Skip to main content

एक नविन कॉकटेल बनवले, त्या कॉकटेलला नांव सुचवा....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 04/02/2014 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्याच दिवाळीच्या सुमारास आपला मंगळ कट्टा (http://www.misalpav.com/node/25976) छान पार पडला.तिकडून परत येतांना मला पण काही कॉकटेल्स सुचली.(मंगळाचा गूण...दुसरे काय?)सुदैवाने परतीच्या प्रवासात मी आणि सोत्री एकत्रच बसलो होतो.मला सुचलेले कॉ़कटेल मी सोत्रींना सांगीतले.त्यांनी पण ही संकल्पना उचलून धरली. ऑक्टोबर हीट चालू झाली.आणि मला काही तरी थंड पेय प्यावे असे वाटायला लागले.आणि अशा कडाक्यात आंबा नसेल तर काय अर्थ तरी आहे का? असो. नमनाला थेंबभर तेल खूप झाले. आता जिन्नस.... १. आपल्याला जितकी पचते तितकी व्होडका. २. माझाचा मेंगो ज्युस ३.

पंडित भगवानलाल इंद्रजी

लेखक राही यांनी मंगळवार, 04/02/2014 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
The Asiatic Society of Bombay च्या Gallery of Excellence या नावाच्या एका प्रकाशनामध्ये पण्डित भगवानलाल इंद्रजी यांच्या विषयी एक चरित्रात्मक लेख आहे. हे लिखाण प्रताधिकाराखाली असल्याने थेट भाषांतर देता येणार नाही, पण कदाचित गोषवारा देता येईल. पंडित भगवानलाल यांचा जन्म ७-११-१८३९ रोजी सौराष्ट्रातील जुनागढ येथे झाला. तिथे त्या काळी इंग्रजी शिक्षणाची सोय नव्हती. पण संस्कृत भाषा आणि आयुर्वेदउपचारपद्धतीचे शिक्षण मात्र त्यांना मिळाले. गिरनारच्या वाटेवरील पाषाणलेखाने लहानपणीच त्यांना या विषयी कुतूहल निर्माण झाले आणि पुढे पुराभिलेख आणि नाणकशास्त्राचा अभ्यास हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले.

डोंबिवली कट्टा.... हेमांगी के... ह्यांच्या समवेत....!!!

लेखक विनोद१८ यांनी सोमवार, 03/02/2014 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, श्रीमान मुक्त विहारि यांच्या वनंतीने मी या कट्ट्याचा व्रूत्तांत लिहीत आहे, मिपावर लिहीण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. (काही चूक झाल्यास माफ करावे, ही विनंती.) ठरल्याप्रमाणे हाही कट्टा अगदी व्यवस्थित पार पडला, सगळे म्हणजे श्री. व सौ. हेमांगीके, अजया, मुक्त विहारि, सुबोध खरे, रामदास काका, सूड, भटक्या खेडवाला, भाते इ.

संत मीराबाईची विराणी

लेखक आयुर्हित यांनी सोमवार, 03/02/2014 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
नाते जोडले नामाशी, कधीच मी तोडणार नाही|| पिवळ्या पानावानी दिसे मी जरी, नसे हा पंडूरोग| चोरून करीते उपवास, देईल रामभेटीचे योग|| पकडून माझी भुजा, वडिलांनी वैद्य बोलवला | कळे ना त्या मुर्खाला, हृदयात माझ्या पीळ पडलेला|| जावो वैद्य आपुल्या घरी, माझे नाव काढू नको| विरहाने जळालेली मी अशी, औषध मला देऊ नको|| अंगावरील मांस उतरले, उरला हाडांचा सापळा| बोटाच्या अंगठीत घुसेल, झाला बारीक दंड आगळा|| राहून राहून पापी कोकीळ, समोर प्रियाचे नाव आळवतो| विरहात सांभाळते स्वःताला, प्रियासाठी जीव जाळवतो||
काव्यरस
Taxonomy upgrade extras

पाँचफोरोन दाल (Panch Phoron)

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 03/02/2014 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
अतिशय सोपी व चविष्ट अशी ही बंगाली पद्धतीची डाळ आहे. पाँचफोरोन म्हणजे पाच प्रकारचे जिन्नस ह्यात वापरले आहेत मोहरी, जीरे, बडीशेप, मेथी-दाणे व कांद्याचे बी (कलौंजी).

