मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वावर

पोशाखावरून पात्रता ठरवता येते काय?

अमृता_जोशी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज शनिवार म्हणून नेहमी प्रमाणे मी प्रोझोन मॉल मधील स्टार बजार मध्ये भाजीपाला वैगेरे खरेदी करण्यासाठी गेले होते.

पाणी बचत काळाची गरज

वैभव दर्शनराव देसाई ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पाणी बचत हा कळीचा मुद्दा बनलाय.सर्वत्र पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे खेड्यातील असो वा शहरातील प्रत्येक बायकांना या समस्येला सामोरे जाव लागत आहे.तास् न तास् टँकरची वाट पाहत लांबलचक रांगेत तीव्र उन्हात उभ टाकाव लागत आहे.या सर्व परीस्थीतीने सामान्य माणुस हातबल झालाय. त्या मुळे या परीस्थीतिशी सामना करण्यासाठी पाण्याचे कटाक्षाने नियोजन करणे अत्यंत गरजेते आहे.''पाण्याची बचत करा''.हे एेकुन किंवा बोलुन चालत नाही तर ते प्रत्यक्षात आनाव लागेल.प्रत्येकाला पाणी बचत ही सवय बनवावी लागेल तरच हे शक्य आहेे. गावा गावात महिला पाण्यासाठी वणवण भटकतांना दिसून येत आहेत .

कोषातून बाहेर (Ice-Breaker)

राघवेंद्र ·
मला लोकांसमोर बोलायला आवडते. (No Stage Fear) मला २-३ तासांच्या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन करता येते. (Host a Meeting) मला लोकांच्या विचारावर अभिप्राय, टिप्पणी करायला आवडते. (Evaluation) मी कोणत्याही प्रश्नावर उत्स्फूर्त १-२ मिनिटे मत देऊ शकतो. (Impromptu Speech) या वरील एखादे वाक्य तुम्हाला लागू होत नसेल तर पण लागू व्हावे असे वाटत असेल तर जगभरात या विषयावर एक संस्था कार्यरत आहे आणि तिचे नाव Toastmasters International. ही ना नफा - ना तोटा या तत्वावर चालणारी संस्था आहे.

१५ मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने...

पुणे मुंग्रापं ·
लेखनप्रकार
"ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा राजा आहे; उत्पादक, व्यापारी, सेवांचे पुरवठादार इ. वर्गांचा तो पोशिंदा आहे, त्याच्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती मिळते इ. वाक्ये अर्थशास्त्राच्या पुस्तकात वाचतांना मन सुखावते. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात ग्राहकाला कशी वागणूक दिली जाते याचे दर्शन याच संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सत्यकथांवरून घडते. ग्राहकाचे अर्थव्यवस्थेतील मध्यवर्ती स्थान आणि त्याचे मूलभूत हक्क यांचा प्रथम उच्चार केला तो अमेरिकेचे प्रे. जॉन एफ. केनेडी यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून तेथील प्रतीनिधीगृहात १५ मार्च १९६२ रोजी केलेल्या पहिल्या भाषणात! आपण सर्वजण ग्राहक आहोत.

मिसल पाव आवडले

प्रा.डॉ.शिवाजी अंभोरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिसल पाव बद्दल पेपर ला वाचले आणि सदस्य झालो मला अर्थशास्त्र या विषयावर लेख वाचायला आवडतील मी मिसल पाव चे लेखन वाचतो आहे मिसल पाव समजुन घेत आहे

पुण्यात...

जव्हेरगंज ·
पुण्यात शनिवारवाड्यासमोर जो पुल आहे ना तिथे खुप गर्दी असते, गोंगाट असतो डुप्लिकेट पीनांचे चार्जर तिथे मिळतात ते अगदीच टाकाऊ असतात मला तो भाग आवडत नाही स्वारगेटला तुडुंब भरलेल्या पीएमटी बघितल्यावर मला भोवळ येते चिंचवडला प्रशस्त महामार्गावरील हॉटेलात पावाबरोबर फरसाण्याची भाजी खाल्ल्यावर मला अशीच भोवळ आली होती तेव्हापासून मिसळपाव हा पदार्थ मी व्यर्ज केलाय बाकरवड्या खाल्ल्यावर नेहमी पोट दुखते मग तीही मी कधी खात नाही दगडूशेटला जाता जाता जोशी वडेवाल्याकडे मी ढुंकुनही कधी पाहत नाही येरवड्याला एकदा बाईक पलटी झाली होती मग तिकडे मी कधी गेलोच नाही कोथरुडला जायचा मात्र प्रसंगच कधी आलाच नाही रॅडीसनमध्य

प्रेम !!! ???

शिव कन्या ·
प्रेम दिवसाच्या निमित्ताने ही आठवण! आपल्या प्रियतमेची मोजून ५३ वर्षे, सात महिने, एकरा दिवस आणि अकरा रात्री , निरंतर वाट पाहणारा प्रियकर खऱ्या जगात असतो कि नाही माहित नाही, पण Gabriel García Márquez च्या ‘Love in the Time of Cholera’ या सुमारे साडेतीनशे पृष्ठांच्या कादंबरीत तो परतपरत जगतामरता भेटत राहतो. मूळ Spanish भाषेत लिहिलेली ही कादंबरी १९८५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि १९८८ साली त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. यावर आधारित याच नावाचा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला. तसे सरधोपट कथानक! किशोरवयीन फ्लोरेन्तिनो फार्मिनाच्या प्रेमात पडतो. बिचारा गरीब असतो.पण त्याचे प्रेम भारी असते.

एक व्हॅलेन्टाईन

सुरवंट ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल : स्मशानात जाऊन मी बसतो. नेहमीच बसतो. आजही बसलो होतो. थडग्यावर बसून तंबाखू खायला फार बरं वाटतं. एकदा किक बसली का तुझ्या आठवणीत शिरता येतं. तुझ्या केसातला मोगऱ्याचा गजरा आणि त्याचा तो गंध, बांगड्यांची किणकीण आणि छमछम ते पैंजण, ढळढळीत दुपार आणि ऊसाचं रान. तुझ्या वैभवाचा मला स्पर्श झाला... काय पण व्हॅलेन्टाईन, मी इथं वर बसलोय बार भरत, आणि तू थडग्यात.. आज: मी व्हिस्की पीत नाही पण हा ग्लास फक्त तुझ्यासाठी. मला आवडतात म्हणून ही गुलाबाची फुलंही सोबत. तुलाही आवडतील याची खात्री आहे. काल रॉजर म्हणत होता, वील यू बी माय व्हॅलेन्टाईन? हाऊ क्यन आय डिल विथ धिस्?

मिपा नगरीची कहाणी!

DEADPOOL ·
लेखनविषय:
एक आटपाट नगर होतं, मिपा नावाचं! अत्यंत सुखी,समाधानी! व्यक्तिस्वातंत्र्य विचारस्वातंत्र्य या मूल्यांचा आदर करणारं! त्या मूल्यांना जपणारं! इथे लोक राजालाही विरोध करायचे, खड़े बोल सुनवायचे! पण राजा दयाळू होता.