Skip to main content

माणूस आणि एकलेपण

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/11/2017 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे माणूस नात्यांमुळे एकटा पडत नाही. दु:खातच नव्हे तर सुखाच्या दिवसातही माणसाला आपल्या माणसांसोबत रहायला आवडते. विवाहाचा समारंभ जसा एकट्याने साजरा करता येत नाही, कमीतकमी वधूवरांचे दोन कुटुंबे आणि दोन मित्र तरी त्यात सामील असतात, तसा माणसाचा शेवटचा दिवसही म्हणजे अंत्यविधीही कोणाला एकटेपणाने उरकून घेता येत नाही. माणसाच्या पार्थिवाला उचलायला कमीतकमी चार खांदे द्यावे लागतात. सारांश, सुखाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी माणसाला नातेवाईक लागतात आणि दु:खाचे सांत्वन करण्यासाठीही माणसाला आपुलकीचे नातेवाईक लागतात. माणूस या जगात एकटा असू शकेल का?

चंद्रमण्यांचे पाझर

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 15/11/2017 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या ओंजळीत चंद्रमण्यांचे पाझर भले विझून जाऊदे माथ्यावर चंद्रकोर पायतळी आज माझ्या अब्ज-रंगी पखरण भले अंधुक होउदे इंद्रधनूची कमान आज माझ्या रोमरोमी ब्रह्मकमळ फुलेल कोडे गहन कधीचे विनासायास सुटेल
काव्यरस

हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 15/11/2017 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या जगण्यासाठी अत्यावश्यक असलेली आणि आपल्याला प्रत्येक क्षणी मिळालीच पाहिजे अशी गोष्ट कोणती? क्षणाचाही विचार न करता या प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे – ते म्हणजे ऑक्सीजन (O2) ! पर्यावरणातील O2 आपण श्वसनाद्वारे फुफ्फुसांमध्ये घेतो. आता हा O2 शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचवण्याचे काम एक वाहतूकदार करतो आणि तो आहे हिमोग्लोबिन. हे एक महत्वाचे प्रथिन असून त्याचा कायमचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट लालपेशी.

काल: क्रीडति (भाग ३) - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी बुधवार, 15/11/2017 06:28 या दिवशी प्रकाशित केले.
काल: क्रीडति (भाग ३) - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय. भाग १ - आठवड्याचे सात दिवस. भाग २ - अधिकमास आणि क्षयमास. एक चान्द्रमास (एक अमावास्या ते पुढची अमावास्या) २९.५३०५८९ दिवसांचा (प्रत्येकी २४ तासांचा मध्यम मानाचा दिवस) असतो असे पूर्वी लिहिलेले आहे. म्हणजे चान्द्रमास तीस दिवसांहून सुमारे अर्धा दिवस कमी आहे. अमावास्येला चन्द्र आणि सूर्य एकाच रेखांशावर असतात आणि एकाच वेळेस मावळतात.

गूढ अंधारातील जग -२

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 14/11/2017 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -२ मूळ पाणबुडी या शाखेची गरज काय आणि तिचा हेतू किंवा उद्देश काय हे आपण समजून घेऊ. युद्धाचा मूळ हेतू म्हणजे आपल्या शत्रूचे आर्थिक शारीरिक /सामरिक आणि मानसिक खच्चीकरण करणे. जी गोष्ट सामोपचाराने सुटत नाही(साम) तिच्यासाठी पैसे मोजून(दाम) काम होत असेल तर ठीक ते जर होत नसेल तर दंड (युद्ध) आणि भेद (शत्रूला एकटा पाडणे) हे आपले काम करण्याचे उपाय अनादिकालापासून तत्वज्ञानात सांगितले आणि वापरले गेले आहेत. यात लष्कराचा किंवा कूटनीतीचा भाग दंड आणि भेद यात केला जातो.

शिवांबू कल्प विधी

लेखक mantarang यांनी मंगळवार, 14/11/2017 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
================================================= अस्वीकरण (डिस्क्लेमर) : या लेखातील मजकूरासंबंधात मिसळपाव कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही. खुद्द लेखकानेही मजकूरात "अनेक अतिशयोक्त गोष्टी आहेत" असे लिहिले आहे.

