Skip to main content

कुठून येतो आणि असा का पैसा खर्च होतो

लेखक छो.राजन यांनी गुरुवार, 29/03/2012 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
मी गेले १५ वर्ष भारता बाहेर राहत आहे. Ankle ची शस्त्रक्रिया अमेरिकेत करून recover होण्या साठी दादर / पुण्याला ५ महिने राहिलो. वेळ municipal निवडणुका ची होती.रोज पापर वाचून मन चलबिचल व्हायचे. पेपर मदगे रोज १०-१२ लोक कार / मुन्किअप्ल truck च्या धडकेने मरतात आहेत. कुठे तेथे KEM / Saasson हॉस्पिटल मध्ये रोग्या ना साधी उशी सुधा मिळत नाही. पण इकडे माझ्या देश्वासियान कडे खूप पैसा आहे. election ला आणि ब्राष्ट नेत्यान पुन्हा निवडून द्याला. आजून रोज loudspeekar वगेरे वेगळेच. कुठून येतो आणि असा का पैसा खर्च होतो? हीच काय जीवन जगण्याची पद्धत आहे?

वळण

लेखक नपा यांनी गुरुवार, 29/03/2012 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या वळणवर, वळताना नजर गेली इथवरच्या मार्गावरती दिसले माझेच पदचिन्हे स्पष्टपणे कधी योग्य, कधी अयोग्य कधी सन्तुलित तर कधी अनिर्बन्ध भयभीत वा निर्भिड थबकलो क्षणभर, स्वत:बद्दलचे समज गैरसमज धुसर झाले हे तर माझेच प्रतिबिंब.. आज़वरचे ..पण अगदि सत्य शहारलो, किती अनभिज्ञ होतो मी स्वत:ला.. वाट माझी खुणवत होती मन मात्र सुन्न होत् सावरलो, अन् पुन्हा लागलो अव्याहत प्रवासाला पूढच्या वळणावर थबकण्या करता..
काव्यरस

असे शब्द होते.. तसे शब्द होते..!

लेखक रसप यांनी गुरुवार, 29/03/2012 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
असे शब्द होते तसे शब्द होते जसा अर्थ घ्यावा तसे शब्द होते कुणा ना कळावे खरे काय होते असे मुक्त वेडे तुझे शब्द होते श्रवून जाहले ते लिहून घेतले ते जपून ठेवले ते खुळे शब्द होते जगी जाणकार कुणी ही असू दे कविता म्हणाया खुजे शब्द होते प्रतिभेस माझे साष्टांग नमन समजलेच नाही कसे शब्द होते अनुवाद व्हावा जरा इंग्रजीत मराठीत बहुदा न हे शब्द होते ऐकता वाचता जाहलो "आडवा" तरीही उरावर उभे शब्द होते..!! (एक जुनीच कविता) ....रसप.... ०३ जानेवारी २००९ http://www.ranjeetparadkar.com/2009/01/blog-post_03.html
काव्यरस

धरणी माय....

लेखक अमितसांगली यांनी गुरुवार, 29/03/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
कत्तल करुनी वृक्षांची, अनाथ केले भू-मातेला, जंगले बांधूनी सिमेंटची, वाकुल्या दाखविल्या निसर्गाला, चक्र असेच दौडले तर, भविष्यातील पिढी विचारेल, हिरवळ म्हणजे काय.....?? नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...?? डोस पाजूनी रासायनिक खतांचे, शोषण केले मातीच्या गुणधर्मांचे हव्यास धरुनी अति -उत्पनांचे, दिवस दाखविले वान्झत्वाचे चक्र असेच दौडले तर, भविष्यातील पिढी विचारेल, सुपीकता म्हणजे काय.....?? नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...?? विवस्त्र करुनी निसर्गाला, हिंस्रपणे ओरबाडले वरून धूर काढला तर खालून पाणी उपसले उत्सर्जन करुनी विषारी वायूंचे , ओझोनचे काळीज फाडले चटके देऊ
काव्यरस

इडंबन की जय हो...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 29/03/2012 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंप्रेरणा :- ज्या http://www.misalpav.com/node/21154 या धाग्या वरुन हे गीत स्फुरले, त्या धाग्याचे हे गीत म्हणजे स्वयं-उपशमनच आहे ;-) भगवंता रे भगवंता,खरच सांग.....हे काय झाले? टाकला होता डोसा मग, आम्लेट कसे बाहेर आले?

