23/12/2010 - 17:48
राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे लिहा लिहा. एका दिवंगत पंतप्रधानांची हत्या झालीच नाही. म्हणे. अतेरेक्यानी त्यांच्या डमीलाच ठार केले. त्या डमीचा देहसुद्धा मिळाला नाही. मात्र अतीरेक्याचा देह छिन्न्विछीन्न अवस्थेत काहोइना मिळाला. अतीरेक्याचा कॅमेरा सुद्धा एकदम सुस्थितीत मिळाला अर्थात ठार करणारे सुद्धा अतीरेकी नव्हतेच म्हणे.

रणजित चितळे 23/12/2010 - 11:02
भोपाळची वायु गळती अमेरीकेच्या रासायनिक युद्धाच्या तंत्राचा विकास करण्याच्या दृष्टीकोनातून केलेला प्रयोग होता.

In reply to by रणजित चितळे

गांधीवादी 23/12/2010 - 12:09
मी तर बरेच वेळा असेही ऐकले आहे कि 'मनमोहनसिंग नामक कोणी एक गृहस्थ ह्या देशाचे पंतप्रधान आहेत' म्हणे. लोक काय काहीही बोलतात.

राजेश घासकडवी 23/12/2010 - 11:25
राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे.
मी असं ऐकलं आहे की हे तिघंही खरं तर जिवंत आहेत. त्यांचे तथाकथित मृत्यू ही कॉंग्रेसने सरकारी यंत्रणा वापरून निर्माण केलेली नाटकं होती. तसंच महात्मा गांधींची हत्या हेदेखील एक नाटकच होतं, असंही ऐकलं आहे. टिळकांच्या अस्तानंतर लयाला जाणारी मराठी ब्राह्मणांची अस्मिता कायमची खच्ची करण्यासाठी रचलेलं. कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. नक्की कशावर विश्वास ठेवावा कळत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

रणजित चितळे 23/12/2010 - 11:48
कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. सर माफ करा मला पण हे खरे नाही. मी त्यावेळेला ऑपरेशन विजय मध्ये होतो.

In reply to by रणजित चितळे

राजेश घासकडवी 23/12/2010 - 12:25
तुम्ही देखील मला माफ करा, कारण माझा युद्ध घडल्यावर अविश्वास दाखवण्याचा हेतू नव्हता. कॉन्स्पिरसी थियरी मांडणारे उघड सत्य घटनांवर कशा सहजपणे शंका घेतात हे दाखवण्यासाठी काहीतरी टोकाची उदाहरणं घेऊन (तिरकसपणे) मुद्दा मांडत होतो. कॉन्स्पिरसी थियरी मानणाऱ्यांना कुणाचीच उत्तरं पटत नाहीत. कोणावरच विश्वास बसत नाही. कारण प्रत्येक उत्तरात ते खुसपट काढू शकतात. म्हणून ते बहुतेक वेळी हास्यास्पद असतात.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा 23/12/2010 - 11:59
>>कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. >> का? तुम्ही योजना तयार केली होती का काय? बोलण्यात काहीतरी तारतम्य बाळगा. कारगील युद्धात तुमच्या घरातलं कोणी शहीद झालं आहे का? असतं तर तुम्ही असा उचलली बोटं आणि लावली कीबोर्डाला, असा प्रकार केला असतात का?

In reply to by यशोधरा

राजेश घासकडवी 23/12/2010 - 12:29
आधीची उदाहरणं नीट वाचली असतीत तर हे तिरकसपणे लिहिलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असतं. कोणीतरी केलेलं भंपक विधान मी ऐकलं, असं मी म्हटलं. याचा अर्थ मी त्यावर ठामपणे विश्वास ठेवतो असं मानून एकदम चिडू नका. वदंतांचं वर्णन म्हणजे सत्यावर विश्वास असा निष्कर्ष काही तोडफोड करणाऱ्या फलटणीच काढतात असं वाटत होतं.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा 23/12/2010 - 12:33
तिरकस लिहिलंत हे लक्षात आलंच होतं. तरीही काही बाबतीत लेखणी चालवता येते म्हणूनच केवळ, आणि तिरकस बोलता येतेच केवळ, म्हणून तसे करायलाच पाहिजे असे नाही. कारगिल कदाचित काही जणांसाठी केवळ अनेक युद्धांपैकी एक युद्ध असू शकेल, पण काहीजणांसाठी तसे नसण्याचीही शक्यता आहेच. असो. चिडले नव्हते. इतके बेजबाब्दार विधान पाहून खेद झाला, पण चालूदेत.

