Skip to main content

मुंबई-पुणे-मुंबई 2

मुंबई-पुणे-मुंबई 2

Published on 22/11/2015 - 22:00 प्रकाशित मुखपृष्ठ
मुंबई-पुणे-मुंबई=2 मुंबई-पुणे-मुंबई या आपल्याच गाजलेल्या आधीच्या सिनेमाचा पार्ट-२ म्हणजेच सिक्वेल घेऊन दिग्दर्शक सतीश राजवाडे आलेले असून आधीच्याच कहाणीला पुढे नेत त्यांनी एक उत्तम प्रयत्न सादर केलेला आहे. दिवाळीला एकमेकांसोबतच तीन चित्रपट प्रदर्शित झालेत आणि त्यापैकी दोन मराठी पण सांगण्यात आनंद कि दोन्ही मराठी चित्रपट अक्षरश: पुरून उरलेले आहेत राजश्रीच्या चित्रपटाला. "कट्यार काळजात घुसली" आणि "मुंबई-पुणे-मुंबई २" हे सिद्ध करतात कि चांगले मराठी चित्रपट असले तर आजच्याहि जमान्यात मल्टिप्लेक्सलाहि तिकीट मिळत नाही इतकी गर्दी खेचू शकतात. सुट्टी असो वा नसो पण मराठी चित्रपटांनी आजच्या जमान्यात तिकीट बारीवर शब्दश: अलोट गर्दी खेचणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे दोघंही आधीच्याच भागाप्रमाणे याही भागात असून त्यांनी त्यांची कहाणी पुढे नेलेली आहे आणि आधीच्या भागात त्यांची नावे नव्हती फक्त एक मुंबईचा आणि एक मुंबईची अशी सारवासारव होती पण या भागात नामकरण करून गौतम प्रधान आणि गौरी देशपांडे यांची कहाणी नीटपणे मांडलेली आहे. गौतम प्रधान हा पुण्याचा मुलगा आणि गौरी प्रधान हि मुंबईची मुलगी यांचा विवाहसोहळा संपन्न कसा होतो या धाग्याभोवती वेवेगळ्या अंगांनी फिरणारी कहाणी म्हणजे मुंबई-पुणे-मुंबई २. पण यात समाधान कि कहाणीत कोणतेही फिल्मी ट्विस्ट नाही. वास्तविक बघता अंगद म्हैसकर (अर्णव) च्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना अशी शंका बरेचदा येते आणि त्यातही अभिनेत्री तिच्या निर्णयाबद्दल पक्की राहात नाही त्यामुळे या संशयाला बळकटी मिळते पण सरतेशेवटी चित्रपट "शेवट गोड" करून संपतो. पण सतीश राजवाडे हे लेखक-दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांना थोडेफार कन्फ्युज करण्यात यशस्वी ठरलेले आहेत. चित्रपटाची पहिल्या भागातील लोकप्रियता लक्षात घेता दुसया भागाची लोकप्रियता आधीच आगाऊ ठरवून/अपेक्षित धरून सतीश राजवाडेंनी बरेचसे प्रयोग करून बघितलेत मार्केटींगचे या भागात. बाकी जाऊ देऊ पण खानविलकर कि कोणीतरी या बिल्डर्सची जाहिरात करून देण्याची पद्धत त्यांनी वापरली. अविनाश-विश्वजित या संगीतकार जोडीलाच पहिल्या भागाप्रमाणे याहि भागात राजवाडेंनी रिपिट केलेले आहे. पण पहिल्या भागात "कधी तू" आणि "का कळेना" या दोनच गाण्यांनी जो प्रभाव या जोडीने निर्माण केला होता त्यांच्या १०%हि या वेळेस नाही. मान्य असो वा नसो पण या दोन गाण्यांचे पहिल्या भागाच्या यशातील योगदान दुर्लक्षित करण्यासारखे नव्हते. या वेळेस त्यांना ती जादू री-क्रिएट करणे अजिबात जमलेले नाही. प्रेम आणि त्यानंतर लग्नाची/लग्नासाठी/लग्नापर्यंत इत्यादी इत्यादी जुळवाजुळव हा नाही म्हटले तरी सर्व वयोगटांत इंटरेस्टिंग विषय आहे. यावर मराठी चित्रपटात प्रभाव टाकणारी गोष्ट म्हणजे संवाद (dialogues ) पण अश्विनी शेंडे या लेखिकेने पटकथा आणि संवाद हि दुहेरी जबाबदारी सांभाळूनही दोन्हीकडे उत्तम न्याय केलेला आहे. त्यातही त्यांच्या संवाद लेखनासाठी त्यांचे विशेष कौतुक. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या जोडीला सांभाळत सतीश राजवाडेंनी त्या दोघांकडूनही उत्तम अभिनय करवून घेतलाय पण मागील भागातली अविनाश-विश्वजित हि जोडी संगीत आघाडीवर सपशेल अपयशी ठरलेली आहे. काही प्रसंगात "कधी तू" हे background म्हणून वापरले असते तरी चालले असते असे उगाचच प्रेक्षकांना बरेचदा वाटून जाते. मला सगळंच आवडल विशेष करून संवाद पण संगीताने माझा भ्रमनिरास केला म्हणून मी चित्रपटाला साडे तीन (३१/२)* स्टार देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा. -समीर
लेखनप्रकार

