Skip to main content

पुस्तकपरिचय: 'भय इथले...' - आतिवास सविता.

लेखक एस यांनी रविवार, 18/09/2016 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
‘भय इथले... तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव’ लेखिका – आतिवास सविता. आतिवास यांच्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नजर जाताच वाचकाला आतील शब्दानुभवांमध्ये भरलेल्या ताणाचे दडपण जाणवायला सुरूवात होते, इतके हे मुखपृष्ठ भेदक झाले आहे. आणि याचे श्रेय अर्थातच ‘रविमुकुल’ यांना आहे. एका भिंतीवर गोळीबाराच्या असंख्य खुणा आणि शेजारी एक बंद खिडकी. सेपिया रंगसंगतीवर खरवडल्यासारखं शुभ्र रंगातील शीर्षक. जणू भीतीचं सावट पुसण्याचा, जिवंत राहण्याच्या अनिवार ओढीतून केला गेलेला आकांत.

... असंही होतं ना कधी कधी....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 17/09/2016 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
... असंही होतं ना कधी कधी.... अंगणातलं सुखाचं बी बहरातली पाखरांची गाणी हरवून जातात कुठंकुठं.... पण मनाचा सर्च कायम असतो दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार मनातलं मांजर हसतंच कि मजेदार! ... असंही होतं ना कधी कधी.... बियांना कोंब येईपर्यंत आपलाच नसतो पेशन्स ! दु:खाच्या माजणार्या ताणावर आपलाच नसतो कंट्रोल! वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो, पण तशा वैराण रानातही एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! ...

पण नाही होत ना असं!

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 16/09/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
पण नाही होत ना असं! आपण म्हणावं, अंगणात जरा सुखाचं बी टाकून बघू, फुलांच्या बहरात पाखरांची गाणी ऐकू, मऊ गवतावर पडून राहू, डोळे मिटून. पण नाही होत ना असं, जमिनीतच होतं अदृश्य सगळं सुख कुठेतरी एखाद्या बीला येतो कोंब पण तोवर दुःखाचं तण माजलेलं असतं मग आपणच खुरपणी करून नकळत काढून टाकतो तो कोंब न जाणो हेही असेल तणच! आपण म्हणावं, देण्यासारखं आहे काय?

रामदासांचे भारतभरातील ११११ मठ

लेखक दासबोध.कॊम यांनी शुक्रवार, 16/09/2016 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
स्मार्टफोन, गूगल मॅप्स , रस्ते, वीज, घड्याळे, वहाने यांपैकी काहीच नसताना समर्थ रामदासांनी भारतभर उभ्या केलेल्या व आजवर टिकलेल्या एका जबरदस्त अद्भुत "इंटेलिजन्स नेटवर्क" ची अभ्यासपूर्ण कहाणी... समर्थांनी भारतभर उभ्या केलेल्या ११०० हून अधीक मठांमधील कही प्रमुख मठांची यादी समर्थशिष्य गिरीधर स्वामी लिखित समर्थप्रताप या ग्रंथात येते... त्यावरून बनविलेला नकाशा नमस्कार!

सुख म्हणजे काय असते?

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 16/09/2016 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
सुख म्हणजे काय असते? - निनाव (१६.०९.२०१६) सुख म्हणजे काय असते? ओंजळीत भरलेले पाणीच जणु! जमवले तर बसते लहानश्या जागेत, सोडले जर का सैल, जाते वाहून नवीन काठ शोधत - न सापडणारे!
काव्यरस

टाटा मोटर्स कस्टमर केअर...मराठी इल्ले

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 16/09/2016 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
हा अनुभव आहे त्यामुळे कंपनीचे नाव लिहिले आहे. मध्यंतरी माझी नॅनो मी ओफिसातुन घराकडे येताना संध्याकाळी रस्त्याच्या मधोमध बंद पडली. कशीबशी ढकलत कडेला लावली व रिक्षा करुन मग घरी आलो. रात्री टाटाच्या कस्टमर केअर ला फोन लावुन पुढे टोईंग बाबत विचारणा केली.पलिकडुन उत्तर आले कि थोड्या वेळात कॉल करु म्हणुन.एकुण तक्रार धसास लावण्याचा प्रकार कौतुकास्पद आहे. त्याबद्दल काही तक्रार नाही. पण नंतर कस्टमर केअरमधुन फोन यायला चालु झाले. सुरवात कन्नड मधुन.

अवधूत (भाग-१०)

लेखक प्रभास यांनी शुक्रवार, 16/09/2016 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
अवधूत भाग - 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 त्या भटक्या लोकांच्या तळावरुन