लंगरवाली दाल..
खास तात्या आणि स्वातीच्या आग्रहासाठी...
वेळ : २० मिनिटे.
संख्या : २-३ लोकांसाठी.
साहित्य :
१. १/२ वाटि राजमा
२. १/२ अख्खा मूग
३. मूठ भर अख्खा उडिद
४. मूठ भर चणा डाळ
५. २ पाकळ्या लसूण
६. थोडं आलं
७. बारिक चिरलेला कांदा १/२ वाटी
८. बारिक चिरलेला टोमॅटो १/२ वाटी
९. २-३ हिरव्या मिरच्या
१०. तूप, जिरे, हळद,हिंग, बडिशेप.
११. मिठ चवीनुसार
कृती :
१. साधारण ३० मिनिटे आधी वरील सर्व धान्ये गरम पाण्यात भिजत घालावित.
२. कुकरमध्ये ही सगळी धान्ये आणि लसूण बारीक चिरून घालावी, मीठ आणि थोडे तूप घालून, धान्ये शिजतील अशा बेताने पाणी घालून शिजवून घ्यावे.
३. आता थोडे तूप कढईत घेऊन त्यात जिरे, हींग, हळद, बडिशेप याचि फोडणी करून घ्यावी.
४. त्यात कांदा घालावा, चांगला परतावा, तो ट्रान्सपरंट झाला की, आलं बारिक चिरून घालावं.
५. लगेचच टोमॅटॉ घालावा आणि त्याची शिजून पेस्ट होईपर्यंत परतत रहावे.
६. कुकर मध्ये शिजलेली डाळ घोटू नये.. आता हि तयार झालेली फोडणी (कांदा-टोमॅटॉ वाली) , त्यावर घालावी.
७. ठिकसे पाणी घालावे. खूप पातळ करू नये. ही आमटी नाहिये हे लक्षात घ्यावे.
८. चवीनुसार मीठ घलावे. कोथिंबीर घालावी.
अधिक माहिती :
डाळ शिजताना मिठ घातले आहे हे लक्षात ठेऊन नंतर मीठ घालावे.
फोडणी शक्यतो तूपाचीच करावी. डाळीवर फोडणी घालण्या ऐवजी, कांदा-टोमॅटो परतून झाल्यावर त्यात डाळ घातली तरी चालेल.
कधितरी भा़जीला पर्याय म्हणून उत्तम आहे. शिवाय बरीच कडधान्ये एकाच वेळी आल्यामुळे पौष्टीकही आहे. मी तर यात कधी कधी मटकी आणि अख्खा मसूरही घालते.
माहितीचा स्त्रोत
माझ्या मानस मातोश्री (पंजाबी आंटी)
वाचन
13161
प्रतिक्रिया
0