Skip to main content

विनोद

मिपास्तोत्र

लेखक जेपी यांनी मंगळवार, 16/07/2013 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
नम्स्कार , बरेच दिवस आम्चा मनात होते कि सर्वना उपयुक्त असेल असे 'मिपा स्तोत्र' येथे द्यावे . याचा स्तोत्राच फायदा मला झाला. तुम्हि हे स्तोत्र रोज वाचुन स्वतः अनुभव घ्याव.

ऑफीस ऑफीस...

लेखक मोदक यांनी बुधवार, 26/06/2013 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
हाफिसात मागच्या आठवड्यात घडलेला एक किस्सा.. एखादा प्रश्न विचारला गेल्याने "न हसता आणि न वैतागता" कसे उत्तर द्यावे हे न कळणार्‍या प्रसंगांपैकी एक प्रसंग.. मंथली प्रेझेंटेशन सुरू होते.. माझ्या एका रिपोर्टमधील आकडेवारी आणि आमच्या लंडन ऑफीसमधील एकाने तयार केलेली आकडेवारी काही केल्या जुळत नव्हती... शेवटी असा निष्कर्ष निघाला की "दोन्ही रिपोर्टस चुकीचे आहेत व एक तिसराच रिपोर्ट तयार केला जावा.." अचानक आमचा एका मोठ्ठा सायेब वदला... आय अंडरस्टँड रिपोर्ट A इज इनकरेक्ट, रिपोर्ट B इज इनकरेक्ट अ‍ॅजवेल! बट व्हाय दोज इनकरेक्ट फिगर्स आर नॉट कन्सिस्टंट..?

गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.

लेखक सुज्ञ माणुस यांनी शनिवार, 22/06/2013 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे. आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे. तरुण वयात या दोन्हीची क्रेझ असते.

माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र

लेखक सुज्ञ माणुस यांनी शुक्रवार, 14/06/2013 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र काही लोक पहिल्या भेटीत आपल्याला कशी वाटतील व भासतील, हे त्या लोकांच्या राहणीमानाप्रमाणेच आपल्या स्वतःच्या नजरेवर अवलंबून असते. काही लोक बाह्यरूपी दिसताना मवाली दिसत असतात, वा बघणारा स्वतःला सोडून इतरांना मवाली गणत असतो. पण कोणाचे नशीब कशी चाल खेळेल सांगता येत नाही, आणि अश्या लोकांबरोबरच आपल्याला अनेक वर्षे काढावी लागतात. कधी नाईलाजाने तर कधी मित्रत्वाने. त्याचे तसे राहणीमान कदाचित त्याची मजबुरी असू शकते पण आपली दृष्टी म्हणजे आपल्या मनाचा आरसाच होय. ज्या कोनातून त्यावर सूर्यकिरणे पडतील त्याच कोनातून ती ते परावर्तित करणार.

अमानवीय-काही उत्तरे

लेखक चिखल्या यांनी शुक्रवार, 31/05/2013 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
काही उत्तरे या भागात मागील भाग http://www.misalpav.com/node/24838 तील काही प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न. यातुन भुत आणि मानवात स्नेह वाढुन एक दिवस हा स्नेह भारत-पाकिस्तान मैत्रीलाही मागे टाकेल याची खात्रीच आहे. -------------------------------------------------------------------------------------------------------------- भुतांची सायकॉलॉजी थोड्याफार प्रमाणात माणसांसारखीच आहे. उदा. आपल्यात कोणी गल्ली चुकलं की लोक स्वत:हुन म्हणतील, "काय ब्वा, हिकडं कसं काय?" तसच भुतांमध्येपण आहे. आपण त्यांच्या एरीयात गेलो की आलेच ते आपली चौकशी करायला.

मागतोय ना.. कर मदत!

लेखक दशानन यांनी सोमवार, 20/05/2013 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
मास्तर कायम म्हणायचा मला, राजा, राजा लेका दुसर्‍याला मदत केली की देव तुला मदत करेल. जो अडलेला दिसेल त्याला मदत कर, जो मदत मागेल त्याला मदत कर. आता मास्तर म्हणाले म्हणजे करायला नको का? तेव्हा पासून मनाला जे वळण लागले ते त्यामुळे अंगावर वळ उठले तरी सुटले नाही बघा. मास्तरांनी सांगितले मागेल त्याला मदत कर. परिक्षेत एका मुलाला काय बी येत नव्हतं.. त्याने माझाकडे मदत नजरेनेच मागीतली गुपचुप व मी ती त्याला दिली. आता पन्नास कॉप्या अंगाखांद्यावर! दिल्या चारपाच काढून. देवानं कसे गुपचुप पुण्य जमा करून टाकायचे की नाही.. पण नाही. कॉप्या देताना मास्तरानंच पकडला, पापाचा हिशोब वाढवला. धु धु धुतला.