रंग...!

लेखक वेणू यांनी गुरुवार, 29/03/2012 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक रंग माझ्या ओंजळीत दिलेस... अगदी हळूवारपणे... हरखून गेले ते रंग पाहताना... माझ्या ओल्या डोळ्यात त्या इंद्रधनूचं प्रतिबिंब तरळलं.... नजर हलेना माझ्याच भरलेल्या ओंजळीवरून... तू : पाहतेस काय? मी : हे...... हे रंग.. कित्ती आहेत!! सुंदर एक- एक... तू : हम्म, तुझेच आहेत मी :सारे? तू : हो मी :काय म्हणू? तू : डोळ्यांनी सांगितलं सारं..

बाळाचा चाळा- कंटाळा !!!!!

लेखक बॅटमॅन यांनी गुरुवार, 29/03/2012 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
नोंदः सध्या मिपावर चालू असलेला कविता, नवकविता आणि विडंबनाच्या जिलब्यांचा पाऊस पाहून आम्ही ही बरेच दिवस आधी पाडलेली ब्लॉगवरील जिलबी सादर करीत आहोत.
काव्यरस

<उगा मारखा>

लेखक रमताराम यांनी गुरुवार, 29/03/2012 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: मित्रवर्य अन्या दातार यांची हीनि कविता नि दुसरी अतृप्त आत्मा यांचेहे विडंबन आणि अर्थातच महिला मंडळाकडून मार खाण्याचे आमचे आजचे भविष्य. मंद बायका त्या कडाडती घरी पती गर्भगळित सदोदित । जसा वनवास करे हतोत्साही तसा सहवास जीवघेणा । दुर्लंघ्य सागर जैसे तुझे मन भलतेच पैलू दावितसे । तुझी-माझी गाठ डोक्याला शॉट निघायची वेळ आता वेणीफणी? टीपः वास्तववादी कविता लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे, जमली नसल्यास आधुनिकोत्तर आहे असे समजावे.

तो

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 29/03/2012 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
तो पोखरतोय आतून............. उत्खननातून; एकेक कविता बाहेर काढतोय.............. कींमती जगणं आणि जगण्याची किंमत ह्यांची तौलनिक मिमांसा करतोय............... खर्‍या खोट्याची आपल्या परक्याची रुजवात घालून देण्यासाठी आलाय तो.................... आयुष्यभराच्या ओळखीचे; परिचय झालेत त्या निमित्ताने................. मुखवट्यापलिकडचे चेहरे दृष्टीपथात आलेत........... झटताहेत सर्वच कर्तव्यापोटी आपापली कामे सांभाळून.................... कुणी; जणीव करून देताहेत आल्याची; एक उपचार म्हणून................ खरं तर आता कार्य थांबलंय................ उपयुक्तताही संपलीय................. अस्तित्व आहे ते केवळ; कुणाच्यात
काव्यरस

विडंबन नीट होण्यासाठी काय करावे ?

लेखक सूड यांनी गुरुवार, 29/03/2012 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली काय झालंय कळत नाही. विडंबनाची कळ येते पण एकदा विडंबनाला बसलं की होत मात्र काहीच नाही. कधी होतंय होतंय म्हणता काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं. कविसंम्मेलन वटी घ्या असं एका हितचिंतकाने सुचवलं पण काहीच फरक पडला नाही. एकाने घाबरगुटीका घ्यायचं सुचवलं, म्हणाला भयरसातली विडंबनं नीट होतील. पण जैसे थे. विडंबन नीट व्हावं म्हणून आपण काय करता ? मला दिवसाला नाही तरी किमान आठवड्यास एक विडंबन होणं गरजेचं आहे. त्याशिवाय फ्रेश वाटणार नाही. कृपया काही उपाय सुचवा.