Skip to main content

लहान मुलांना पोटशूळ झाल्यास म्हणायचा मंत्र

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 05/02/2008 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मुलांना पोटशूळ झाल्यास म्हणायचा मंत्र अ अ अनशापोटी आ आ आवळा खाल्ला इ ई इथे बसलाय्? उ ऊ उड्या मारतोय्? ए ए एकदा सांगून ऐ ऐ ऐकत नाही! ओ ओ ओरडतोय् औ औ औषध द्याला - अं आं आंबटशोक अ: आहा आंगलट आला! छूऽऽ मंतर... बाऊ दूऽऽर गेला!
Taxonomy upgrade extras

(आपण...)

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 05/02/2008 03:57 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अजब यांची सुरेख कविता आपण... काव्य स्वतः कशा करावे आपण? आयत्या जमिनी या कसावे आपण... कुणी जरी प्रतिसाद टाकले नाही; विडंबन हे पाडत रहावे आपण... लिहिणार्‍याचा कुठे का दोष असतो? वाचकालाच दूषण द्यावे आपण... इतरांसाठी थोडे आपण लिहितो? मनी येईल ते खरडावे आपण... असेल चुकले कधी कधी अपुले पण मान्य कशाला ते करावे आपण?... 'केश्या' मेल्या तुला कसे ना कळते किती जगाला इथे छळावे आपण...

स्वतः लिहिलेल्या लेखनाचे संपादन कसे करावे?

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 04/02/2008 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
मला हा प्रश्न पडला आहे. मी दिलेल्या प्रतिक्रीयांचे किंवा उत्तरांचे संपादन करता येते कारण "संपादन" पर्याय तिथे दिसतो. परंतु मूळ लेखनातच काही दुरुस्ती करावयाची असल्यास तसा पर्याय नाही. तांत्रिक विभागाने पहाणी करुन योग्य तिथे दुरुस्ती करावी ही विनंती. अवांतर - माझ्याप्रमाणेच आणखीही काही जणांना हा प्रश्न पडल्याचे वाचले आहे. चतुरंग

प्रिया आज माझी..

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 04/02/2008 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
कवी यशवंत देव ( आणि अर्थातच माझी प्रिया) यांची क्षमा मागून प्रिया आज माझी नसे ताप द्याया नको बंध सारे नको टोचण्या त्या नको धास्ती आता कशा घाबरू मी हाकावे जरा दोस्त सारे प्रवाही सुरेवीण का रात्र जा‌ईल वाया जुने मित्र येता घरी बार होतो सुखे घोट घेता कुणी पार होतो पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या न भिती जीवाला न प्राणास घोर कसा आज ओठात खेळेल धूर निळी चंद्रिका मित्र संगे पहाया अशा रंगविता मनी स्वप्नराती मधु मल्लिका माधुरी स्वप्नी येती कशाला उभी ’ती’ मधे भंग व्हाया
Taxonomy upgrade extras

नातेसंबंध लाख मोलाचे - सचिन

लेखक बापु देवकर यांनी सोमवार, 04/02/2008 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
यशाच्या शिखरावर असलेला सचिन जेव्हा नातेसंबंधांवर बोलायला लागतो तेव्हा त्याच्या तोंडातून पहिलं वाक्‍य बाहेर पडतं, "ज्या यशाबद्दल मला श्रेय दिलं जातं हे यश माझ्या एकट्याचं नाही.' फार कमी वेळा सचिन क्रिकेट सोडून इतर विषयांवर बोलतो. या विषयावर मात्र तो भरभरून बोलला. ....... कोणत्याही मुलाचं सर्वांत मूलभूत नातं असतं ते आई-वडिलांबरोबरचं. निःसंकोचपणे मी सांगू शकतो, की माझ्या आयुष्यात सर्वांत जास्त प्रभाव कोणाचा असेल, तर तो माझ्या वडिलांचा. माझे वडील रमेश तेंडुलकर कमालीचे शांत होते. त्यांचे विचार प्रगल्भ असायचे. त्यांना कोणत्या गोष्टीची भुलावण नव्हती. पैशाचा किंवा कशाचाच त्यांना अजिबात लोभ नव्हता.

संध्याखंत - २

लेखक आजानुकर्ण यांनी सोमवार, 04/02/2008 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा नंदनशेठ यांची अप्रतिम कविता झांज हा अंगठा आमचे द्रोणाचार्य केशवसुमार यांच्या चरणी अर्पण. (एकलव्य) आजानुकर्ण आम्ही परतुनी आलो झाली होती सांज बल्ब लावूनी बसलो सुरु जाहली खाज नाही बिलगाया कोणी मनात येती इच्छा माडीवरती जाऊनी करावयाची का पृच्छा रंगीत बाटलीतूनी वाहतील सोनेरी धारा पेल्यात तरंगे जणू जीव अमुचा सारा रात्र येई गोकुळी आम्ही करितो खंत 'साकी' दिसे ना कुठे आता तुम्हीच ओता पंत (ह. घ्या.)
Taxonomy upgrade extras

ठाण्यात 'क्रांतिचा झंझावात'

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 04/02/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक एक, दोन व तीन फेबृवारी असे तीन दिवस ठाण्यातील ऍड. माधवी नाईक यांच्या ’अर्थ फाउंडेशन’ या संस्थेतर्फे एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला गेला. ठाणेकर नागरिकांसाठी व विशेषत: नवीन पिढीला १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या कालखंडात देशासाठी सर्वस्वाचा होम करणार्‍या क्रांतिकारकांचे सचित्र चरित्र दाखविणे हा या उपक्रमाचा हेतू होता. दुर्दैवाने आज स्वातंत्र्याला साठ वर्षे होऊन गेल्यानंतरही बहुसंख्य जनतेला अनेक क्रांतिकारकांची नावे सुद्धा माहित नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

एका लग्नाची गोष्ट...

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 03/02/2008 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
"डोकं फिरलंया...बयेचं डोकं फिरलंया...' लग्नसमारंभाला अगदी साजेसं आणि नवरा-नवरीच्या मनःस्थितीचं सुयोग्य वर्णन करणारं गाणं बॅंडवर वाजवलं जात होतं. (लग्नाचीही काय गंमत असते बघा...आधी वधूपक्षाकडली मंडळी नवऱ्या मुलासाठी बॅंड वाजवतात आणि मग त्याचा बॅंड वाजवतात !) पाहुणे झकास नाचत होते. गणपतीतल्या नाचापेक्षा या नाचाचा दर्जा किंचित वरचा आहे, अशी शंका घ्यायला वाव होता. फुगड्या रंगल्या होत्या. काही जण लग्नातल्या कामांचा शीण घालवण्यासाठी अंग हलवत होते तर काही जण आधीच "श्रमपरिहार' करून आले होते आणि आता अंगात भिनलेलं रसायनच त्यांना नाचवत होतं.