अमानवीय- मला पडलेले काही प्रश्न?

लेखक चिखल्या यांनी शुक्रवार, 17/05/2013 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या काही दिवसात भरपुर भुतं स्वप्नात आली आणि आमच्यावर संशोधन करा, लेख पाडा असं म्हणु लागली, अर्थात तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाही याचा मला विश्वास आहेच. पण जौद्या आता भुतच मानगुटीवर बसल्यावर लेख तर लिहावाच लागणार आणि पाडायचं मी तुमच्यावर सोडुन देतो. कसं? नक्की कुठली व्यक्ती कोणते भुत होणार हे कसं ठरवलं जातं? पिशाच्च, देवचार, भुत, हडळ, डाकीण हे वर्गीकरण नक्की कोणत्या आधारावर होते? नक्की कोणत्या बायका हडळ होतात? म्ह्ण्जे हडळ व्हायचं काय क्वालिफिकेशन असावं?

मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 13/05/2013 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
"ओ मारा डंख मारा डंख मारा बिछुवा… तोहरे प्यारके जहर चढे मितवा…" 'अपनीही मस्तीमे झूमते हुए' का काय म्हणतात तसा, आपल्याच धुंदीत, द्रुतगतीनं पायडिलं हाणत, गाणं म्हणत मी घराकडे सायकलत होतो.पोटात भूक खवळली होती आणि केंव्हा घरी पोचून वेगवेगळ्या मस्त रेसिप्या हाणतो, असं झालं होतं. आजची संध्याकाळ माझ्यासाठी 'ये शाम मस्तानी मदहोश किये जा… ' अशी ठरली होती.… दुपारी मला जेंव्हा बायकोनं सांगितलं की "अहो, आज संध्याकाळी पाच ते साडेआठ तुम्ही कुठेतरी एकटेच फिरायला जाउन या" तेंव्हा मी आश्चर्यानं विचारलं, "का गं, आज अचानक एवढी मेहेरबान कशी झालीस माझ्यावर?

प्रेमाची चाणक्यनीती (अर्थात मुली पटवायचे डावपेच)

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 27/04/2013 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक राजा चाणक्यनीती प्रेमात येते कशी उपयोगी प्रेम जरी ह्रुदयाचा खेळ खेळता डोक्याने यश निर्भेळ चाणक्य सांगतो काही युक्त्या येती फळा जर भावना सच्च्या सर्वात आधी हे जाण तू प्रेमास तुझिया प्रमाण तू दुसरा करीतो म्हणोनी केले प्रेमवीर असे पराभूत झाले जी तुला बहू आवडे प्रेमाचे तिला असे वावडे काय करशील अश्या प्रसंगी? ऐक सांगतो युक्ति जंगी विषय हलके टाळ तू बुद्धिचातुर्य दाव तू स्वप्निल गोष्टीस नकोच थारा जुळतात कुठे त्या शोध तारा असेल काय जे प्रिय तिला त्यात असावी गति तुला काम जरासे वेळ घेते जुळता तारा गति येते स्वप्नील पाखरू जर असेल ते कविता करायचे शिकून घे कार्य समजू नको सोपे स्वप्ने आवरणे काम मोठे ये
काव्यरस

ट्यारपी म्हणजे काय गुरूजी?

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 15/04/2013 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
शिष्य़ः प्रणाम गुरुजी गुरूः दीर्घायुषी हो वत्सा. तुझ्या मनात काही प्रश्न आहेत का? शिष्य़ः हो, पण ते आजच्या काळाविषयीचे आहेत. गुरूः हरकत नाही, पूर्वीच्या आचार्यांनी सांगितलेली बहुतेक मार्गदर्शक तत्वे आजसुध्दा उपयोगी पडतात. शिष्य़ः गुरूजी, मला असं विचारायचंय् की हे ट्यारपी म्हणजे काय असतं? आणि ते वाढवण्यासाठी काय करतात? गुरूः हा थोडा गहन प्रश्न आहे, मला थोडे एकाग्रचित्त होऊन विचार करू दे. ओम् ..... मंगलम् भगवान विष्णू ..... शिष्य़ः गुरूजी. गुरूः आठवलं, ऐक.