लेखकचामुंडराययांनी रविवार, 26/08/2018 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
तांब्याश्री
ऋणनिर्देश : मिपावरील सूप्रसिद्ध ( कि शीप्रसिद्ध म्हणावे ब्रे) तांब्याश्रीं पासून प्रेर्र्रना घेऊन खटपट करून जमवलेले मोकल शौचाव्य.
थीमनिर्देश : अशा प्रकारच्या विषयासाठी मूळ कवीचा नामोल्लेख टाळला आहे.
लेखकPrakashputraयांनी शनिवार, 25/08/2018 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
दोन पेग झाल्यानंतर, जेव्हा दोन पेगचे लिमिट म्हणून तिसरा प्यायचा नव्हता, पण ग्लासात काहीतरी पाहिजे होते, म्हणून मी नुसताच सोडा ओतला तेव्हा सुचलेली कविता
मी स्वतःला फसवायला खूप प्रयत्न करतो !
आणि दरवेळेला स्वतःच फसतो !!
दरवेळी जिंकायचा प्रयत्न करतो, !
मग मीच जिंकतो आणि मीच हरतो !!
स्पर्धा कुणाशी आहे तेच कळत नाही !
तरी उगाचच लढत बसतो !!
मी शहाणा म्हणून मलाच समजावत बसतो !
मी वेडा म्हणून माझ्याशीच भांडत बसतो !!
क्षुद्र आयुष्याला अर्थ द्यायचा म्हणून !
भव्य तत्वज्ञान मांडत बसतो !!
शिस्तीच्या नावाखाली तिसऱ्या पेगला !
नुसता सोडा म्हणत बसतो......
लेखकPrakashputraयांनी शनिवार, 25/08/2018 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकदा घराबाहेर पोर्चमध्ये उभा होतो. वरती एक कोळ्याचे जाळे होते. अचानक मानेवरती एक कोळी पडला. त्याला झटकून काढायला गेलो तर तो खूप जोरात चावला. विषाची काही reaction होईल का या आधी 'आपण स्पायडर - मॅन होऊ का ? हा सुखद विचार पहिल्यांदा मनात आला' ----- तुम्हाला असं कधी होते का ?
खूप उत्तेजित होऊन हि आनंदाची बातमी मी बायकोला सांगायला गेलो. आपण सुपरहीरोची बायको होणार याचा आनंद व्यक्त करण्याऐवजी तिने मला हे विचारलं कि , "ती कोळ्याची जाळी मी होऊनच कशी दिली ? " आणि "आता तरी मी जाळी साफ केलीय का ?".
लेखकदुर्गविहारीयांनी शुक्रवार, 24/08/2018 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तविक गड-किल्ले म्हणजे संरक्षणासाठी उभारलेली लष्करी ठाणी. सहाजिकच सैन्याला उपयोगी पडेल आणि संरक्षणाचे काम चोख होईल हि काळजी घेणे याची प्रार्थमिकता असते. भक्कम तटबंदी, त्यातून पुढे आलेले बुरुज, चर्या, फांजी, खणखणीत महाद्वार, शेवटचा पर्याय म्हणून असलेला चोरदरवाजा. मात्र काही गडांच्या भाळी यापेक्षा जास्त भाग्य येते. त्यांचा निर्माता फक्त कोरड्या सैनिकी दृष्टीकोनाचा नसतो, तर हळव्या मनाचा कलांवंत असतो. तो गडाची रचना करताना एखादी बारादरी उभारतो, तटबंदीलाही कलात्मक रुप देतो, तटबंदीतील सज्जालाही एखादी महिरप ठेवतो.
लेखकखटपट्यायांनी गुरुवार, 23/08/2018 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
संडास
नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी मिपावर लेखन करतोय. आणि पुनरागमनासाठी विषय आहे संडास.