पांडुरंग

लेखक आतिवास यांनी सोमवार, 03/02/2014 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
बेल वाजली.. ’आत्ता या वेळी कोण?’ चडफडत दार उघडले, तर समोर पांडुरंग - मला म्हणाला, “बोल". कटेवर हात नव्हते, पायाखाली वीट नव्हती, चंदनाचा टिळा नव्हता, भोवती भक्तीचा मळा नव्हता. मी म्हटले, “या, बसा. सुखदु:खाच्या गोष्टी बोलू हवे तर, पण उगीच दांभिक देवत्त्वाचा आव आणू नका.” “हे तर लई बेस झालं" म्हणत तो विसावला, आरामखुर्चीत बसून गॅलरीतून दिसणारा आकाशाचा तुकडा न्याहाळताना हरवून गेला. त्याने मला प्रश्न विचारले नाहीत, मीही नाही. त्याने मला उपदेश केला नाही, मीही नाही. त्याने स्वत:भोवती एक अदृष्य भिंत रचली, मीही तेच केले. माझ्या सहवासात त्याने स्वत:चे एकाकीपण मनमुराद जपले - मीही तेच केले. तरीही आम्ही

उत्तरायण २०१४ - अमुल डेअरी - आणंद (भाग ४)

लेखक मोदक यांनी सोमवार, 03/02/2014 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग १) उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग २) उत्तरायण २०१४ - काsssssssssssssयपो छेssss (भाग ३) गुजरात आणि बडोद्याचा नकाशा अभ्यासताना 'आणंद' वर नजर गेली.. जागतीक कुतुहलाचा विषय असलेली अमुल डेअरी बडोद्यापासून फक्त ४० किमी अंतरावरच आहे! हे लक्षात आल्यावर लगेचच एक पूर्ण दिवस आणंदसाठी राखीव ठेवला गेला. मंगळवार व बुधवार उत्तरायण झाल्यानंतर लगेचच गुरूवारी आणंदला भेट देणे शक्य होते.

१५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश

लेखक माहितगार यांनी सोमवार, 03/02/2014 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार आपणा सर्वांनाच माहिती आहे की १९४७ मध्ये झालेली भारताची फाळणी एक दुर्दैवी घटना होती. पाकीस्तान आणि बांग्लादेशात विभक्त झालेले प्रदेश भारतात उद्या परत आले तर तेही आपल्याला हवेच आहे. जर जर्मनीच पुर्नएकीकरण होऊ शकत व्हिएतनामच होऊ शकत तर भिविष्यातल्या कोणत्यातरी शुभ मुहूर्तावर एक ना एक दिवस पाकीस्तान आणि बांग्लादेशही भारतात येतील अशी आशा करता येईलच. या धाग्याच्या उद्दीष्टाकरता हे शांततामय मार्गाने होत आहे अस गृहीत धरून चालू (इतर मार्गांच्या चर्चेकरता वेगळा धागा काढला जाण्यास माझी ना नाही.) १ अ) समजा तुम्ही एक सामान्य भारतीय नागरीक आहात.

अमेठीची शेती

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 03/02/2014 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
अमेठीची शेती

सांगा कशी फ़ुलावी, तोर्‍यात कास्तकारी
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी

देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला
जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी

पोसून राजबिंडे; आलू समान नेते
उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी

सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी

(व्हॅलेंटाईन डे म्हणलं की निसर्गातील सर्व घटकांना त्रास द्यायला हवा का?)

लेखक विकास यांनी रविवार, 02/02/2014 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाची प्रेरणा ही आणि इतर अनेक. :) बरेच दिवस लिहायचे डोक्यात होते पण राहून जात होते. आता फेब्रुवारी महीना उजाडला म्हणल्यावर जगभर व्हॅलेंटाईन डे चे वारे वाहू लागतात त्यामुळे ही वेळ, या संदर्भातील विचार व्यक्त करण्यास आणि विचारांचे आदानप्रदान करण्यास योग्य आहे; असे वाटत असल्याने आता लिहीत आहे. मिपाकरांनो, कृपया गैरसमज नसुंदेत, पण "आक्षेप हा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासंदर्भात नसून, साजरे करण्याच्या पद्धतीबद्दल आहे". कारण चुकीच्या पद्धतीमुळे निसर्गातील सर्व घटकांना त्रास होतो.