Skip to main content

अंतर्यामी ओरीगामी

लेखक नाखु यांनी सोमवार, 23/11/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.

अंतर्यामी ओरीगामी

गर्दीत त्याला पाहून मी जवळ जवळ त्याचा हात खेचीतच बाजूला घेऊन गेलो. "तू इथे प्रदर्शनात कशाला आलास ?" मी रागाने "तू म्हणालास ना सगळे येणार आहेत म्हणून" तो बिफीकीरीने "मला नाही माहीत कोण कोण आलेय ते" मी खांदे उडवून म्हटलो नेहमीसारखा. तो खटपणे म्हणाला " मला माहीत्येय कोण कोण आलेय ते !!!" " कोण कोण ते सांग चटकन अन मोकळं कर मला " मी अधीरपणे .
"हो हो किंचीत पुरोगामी,किंचीत प्रतीगामी आणि बरेचशे ओरिगामी"
"क्का$$$$$य" मी शक्य तितक्या मह्तप्रतसायाने खालच्या आवाजात ऐक चिडू नको.. "जे स्वतःच्या मताभोवतीच फिरतात

दिवस असे की - कथा

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 23/11/2015 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
-----दिवस असे की - कथा---------------- दुकानातल्या दर्शनी भागामध्ये ठेवलेल्या नव्या को-रया चपलांकडे राहुन राहुन विनुचे लक्ष जात होते . त्याचवेळी आपल्या पायातल्या फाटुन चिंध्या होऊ लागलेल्या चपलांच्या जाणिवेने त्याचे मन खिन्नही होत होते . मनाचा हिय्या करुन त्याने दुकानदाराला चपलांची किंमत विचारली . पण तीस रुपये आकडा ऐकुन आपली निराशा लपवत , मान हलवत तो बाहेर पडला . त्यावेळी तरी त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते . बाहेर पडल्यावर तो स्वताची समजुत घालु लागला . "आपल्या पायातल्या फाटक्या चपलांकडे पाहुन वर्गातली मुले हसतात , आपली टर उडवतात . आपल्यालाही चालताना खुप त्रास होतो .

जगणं

लेखक माहीराज यांनी सोमवार, 23/11/2015 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
आलं सागरा उधाणं पेट घेतला वार्यानं स्वप्न सारीच मोडून खेळ मांडला दैवानं ।। डोळयामंदी दाटलं आभाळ रं      आभाळाच्या मनामंदी काही आगळं पाण्यामंदी पेटलेला जाळ रं       जाळाच्या ह्या ऊभा मागं काळ रं उरलं सुरलं हरलं.. नशिबाचं वारं फिरलं  ।। कुणा मनी जपलेलं सारं चांदणं       चांदण्याच्या छायेखाली मोठं अंगण आन् कुणा मनी काटेरी बाभळं        बाभळीच्या काट्यावानी सारं जीवन कळलं कळलं जगणं.. समदं सारं उसनं ।।
काव्यरस

गाईन मीच गाणी, गर्दभ नका म्हणू...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 22/11/2015 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
जिलब्या इथे कुणाला का आवडू नये? वादात या कुणीही सहसा पडू नये लपला टवाळ कोठे? तू शोधशी मला... हातात आज धोंडा या सापडू नये... गाईन मीच गाणी, गर्दभ नका म्हणू आधीच सांगतो मी, कोणी नडू नये राजाच मी मनाचा, हासू नका कुणी खरडेन लेख माझे, तेव्हा रडू नये.., तूही जरा चरावे, मीही चरेन ना, बेकार भांडणांनी दोघे सडू नये नाहीस तू तरीही आहे निवांत मी, माझ्याविना तुझेही काही अडू नये, वागा हवे तसे रे, जखमा नका करू वाढेल वाद, वाढो, नाते झडू नये ...  नव-हझलकार इरसाल म्हमईकर
काव्यरस

मुंबई-पुणे-मुंबई 2

लेखक समीर_happy go lucky यांनी रविवार, 22/11/2015 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई-पुणे-मुंबई=2 मुंबई-पुणे-मुंबई या आपल्याच गाजलेल्या आधीच्या सिनेमाचा पार्ट-२ म्हणजेच सिक्वेल घेऊन दिग्दर्शक सतीश राजवाडे आलेले असून आधीच्याच कहाणीला पुढे नेत त्यांनी एक उत्तम प्रयत्न सादर केलेला आहे. दिवाळीला एकमेकांसोबतच तीन चित्रपट प्रदर्शित झालेत आणि त्यापैकी दोन मराठी पण सांगण्यात आनंद कि दोन्ही मराठी चित्रपट अक्षरश: पुरून उरलेले आहेत राजश्रीच्या चित्रपटाला. "कट्यार काळजात घुसली" आणि "मुंबई-पुणे-मुंबई २" हे सिद्ध करतात कि चांगले मराठी चित्रपट असले तर आजच्याहि जमान्यात मल्टिप्लेक्सलाहि तिकीट मिळत नाही इतकी गर्दी खेचू शकतात.