रणजित चितळे 23/12/2010 - 11:46
कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. सर माफ करा मला पण हे खरे नाही. मी त्यावेळेला ऑपरेशन विजय मध्ये होतो.

नगरीनिरंजन 23/12/2010 - 11:49
धार्मिक धाग्यांवरून लोकांचं लक्ष उडवण्यासाठी स.मं. ने एक आयडी तयार करून असे धागे टाकण्याचं कारस्थान केलेलं आहे आणि याचे पुरावे आहेत. -आजोबा.

In reply to by गांधीवादी

पिवळा डांबिस 23/12/2010 - 12:18
असं काय करताय तीर्थरूप? अमेरिकेला, शुद्धलेखनाला, आणि तार्किकतेला शिव्या घालायला मिपावर पुरावा लागत नसतो!!!

रमताराम 23/12/2010 - 12:48
वडील! (हे सामान्यनाम नाही विशेषण म्हणून वापरतो आम्ही) आणखी एक अमेरिकेचे षड्यंत्र ऐकले होते आम्ही. आपला तो रामसेतू फोडायचा प्लान होता त्यांचा. खरे म्हणजे तिथे थोरियमचे साठे आहेत ते त्यांना चोरायचे होते, बरे झाले ना तो प्रयत्न हाणून पाडला ते. सहज मनात आले की कसे चोरतील ते थोरियम? एक प्रसंग डोळ्यासमोर आला. अमावास्येची रात्र... समुद्रात अमेरिकेच्या एखादी युद्धनौका, चारपाच दुय्यम नौका नि चाळीस पन्नास पडाव. पडाव हळूच भारतीय हद्दीत शिरतात, आपले कोस्ट गार्ड नि नेव्हीचे लोक गाढ झोपलेले... एक दोघे वरिष्ठ - चुकून वडिल लिहिले होते आधी पण गोंधळ नको म्हणून खोडले - अधिकारी त्यांच्या खास बोटीत गुपचूप बसलेले.... तिकडून पडावातून तीन वेळा बॅटरीची उघडझाप होते.... इकडून प्रतिसाद मिळतो... एक पडाव पुढे येतो... त्यातून गोरा अमेरिकन एक डॉलरची अर्धी नोट पुढे करतो.... आपले वरिष्ठ खिशातून दुसरा अर्धा भाग काढून जोडून पाहतात नि अंगठा वर करून सिग्नल देतात... आता उरलेले पडाव पटापट पुढे येतात.. सगळे वीर पटापट समुद्रात उड्या मारतात नि तळाशी जाऊन दणादण खोदकाम सुरू करतात... पडावात भरून थोरियम दुय्यम नौकांमध्ये पोचवले जाते... पहाट होईतो सार्‍या नौका, रामसेतू नि थोरियम सगळेच गायब झालेले असते. अर्थात जाताना त्यांनी सोन्याची बिस्कीटे भरलेली ब्याग वरिष्ठांच्या हवाली केलेली असते. वरिष्ठ खूष... अमेरिका खूष... पाणबुडे खूष... सेतू वहीं बनायेंगे चा नारा देता येईल म्हणून इतरही खूष... एकुण सांगता चांगली होते.

In reply to by रमताराम

पिवळा डांबिस 23/12/2010 - 12:50
वा! तुमच्या कथेवर पिच्चर काढायचाय! रजनीकांतला घेऊन!! विथ अ आयटम साँग फिचरिंग मलाईका अरोरा!! रॉयल्टी काय घेणार, बोला!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

रमताराम 23/12/2010 - 13:03
द्या नाममात्र काहीतरी. अहो पण रजनीकांतला आणि मलाईकाला साईन केल्यावर आमची रॉयल्टी द्यायला पैसे उरतील ना तुमच्याकडे. आणि हो मलाईका त्या फ्रिगेटवर ओबामाबरोबर आयटेम साँग पेश करते आहे असे दाखवा, एकदम नॉवल आयडिया बगा. गाणं कोण लिहून देणार आहे का ते विचारा इथे.

