Skip to main content

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 15/10/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजवरच्या छायाचित्रण स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला आहे. याच मालिकेतली नवी स्पर्धा घेऊन येत आहोत. या वेळचा विषय आहे, 'जलाशय'. येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव किंवा सरोवर एवढेच अपेक्षित आहे. प्रवेशिकेतच जलाशयाच्या ठिकाणाची माहिती लिहावी. फारशी माहिती उपलब्ध नसल्यास किमान ठिकाणाचे नाव अवश्य लिहावे. स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. विजेती छायाचित्रे यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित केली जातील. तुमच्या प्रवेशिका उद्या (दिनांक १५ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत) या धाग्यावरील प्रतिसादांद्वारे पाठवा.

ल _ _

लेखक दमामि यांनी गुरुवार, 15/10/2015 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
ल _ _ तोंडात पान ठेवल्यासारखी ती शिवी तिनं दिली, एकदा... दोनदा... अनेकदा... मन भरेपर्यंत. तिथेच उभ्या असलेल्या मला अंगावरून काहीतरी ओलसर सरपटत गेल्यासारखं वाटत होतं. श्रीदुर्गापूजेचा आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय नसल्याने आणि लांब जायचे असल्याने बीईयेष्टी ने प्रवास करावा लागणार होता. दादरला बसमध्ये चढलो,, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जण बसच्या मागील बाजूस जेन्ट्सना उभे राहण्यासाठी हमखास जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघींच एक वाचाळ मंडळ खिखीखुखू करत पुढे आलं.

स्थापत्य- एक कला

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 15/10/2015 04:08 या दिवशी प्रकाशित केले.
मूलभूत गरजां पैकी शेवटची पण महत्त्वाची गरज म्हणजे निवारा. आदिमानवाच्या गुहेपासून ते आताच्या प्रचंड आलिशान घरांपर्यंत खरंतर घर म्हणन्यापेक्षा महाल, राजवाड़े किंवा आपल्या भाषेत 'पॅलेस' म्हणावं अशा अनेक इमारती निवारा याच सदरात येतात. निवाऱ्याबरोबरच आणखी काही गरजा भागवण्यासाठी करावं लागणारं तात्पुरतं बांधकाम ते त्याच गरजेचं आपल्या सत्ता, संपत्ति, सामर्थ्याच्या अभिव्यक्ती करता वापरल्या जाणाऱ्या दृश्य रुपाला कदाचित स्थापत्यकला मानलें जावं. मी कुणीतरी मोठा, लोकोत्तर म्हणून काहीतरी अचाट घडवेन या भावनेतून जगातली काही स्थापत्य शिल्पं बनली.

असंच काहीतरी

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 15/10/2015 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
लिहावंसं वाटतं; कधीकधी उगाचच वाटतं. काय लिहायचं ते नंतर ठरतं.

चारचा चहा

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 14/10/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
चारचा चहा touch screen असतो! कपाच्या कानाला गुदगुल्या केल्या कि आतल्याआत मस्तसे हसतो, How's the day? म्हणून मिश्कीलपणे विचारतो! चारचा चहा screen saver असतो! शरीराचा tab refresh करतो मनाचे software update करतो, What's on your mind? म्हणून खोडीलपणे विचारतो! चारचा चहा google map असतो ! मनाचा cursor global होतो पण हातातला mouse local च राहतो ...... ............. ............ ....... ............ हळूहळू चारचा चहा धूसर होतो अरबी समुद्रापार दिसेनासा होतो......... !

ती

लेखक शीतल जोशी यांनी बुधवार, 14/10/2015 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
ती धरित्री ती जीवन दायिनी ती शक्ती ती भक्ती ती विद्या ती प्रज्ञा ती अर्धागिनी, ती कन्या ती वीज , ती नीज ती काळजी , ती प्रीत ती प्रेरणा , ती ज्योत ती ममता, मायेच स्त्रोत ती हळवी, अन तरी ती खंबीर हि ती मृदू , तरी प्रसंगी ती कठोर हि तीची ओंजळ नेहमी रिक्त, तीचे जगणे कधी मनमुक्त ती पावसची रिमझिम बरसणारी धारा अन ती , कृष्णाची प्रेमवेडी राधा ती सर्व नात्या मध्ये गुंतलेली तरी स्वत्व स्वताचे जपलेली ती स्वतंत्र अन ती कणखर ती स्वताला सावरणारी , सांभाळणारी स्वतची काळजी स्वताच घेणारी मला, अभिमान आहे मी "ती" असल्याचा प्रत्येक दिवस माझ्या साठी स्व-सन्मानाचा अपेक्षा तर काहीच

वाल्मिकी रामायण - रामसेतुचे पूर्ण सत्य

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 14/10/2015 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
[रामसेततु बाबत अनेक भ्रम पसरलेले आहे. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे वर्णन]. वाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते. आपल्या सर्वांनाच माहित आहे. सेतु हा नदी, नाले ओलांडण्यासाठी बांधला जातो. सपाट जमिनीवर सेतु बांधला जात नाही. रामसेतु बाबत अनेक भ्रम समाजात पसरले आहे.

बाबा

लेखक मालविका यांनी बुधवार, 14/10/2015 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा रिटायर झाले तरी त्यांची सकाळी ६ वाजता उठायची सवय काही बदलली नाही. त्यामुळे नंतर मग सकाळी बाबा आधी उठून चहा करणार हा अलिखित नियमच झाला होता. बाबा आधी एकटेच चहा घ्यायचे. चहा घेता घेता कुत्र्याला बाहेर फिरायला सोडायचे. रामदेव बाबा बघायचे. मग ७ वाजता सगळ्यांना उठवून परत चहाचा दुसरा राउंड. अशी त्यांची सकाळ व्हायची.  शाळेची १० वर्ष चिपळूण शहरात घालवल्यानंतर आम्ही परत आमच्या मूळ गावी घर बांधलं आणि तिकडे राहायला गेलो. मूळ गाव चिपळूण पासून २५ किमी अंतरावर आहे. त्यामुळे पुढे कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी तिथून चिपळूण पर्यंत ये-जा करावी लागायची. अर्थातच एस.टी. ने.

(माझी) जाssssssssssssssssssड बाईल

लेखक दमामि यांनी बुधवार, 14/10/2015 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना खास प्रचेतस साठी, झाली पाठ प्रिय पती ची ठोकून गेला जीव आता जाई चरावयासी हाटेलात हा जीव रोज रोजची पुरी भाजी खाऊन झाली जाssssssssssssssssssssssssssssssssssड जुनाSSssट पोलकं मनगटी अटकी त्याला धरुनी फाड मस्कापावचे ढीग आणति कितीते वेटर भाऊ बटरवाली पाव भाजी ?तरी किती मी खाऊ!!!? श्रिखंडाचा क्षणात फडशा ..