सबनीस जिंकले, रसिक हरले!!

लेखक अनिकेत एस जोशी यांनी रविवार, 22/11/2015 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि वाद विवाद हे काही नवे सूत्र नाही. दरवर्षीच होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत वाद निर्माण होत असतात. यातील काही वाद व आक्षेप हे न्यायलयापर्यंतही पोचतात. कधी वाद घालणारी मंडळी ही अधिक आक्रमक असतात आणि आम्ही संमेलनच होऊ देणार नाही अशी टोकाची भूमिकाही घेतात. मग पंचाईत होते. विशेषतः एरवी विष्णुनामाचा, हरीनामाचा गजर करणारे वारकरी रस्त्यावर उतरतात तेंव्हा मग साहित्य संमेलनाच्या आयोजकांनाच अशी भूमिका घ्यावी लागते की जे नियोजित संमेलाध्यक्ष आहेत त्यांनीच संमेलन स्थळाकडे फिरकू नये. तशी वेळ काही वर्षांपूर्वी विख्यात लेखक कादंबरीकार आनंद यादव यांच्यावर ओढवली होती.

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 22/11/2015 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...

धडा

लेखक इडली डोसा यांनी रविवार, 22/11/2015 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
नऊ - दहा वर्षांपूर्वीची गोष्ट . आमच्या कंपनीत आमचा एक ट्रेक करणारा ग्रुप होता. पुण्याच्या आसपास छोटे मोठे ट्रेक करायचो. कधी सकाळी जाऊन संध्याकाळी परत तर कधी मुक्कामी. फार भारी वाटायचं. कुठंही ट्रेकला जाताना नवीन कोणी सोबत येत असेल तर त्याला काय काय सोबत घ्यायचं , काय करायचं , कसं वागायचं याच्या असंख्य सुचना आम्ही द्यायचो. ट्रेकिंग म्हणजे 'अपने बायें हात का खेल'' असं झालं होतं.अशातचं एका मित्राने बातमी आणली कि नाशिक जवळ कुठेतरी दहा पंधरा दिवसांनी एक ट्रेकिंगची स्पर्धा होणार आहे. स्त्री, पुरुष आणि मिश्र अश्या तीन गटांत स्पर्धा होणार होत्या. मग काय आमची ग्रुप जुळवा जुळविची तयारी सुरु झाली.

योजना

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 22/11/2015 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
(पात्रांची मानसिकता खरी असली तरी दुर्दैवाने योजना काल्पनिक आहे) मंत्रीन् बाईंनी फर्मान काढलं तशी कागदं वरुण खाली अन खालुन वरती फिरली. योजनेची ताबडतोब अंमलबजावणी झाली. खेड़ोपाड़ी शिक्षण सेविका पदर खोचुन उभा ठाकल्या. पाट्या, पुस्तकं पोहचली. भत्ते सुरु झाले. शाळात लाइटं लागली. दिवसभर राणात् राबनारी हातं रातच्याला लेखान्या धरु लागली. वर्गा वर्गातून बांगड्याची सळसळ वाढू लागली. पण जेव्हा गणना झाली, टक्केवारी हाती आली तेव्हा बाई हदरल्याच. पाण्यासारखा पैसा ओतून, मोठी फौज उभारुण फ़क्त दहा टक्केच बाया शाळात येतात, हे ऐकून बाईंच्या डोक्यात आग आग झाली.

एक कविता मनाची.......

लेखक मयुरMK यांनी रविवार, 22/11/2015 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
एक कविता मनाची एक कविता जनाची मना वाटते, राजा मी व्हावे जन म्हणती, तू रंकचि रहावे- एक कविता स्वप्नाची एक कविता सत्याची स्वप्न म्हणे, गगनात विहरावे सत्य म्हणे, कदर्मी तू कुजावे - एक कविता नात्याची एक कविता जातीची नाते म्हणे, आमचाच हां स्वकीय जात म्हणे, कोण हां परकीय- एक कविता प्रश्नाची एक कविता क्षणाची प्रश्न म्हणे,मी कधी संपणार नाही क्षण म्हणे, मी कधी थांबणार नाही- ही कविता जीवनाची ही कविता मरणाची जीवन म्हणे, ना मी कुणाची मालमत्ता मरण म्हणे, इथे तर आहे माझीच सत्ता -
काव्यरस