काहीलोक लेखाचं नाव वाचूनच नाकं मुरडतील. मला एक कळत नाही संडास सारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलायला लोक लाजतात किंवा घाबरतात का? तसं पाहायला गेल्यास संडास ही आपल्या रोजच्या जीवनातील अतिशय महत्वाची क्रिया पण त्यावर किंवा संडासच्या समस्यांवर बोलायला लोक तयार नसतात.
शी!!! संडास वर मेलं काय बोलायचं!!!
एकवेळ माणूस दोन दिवस उपाशी राहील पण संडासला गेल्याशिवाय राहणार आहे का? अर्धा जीव होईल त्याचा. शौचाचा त्रास असणारे कितीतरी लोक मी चिडचिड करताना पहिले आहेत.
लेखकटर्मीनेटरयांनी गुरुवार, 23/08/2018 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
/* W3.CSS 4.13 June 2019 by Jan Egil and Borge Refsnes */
html{box-sizing:border-box}*,*:before,*:after{box-sizing:inherit}
/* Extract from normalize.css by Nicolas Gallagher and Jonathan Neal git.io/normalize */
html{-ms-text-size-adjust:100%;-webkit-text-size-adjust:100%}body{margin:0}
article,aside,details,figcaption,figure,footer,header,main,menu,nav,section{display:block}summary{display:
लेखकस्मिता दत्तायांनी गुरुवार, 23/08/2018 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज वयाच्या साठाव्या वर्षी मी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि बॉम्बच पडला सगळ्या घरात !नवरा-बायको म्हणून पटत नव्हतंच कधी., ते सारे ओढून ताणून चाललंय हे तर जगजाहीर होते. पण एकदम घटस्फोट? इतकी वर्ष एकत्र काढल्यावर हा असा विचित्र निर्णय घेण्याचं कारण काय? सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला. इतकी वर्ष जमवून घेतलं ना त्याच्याशी ? मग आयुष्याच्या या टप्प्यावर जेव्हा आपल्याला एकमेकांची ,एका साथीदाराची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा आता हे असं वेगळं राहून काय मिळवणार आहेस तू ? आणि प्रमोद चा काही विचार करशील की नाही? नातवंडं, मुलं ,सुना ,नातेवाईक मंडळी, समाज, बापरे किती लोक? इतक्या सगळ्यांना समजवायचं ...
लेखकशिव कन्यायांनी गुरुवार, 23/08/2018 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी हळूहळू पण निश्चितपणे
पार दिसेनाशी होईन
तेव्हा तू चौकट ओलांड,
आणि निघताना.....
आपल्या हसल्याबोलल्या
आवाजांची फूले घेऊन ये
आपल्यातल्या गहिवरांचे
कढ, न हिंदकळता आण
मी न ओलांडलेली अंतरे
तू सहजच पार करुन ये
माझे न उच्चारलेले नाव
चारचौघांत सरळच घे
सगळे उठून जातील तेव्हा
आपल्यातल्या शब्दांची
आरास मांड
त्यानंतर आपोआप दिवा लागेल
तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल
मग मी मुक्त होऊन रेषा होईन
तुझ्या तळहातांवर खोल रुतेन..
तू हळूहळू पण निश्चितपणे
पार दिसेनासा होऊन
माझ्याजवळ पोहचेपर्यंत...
Shivkanya
लेखकसुबोध खरेयांनी गुरुवार, 23/08/2018 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
आमंत्रणपत्रिका
बृहन्मुंबई (मुंबई ठाणे डोंबिवली बोरिवली नवी मुंबई अंतर्भूत) चा पावसाळी कट्टा २५ ऑगस्ट २०१८ रोजी मालवण तडका लुईस वाडी पूर्व द्रुतगती मार्ग ठाणे पश्चिम येथे सायंकाळी १९. ३० वाजता साजरा करण्याचे ठरले आहे.
ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सुहास्य वदनाने आणि रिकाम्या पोटाने आपली उपस्थिती लावावी अशी नम्र विनंती आहे.
बृहन्मुंबई च्या बाहेरील लोकांचे हि सहर्ष स्वागत आहे.
तरी वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करावा हि विनंती.