याद्या 4134
प्रतिक्रिया 17

चित्रपटाची पहिल्या भागातील लोकप्रियता लक्षात घेता दुसया भागाची लोकप्रियता आधीच आगाऊ ठरवून/अपेक्षित धरून सतीश राजवाडेंनी बरेचसे प्रयोग करून बघितलेत मार्केटींगचे या भागात.
आम्ही पण ह्या भागाची भिकारता आगोदरच लक्षात घेऊन पहिल्या प्रमाणेच दुसरा भाग देखील न बघणे असा प्रयोग करून पाहतोय. बादवे, पहिला भागाचे तुकडे दोन तीनदा अपरिहार्यतेने पाहावे लागले. राजवाडेंना येवढेच सांगावेसे वाटते, की मुंबईकर आणि पुणेकर हे जन्मजातच असतात. त्यांना आपले पुणेकर किंवा मुंबईकर असणे असे ओढून ताणून आणावे लागत नाही.

तुम्हाला कोणी सांगितलं कि या भागात किंवा मागच्या भागात असा ओढून- ताणून किंवा सहजासहजी कसेही तुम्ही म्हणता तसा फरक दाखवायचा प्रयत्न आहे म्हणून?? तुम्ही बघूच नका कारण ऐकीव माहितीवर समजून न घेता मत बनवणे या कन्सेप्टसाठी तो चित्रपट नाही

In reply to by समीर_happy go lucky

आइशप्पथ समीरभौ. आपण फॅन झालो तुमचे. आता पर्‍या कन्सेप्ट शिकवतंय. तेवढी पण वाचायला मिळंल त्यासाठी अ‍ॅडव्हान्स धन्यवाद.

In reply to by अभ्या..

आता पर्‍या कन्सेप्ट शिकवतंय.
हे आले आमचे हितचिंतक. जरा कुठे आम्ही काही नवीन शिकतोय, आमचे हित होते आहे हे कळल्याबरोबर यांची चिंता वाढली. अभ्या लेका, त्या कोणत्याश्या इन्स्टिट्यूटात चित्रपटाची कन्सेप्ट कशी समजून घ्यायची, चित्रपट कसा बघायचा, आस्वाद कसा घ्यायचा याच्या प्रशिक्षणवर्गाला शेकडो हजारोची फी मोजावी लागते बरे. इथे फुकटात शिकायला मिळतंय ते बघ की.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मापी देवा. तेवढी शिकऊन/शिकून झाली की त्या कन्सेप्टला तुमच्या ब्लॉगावर अगदी वरल्या साईडला, त्या पेनस्टॅण्डापाशी स्थाण द्यावे ही नम्र विनंती.

