जगणं
आलं सागरा उधाणं पेट घेतला वार्यानं
स्वप्न सारीच मोडून खेळ मांडला दैवानं ।।
डोळयामंदी दाटलं आभाळ रं
आभाळाच्या मनामंदी काही आगळं
पाण्यामंदी पेटलेला जाळ रं
जाळाच्या ह्या ऊभा मागं काळ रं
उरलं सुरलं हरलं.. नशिबाचं वारं फिरलं ।।
कुणा मनी जपलेलं सारं चांदणं
चांदण्याच्या छायेखाली मोठं अंगण
आन् कुणा मनी काटेरी बाभळं
बाभळीच्या काट्यावानी सारं जीवन
कळलं कळलं जगणं.. समदं सारं उसनं ।।
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
1054
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख!
छान!