In reply to by रमताराम

श्रावण मोडक 23/12/2010 - 13:31
रामभाऊ, काय हे? पिडांकाका पिच्चर काढणारेत. त्यांच्याकडं मागून मागून नाममात्र काय मागताय? छ्या... आणि वर त्यांनाच विचारताय की, रजनीकांतला आणि मलाईकाला साईन केल्यावर आमची रॉयल्टी द्यायला पैसे उरतील ना तुमच्याकडे, असं? तुम्ही समजता काय पिडांकाकांना? ते अशा पाच-पन्नास रजनीकांतना, मलाईकाला खेळवतात. मला वाटलं होतं पिडांकाकांचा पिच्चर म्हटल्यावर तुम्ही चांगल्या सोन्याच्या विटा वगैरे मागाल. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मागा सोन्याच्या पाच-दहा विटा. एक माझ्यासाठी ठेवा या सल्ल्याची फी म्हणून.

In reply to by श्रावण मोडक

पिवळा डांबिस 23/12/2010 - 13:37
तुम्ही काय लंकेत बदली होऊन गेलांत काय हो हल्ली? नाय, सोन्याच्या विटा वगैरे बोलतांय म्हणऊन विचारतो!!!!:) नाय म्हणजे, श्रावण मोडक (सध्या मुक्काम कोलंबो) असं!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

श्रावण मोडक 23/12/2010 - 22:40
वाटलं की नाही तुम्हाला मी लंकेत गेलो असं! ;) पण ते "सध्या मुक्काम" वगैरे बेक्कार बसला राव. इतकंही हाणू नका ना... :) बाकी, पुण्यातच आहे. त्यामुळं ही अशी सोन्याची विटा वगैरे भाषा.

In reply to by श्रावण मोडक

रमताराम 23/12/2010 - 13:37
काय हे श्रामो. चारचौघात असे म्हणायचेच असते. आता सांगूनच टाकतो. एक थोरियमची वीट देणारे आहेत ते, व्यक्तिगत निरोप धाडला होता त्यांनी. (म्हणजे काय त्या थोरियम मधे त्यांचाही 'कट' असेलच की)

In reply to by रमताराम

श्रावण मोडक 23/12/2010 - 22:49
थोरांचे देणे ते. थोरियमचीच विट मिळणार तुम्हाला. आणि हे आधीच ठरलंय तुमचं असं दिसतंय. म्हणजे आम्ही सान ते सानच राहणार! :(

निनाद मुक्काम … 24/12/2010 - 01:35
पाकिस्तान मध्ये व अरब जगतात ९ /११ चा हल्ला ज्यू लोकांनी घडवला आहे .अशी समजूत तेथील कट्टर पंथीयांनी केली आहे .त्याच धर्तीवर मुंबई हल्ला हे हिंदू व ज्यू लोकांचे कारस्थान आहे असा विखारी प्रचार पाकिस्तानी प्रसार माध्येमे करत आहेत. हेच अरबांच्या गळी उतरू पाहत आहेत .(भारताची आखतात कंपन्या विकत घेण्याची मोहीम पाक्यांच्या जीवावर आली आहे .) तुम्ही अश्या लेखातून त्यांना मदत करत आहात .आज हिरव्या दहश्त्वादाविरूढ जगभरात जनमत बनत आहे ,त्याला आपण हातभार लावायचा कि त्याचा प्रचार करावा ह्याचा विचार वडिलकीच्या नात्याने तुम्ही करावा मिपा वर प्रसिध्द होण्याचे अनेक फंडे येथील दर्दी व जुनी जाणती मंडळी आपणास करतील .तेव्हा आवारा

In reply to by निनाद मुक्काम …

सुधीर काळे 24/12/2010 - 09:40
+१. निनादशी १०० टक्के सहमत! राज्यकर्ते, त्यांचे चमचे (दिग्गी) आणि 'प्रथमपुत्र' (First son-राहुल) हानी करताहेत तेवढे पुरे कीं! आपण कशाला भर घालायची?