In reply to by परिकथेतील राजकुमार

णिशेद , अमी इथे तुमचे फटके बघायला आलो होतो . तुम्ही मैदान सोडून गेलात . . त्यामुळे परत एकदा णिशेद

In reply to by समीर_happy go lucky

तुम्हाला कोणी सांगितलं कि या भागात किंवा मागच्या भागात असा ओढून- ताणून किंवा सहजासहजी कसेही तुम्ही म्हणता तसा फरक दाखवायचा प्रयत्न आहे म्हणून??
मी फरक दाखवण्याबद्दल नाही, तर ओढून ताणून आणलेल्या आवेशा विषयी बोलतो आहे. आणि सांगायची गरज नसते हो, पुढे ढिगभर कचरा पडला आहे म्हणजे जवळून जाताना दुर्गंध येणार हे कळतेच की.
तुम्ही बघूच नका कारण ऐकीव माहितीवर समजून न घेता मत बनवणे या कन्सेप्टसाठी तो चित्रपट नाही
बघणारच नाहीये हो. ;) आणि मी सांगतोय ना, पहिल्या भागाचे काही तुकडे बघायला मिळाले म्हणून. ऐकीव माहिती कुठे आली? बाकी, जरा मला कन्सेप्ट समजवून द्याल तर खरंच खूप आभारी राहीन.

अनिवासी असल्याने म्हणून असेल पण कोणताही बरा मराठी शिनेमा आंजा वर आला. कि हपापल्या सारखे बघणे होते. कोर्ट , एकादशी किल्ला असे सिनेमे पहिले , की मुंबई ते चाळ धाटणी चे शिनेमे पाहत असतांना चतुर भ्रमण ध्वनी वरून काय अप्पा चेपू अशी भटकंती चालू असते. त्याने सिनेमा अंगावर येत नाही व मराठी कानावर पडल्याचे सुख मिळते.

आम्ही पण कोर्ट, एकादशी किल्ला पाहीले. ते पाहताना चतुर भ्रमण ध्वनी वरून अप्पा काय चेपू काय अशी भटकंती चालू होती. पिच्चर ध्यान पकडू शकला नाही. त्यापेक्षा पुमुंपु पाहताना अलगद कथेत अडकल्यासारखे झाले. पण काय करायचे. आवड आपली आपली. पण तिकीटबारीवर न चाललेले आणि फेस्टीवलाला अ‍ॅवॉर्ड मिळालेले पिच्चर लै आवडले म्हणावचे म्हंजे आपली पिच्चरची हाभिरूची हुच्च आहे हे ईतरांना कळते.

काही चित्रपट हे इतरांमुळे बघावेच लागतात. पुमुपु - २ हा त्यातलाच एक भिकार चित्रपट. इंटरवेलपर्यंत कसा बसा बरा आहे पण नंतर जणूनबुजुन मुंबैकर मुली लिटरली मंदच असतात असा प्रेक्षकांचा समज करुन द्यायचा विडा लेखक-दिग्दर्शकानी उचलला आहे का असा प्रश्न थेटरातुन सुटका झाल्या झाल्या पडतो.

सहमत! संगीत आणि प्रायोजकांच्या जाहिराती वगळता चित्रपट चांगला आहे.बँड बाजा चे गाणे ऐकून पुलंच्या " समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता "ची आठवण येते.

पहिल्या दिवशीच बघितला. न बघताच टिका करणार्या काही लोकान्मुळे काही फरक पडत नाही. चित्रपटाने उत्तम गल्ला जमवला आहे. नाहितरी कावळ्या शापाने गाय मरत नाही... असे कावळे अस्सयचेच...

काहीही म्हणा. पण, थोराड चेहर्‍याची मुक्ता बर्वे पडद्यावर नकोशी वाटते.... त्याचवेळी तिच्यासमोरचा स्वप्निल नक्कीच भुमिकेत वाहव्वा मिळवून जातो. बादवे, पहिल्या भागात स्वप्निलचं नाव र्‍हिदयमर्दम असं काहितरी असतांना, दुसर्‍या भागात त्याचं नाव गौतम का ठेवण्यात आलंय ते समजलं नाही..

मुक्तापेक्षा स्वप्नीलचा अभिनय वाहव्वा..... वाचून डोळे पाणावले.