Skip to main content

रंजनाकडून चिंतनाकडे नेणारा लेखकराजा

हेमंतकुमार यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
वयाच्या विशीत जेव्हा आपण काही पुस्तके वाचतो आणि ती आवडतात तेव्हा त्यांचे लेखक आपल्या मनावर गारुड करतात आणि त्यातले काही तर कायमचा ठसा उमटवतात. वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत इंग्लिश साहित्याशी काही संबंधच आला नव्हता. नंतर मेडिकलला गेल्यानंतर ब्रिटिश लायब्ररीचा सभासद झालो. खरं म्हणजे त्याचा उद्देश अभ्यासाच्या पुस्तकांसाठी होता. परंतु पहिल्याच दिवशी तिथे पाऊल टाकताच लक्षात आले की, अरेच्चा, इथे इंग्लिश गोष्टीची पुस्तके सुद्धा आहेत तर !

लक्ष लोलक तोलत

अनन्त्_यात्री यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लक्ष लोलक तोलत उसळते निळी लाट किनाऱ्याशी फुटताना एक अतृप्ती उत्कट मावळतीच्या दिशेला फूल फुटे केशराचे निळ्या घुमटाला पडे कोडे कुण्या नक्षत्राचे तोल ढळण्या आधीच हस्तिदंती मनोऱ्याचा कोष आवळून घेतो मीच माझ्या भोवतीचा

परखड

नाहिद नालबंद यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
काव्यरस
यामुळे वाट्यास माझ्या रोज परवड बोलतो कायम म्हणे मी फार परखड वेळ येता कर्जमाफीची बळीच्या मग तिजोरी शासनाची जाम खडखड एकही नेता गुणी ना भ्रष्ट सारे भाषणे आता तयांची हीन बडबड इंग्रजीला शक्य तितकी टाळतो मी टिकविण्या करतो मराठी हीच धडपड यामुळे हरकत तयांची लेखनाला वापरत नाही कधी मी शब्द जडजड

दलितांना शिक्षणापासून कुणी वंचित ठेवले होते.

विवेकपटाईत यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ब्रिटिश येण्यापूर्वी आपल्या देशात स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता असा प्रचार ब्रिटीशांनी आणि स्वतंत्रता प्राप्ती नंतर ब्रिटिश धार्जिणी सरकारी तंत्राने ही सतत केला. त्यामागे समाजाला विभाजित करून फूट डालो राज करो हा राजनीतिक उद्देश्य ही होता. पण सत्य कितीही लपविले तरी लपून राहत नाही. आज एआयच्या काळात जुने संदर्भ शोधता येतात आणि सत्य समोर आणता येते. त्याच्याच संदर्भ घेऊन हा लेख उकेरला आहे. सुरुवात वैदिक काळापासून करतो.

कधी निसटले धागे

बिपीन सुरेश सांगळे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
कधी निसटले धागे मज कळलेच नाही कशी उसवली वीण मज कळलेच नाही त्या निवांत भेटी त्या एकांत गाठी डोळ्यांत हर्षाचे झरे अन देहांची मिठी क्षण ते सरले जरी मन ते भरलेच नाही ती मधाहूनी गोड कुठे हरवली ओढ ? अशी कशी मुक्याने मोडली माझी खोड माणसाचे मन ते मज उमगलेच नाही येते रात सजुनी येतो पाऊस अजुनी शालीन थंडी गुलाबी मारते मिठी बाजूनी मग कसा प्रेमाचा ग्रीष्म गेला विझुनी ? काय खरं नि खोटं तू मज वरलेच नाही ?

लकवा

सन्जोप राव यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गावात दादूसारखा दांडगा दुसरा माणूस दाखवायला म्हणून नव्हता. दादूचं नाव दांडगा दादू असंच पडलं होतं. त्याचा बाप रामापण असाच दिसायला काळा वड्ड आणि अंगानं रोमनाळच्या रोमनाळ होता. त्याला ढांग रामा असं म्हणत असत. एवढा पिराएवढा मोठा रामा, पण विहीर फोडताना अचानक रक्त ओकून पाच मिनिटांत मरून गेला होता. दादू त्याच्यासारखाच. बरोबरीच्या गड्यांपेक्षा तो टीचभर उंच होता आणि त्याच्या बंडीला जरा कमी तीन वार मांजरपाट लागत असे. त्याची गर्दन रानडुकराच्या मानेसारखी होती आणि त्याची छाती तेल्याच्या दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या रॉकेलच्या बॅरलसारखी दिसत असे.