अहेवपण ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 14/11/2017 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
कातरवेळी अस्वस्थ मनाला दुरच्या दिव्यांची वाटे आस स्तब्ध-निःशब्द सूर्यास्तवेळा कितीक स्मरती हळवे भास उगाच ओठी शब्द अडकती दूर कोणी कोकिळ बोलतो तुडुंब मनाचे आगर भरतां उद्रेकाला मग वाट शोधतो नाद खगांचे, स्वर समीराचा कातळडोही अनाम खळबळ विजनवास व्रतस्थ मनाचा गर्द सावल्या सावळ सावळ पैलतीरी उभे दुत प्रकाशी कुणी छेडले सनईचे सूर अहेवपण सजले सरणावर प्रिया मनी हे कसले काहूर? © विशाल कुलकर्णी
काव्यरस

असतेस घरी तू जेव्हा...(विडंबन काव्य)

लेखक OBAMA80 यांनी मंगळवार, 14/11/2017 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप खरे व सलील कुलकर्णी यांची प्रथम माफी मागून सादर करतो आहे त्यांच्या "नसतेस घरी तू जेव्हा" चे विडंबन...... असतेस घरी तू जेव्हा **************** असतेस घरी तू जेव्हां जीव घाबरा घुबरा होतो जगण्याची विरते आशा संसार नकोसा होतो असतेस घरी तू जेव्हां ...../1/ नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ग होतो घराची तावदाने फुटती अन भितींना कंपही सुटतो असतेस घरी तू जेव्हां ...../2/ येतात मुले दाराशी, हिरमुसून जाती मागे खिडकीशी थबकून भैय्या मग कपड्यांवाचून जातो असतेस घरी तू जेव्हां ...../3/ तुज घाबरून घालविलेल्या मज स्मरती लाखो वेळा तव पैशांने घर हे चालते म्हणूनच तुला ग झेलतो असतेस घरी तू जेव्हां ...../4/ त
काव्यरस

#एकादशी #

लेखक सतिश गावडे यांनी मंगळवार, 14/11/2017 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला तारी भवसागरी करी मज मोकळा देई तुझ्या रे चरणी तू ठाव मला झालो चिंब भक्तीत मीपणा नुरला माझा देह हा चंदनाचा रे झाला नामाचा गोडवा माझ्या ओठी आला पामर रे तुझा हा भक्ती रस प्याला पाहूनी राधेसी तुझिया रे अंकावरी होई रुकमाई रे कावरी बावरी झाले सहन न तिला आली दिंडीरवनाला देवा आला तू पाठी समजूत घालण्याला पाहूनी झोपडी रे चंद्रभागेतीरी देवा क्षण दोन क्षण तू थबकला देवा क्षण दोन क्षण तू थबकला आतून वीट फेकली पुंडलीक बोलला तू थांब मातापित्याची सेवा करु दे
काव्यरस

!! बालदीन !!

लेखक नाखु यांनी मंगळवार, 14/11/2017 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
!!बालदीन !! असूया वाटते​ बघुनीया माथी केशसंभार कसा आनंद घेऊ या तरूण मुलांसवे लोपलेल्या केशकुंतलांच्या परागंदा मुळापासून मिळते तुम्हा सुख नित काका अंकल संबोधून किंचित केशकर्तनाचा कृष्ण दिवस आज मस्तक वाळवंटी म्हणती त्यास खालदिन छप्पर असता भाळी,मान वळे तारूण्याची नजर देतसे दाद, नित देव कोंबड्यांची शिलकीच्या तबल्यासम बालतळावर स्कॉलरपणाची सुरेख नक्षी काढू अनुभवांचे मीपण करूनी दिवसाही तारे तोडू उद्याचे आदर्श नागरिक आजच (हि) घडवू -झुल्पांकित (संतप्त खात्री कैवार पसार ) २२ जून २०१७