एआई वर माझे व्यक्तित्व आणि मी केलेले त्याचे विश्लेषण

विवेकपटाईत यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एआई म्हणजे अंतरजालावर पसरलेला डाटा. त्याचे विश्लेषण करणारे वेगवेगळे अप. प्रत्येक अप वेगळ्या फोर्मुल्या अनुसार विश्लेषण करणार. मी माझ्या व्यक्तित्व बाबत प्रश्न विचारला. उत्तर माझ्या अंतरजालावर असलेल्या लेखणी आणि माझ्या नौकरीच्या माहितीनुसार आले. (माझा स्वभाव, माझे घरात आणि चार चौघात वागणे, माझ्या सवयी इत्यादींची माहिती एआईला नाही). (chatgpt) ने दिलेले उत्तर: आपल्या व्यक्तिमत्त्वाचे मुख्य पैलू १. कर्तव्यनिष्ठ व शिस्तबद्ध :दीर्घकाळ उच्च पदावर काम केल्यामुळे आपल्यात शिस्त, जबाबदारीची जाण आणि निर्णयक्षमता दृढ झाली आहे.

आदिमाया (ऐसी अक्षरे -३४)

Bhakti यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक -आदिमाया लेखक -अशोक_राणा विषय-मातृदेवता आजही जिथे स्त्रीयांववर अमानुषता करणारा समाज अस्तित्वात आहे.तो मातृसत्ताक संस्कृतीची मूळे पूर्ण विसरला आहे. तो समाज सिंधू संस्कृतीतील मातृदेवतांचे उगम वाचायला,जाणून घ्यायला उत्सुक कसा असणार? पण ही सरसकटीकरण करणारी वाक्यं न मानता ज्यांना संस्कृती, संस्कृतीची रूपांतरणे जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचावे. पुस्तकात आर्येतर पूर्व काळातील मातृगणांची ओळख करून देली आहे.

ए०आय० वापरा आणि स्वत:ला ओळखा

युयुत्सु यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ए०आय० वापरा आणि स्वत:ला ओळखा ===================== --राजीव उपाध्ये मंडळी वेगळी वाट चालायची ठरवले की मग चिखलफेक ही आलीच! मग चहुबाजूनी हल्ले होतात - १ला हल्ला होतो आपल्या आत्मविश्वासावर, प्रामाणिकपणावर मग बौद्धिक क्षमतेवर किंवा मानसिक स्वास्थ्यावर. सध्याच्या काळात मानवी तज्ञ पैसे टाकून ही प्रामाणिक सल्ला देतीलच असे नाहीत. आणखी चिंता वाढविणारी गोष्ट म्हणजे वैद्यकीय व्यावसायिकांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दलचे संशोधन वाचल्यावर तर ही शक्यता आणखी धूसर होते. पण ए०आय० बद्दल मात्र मी बराच आशावादी आहे. कारण ए०आय० चुकू शकतो पण तो माणसासारखा खुनशी, दुष्ट नाही.

पुस्तक परीचय-के कनेक्शन्स

राजेंद्र मेहेंदळे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
k नमस्कार मंडळी नुकतेच प्रणव सखदेव या लेखकाचे के कनेक्शन्स वाचुन संपवले. "दिल का हा सुने दिलवाला, सीधी सी बात न मिर्च मसाला, कहते रहेगा कहनेवाला" हे गाणे तुम्ही ऐकले असेल तर हे पुस्तक तसेच आहे. सातवी/आठवीत असलेल्या मध्यमवर्गीय मुलाच्या नजरेतुन हे पुस्तक लिहिलेले आहे.