Skip to main content

वावर

आज मिपावर पहिल्यांदाच पोस्ट करत आहे .

लेखक nishapari यांनी मंगळवार, 26/07/2016 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , मिसळपाव वर ही माझी पहिलीच पोस्ट आहे . तसं इथे खातं सुरु करून एक वर्ष तीन महिने झाले असले तरी सुरुवातीचं वर्ष मी इथे जवळजवळ कधीच फिरकले नव्हते . तेव्हा सगळा वेळ फेसबुकवर जायचा , तिथे सचिन परांजपे , स्मिता जोगळेकर , राज जैन , संजीव पालेकर , सर्जेराव जाधव , रुचिरा कुळकर्णी आणि अशा कितीतरी उत्तम लेखकांचं लिखाण वाचताना दिवस कधी सरायचा तेच समजायचं नाही . सकाळी ब्रश करायच्याही आधी , रात्री अंथरुणात पडून २- ३ वाजेपर्यंत आणि दिवसभरातले बरेच तास फेसबुकवरच जाऊ लागले जेव्हा आपण प्रचंड फेसबुक अॅडिक्ट झालो आहोत हा साक्षात्कार झाला आणि मनावर मोठ्ठा दगड ठेवून फेसबुक खातं डिलीट केलं . पण काहीतरी दर्जेदार वाचायची भूक स्वस्थ बसू देत नव्हती तेव्हा मिपाकडे वळणं झालं . साधारण गेल्या ३ महिन्यांपासून मी मिपावर सक्रिय आहे . इथे फेसबुकएवढा वेळ जात नाही आणि उत्कृष्ट पोस्ट्सही वाचायला मिळतात . इथल्या पोस्ट्स वाचत आहे . फक्त १० - १२ पोस्ट्सवर प्रतिसाद दिला आहे . इथल्या २-३ रेसिपीज ट्राय केल्या आहेत :) . स्वतःचं काही लिहिण्याएवढी प्रतिभा / उत्साह माझ्यात बहुधा नसावा , निदान सध्यातरी .

मी बी ढेकर देईन म्हणतो : हवाबाणी तडका

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 25/07/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
कधी चवीची, कधी अगदीच पांचट, लाल तर्रीची मिसळ कधीतरी ओर्पीन म्हणतो मी बी ढेकर देईन म्हणतो...!! मिसळीवर तवंगतर्री भेटली काय, न भेटली काय मिपाकार्याला रवंथ करायची उपजत सवयच हाय जिलबीतून पाकरस सुटला काय, न सुटला काय मिपाकार्याला तोबरे भरायाची सवयच हाय शेवटच्या तुकड्यापर्यंत मी बी दाबून खाईन म्हणतो...!! चयापचयाची काळजी सोडून देईन म्हणतो मी बी हाटेलामधीच चूळ भरीन म्हणतो...!! अपचनाचे प्रश्न सुटलेत काय, न सुटलेत काय या हावऱ्या मिपाकर्‍याले उपास-तापास लंघनाची अक्कलच नाय त्रिफळाचे चूर्ण हॉलमधीच घेईन म्हणतो सगळीकडून ढेकर देईन म्हणतो...!! टोपाच्या रिकम्या खडखडाटशी प्रतारणा करून वळसेवाली जि

भेट.. तुझी अन माझी...

लेखक प्रसाद_कुलकर्णी यांनी गुरुवार, 21/07/2016 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात काही 'व्यक्ती' अशा भेटतात, कि ज्यांचा सहवास किंवा भेट खूपच कमी वेळेची असते... काही सेकंदाची, फार-फार तर एक-दोन मिनिटांची... पण त्या आपल्या मनावर खूप खोल छाप मारून जातात.. कुठे तरी घर करून बसतात... आणि नंतर तुम्हाला परत-परत आठवत राहतात :P :P मी त्या वेळी इंजिनीरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होतो... लोणी वरून बसने घरी जात होतो... 'राहुरी'च्या बस स्टँड वर अशीच 'ती' (व्यक्ती :P ) मला नजरेस पडली... ती बहुदा तिथेच कुठेतरी कॉलेजला असावी... बसची वाट पहात उभी होती... मस्त दिसत होती ती... आमची नजरेला नजर झाली... पाच-दहा सेकंड ती माझ्याशी काही तरी बोलली...नजरेने...

कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 19/07/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख बालपणीच रेडिओशी संपर्क आला - रेडिओ हेच मनोरंजन आणि माहितीचे साधन असल्यामुळे खूप रेडिओ ऐकत असे. गाण्यांसाठी बिनाका गीतमाला अन विविध भारती, तर क्रिकेटवेडापायी सुशील दोशी यांचे धावते वर्णन वेळी अवेळी तासनतास ऐकले असेल. पुढे इलेक्ट्रॉनिक्स शिकतांना स्वतःचा इवलासा प्रक्षेपक तयार केला होता. पण फक्त प्रयोगच. गुरुजींनी तो प्रयोगाव्यतिरिक्त वापरणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्यातला उत्साह मावळला होता. पण रेडिओ नेहेमीच जवळचा सोबती राहिला. आजही दूरचित्रवाणीपेक्षा विविध भारती किंवा इंटरनेट रेडिओ जास्त ऐकतो.

राँग नंबर

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 07/07/2016 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
साध्या सर्दि तापापासून सुरवात होऊन न्युमोनियावर दुखणे गेले. रोज एकेक दिवस मोजता मोजता आज तीन आठवडे उलटून गेले होते. रांगणेकर हॉस्पिटलमधील भिंतीवरचा प्रत्येक डाग अन रेषा आजीला आता पाठ झालेल्या होत्या. तिचे शरीर म्हणजे तर नाही नाही ती औषधे रिचविण्याचे पिंपच झाले होते. नर्सने केव्हाही येऊन कुठलीही औषधे टोचून वा तोंडात कोंबून भरावीत. हे काय आहे, कशासाठी आहे, काही उपयोग होतो आहे की नाही, कोणाला विचारले तरी धड कळेल असे उत्तर मिळेल तर शपथ! मुलगी सकाळी ऑफिसला जातांना पाच मिनटासाठी येऊन जायची. तिने डब्यात आज काय आणले असेल त्याचेही आता औत्सुक्य उरले नव्हते.

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 03/07/2016 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
दिलखेचक! रापचिक! धमाल! हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा! सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला.

मिपा लंडन कट्टा- ग्रिनीच

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 23/06/2016 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा लंडन कट्टा सालाबाद प्रअमाणे ठरला एकदा कट्टा करायचे ठरले की ठरले. मिपाकर अडचणींकडे क्षुल्लक महणून पहातात. कट्टा करायचे ठरले मात्र स्थळ ठरत नव्हते. वर्‍हाडी जमा झाले मात्र कार्यालयाचा पत्ता ठाउक नाही असे काहीसे सुरवातीला झाले. त्याचे काय झाले. विजुभाउ लंडन मधे आले याची आदुबाळाला कुणकुण लागली. त्याने व्यनीफीनी तुन फोनाफोनी करुन विजुभाऊना सम्पर्क केला. आणि कट्टा करायचअ घात घातला. स्वाती राजेश या अनाहिता मधील जबरदस्त सदस्यानी ती आयडिया उचलून धरली.

वादळ

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 22/06/2016 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
वादळ आल्यावर सगळेच उघडे पडले. कागदी मुखवटे तर लागलीच उडाले. वाटले आता खरे चेहरे दिसतील. डोळ्यातील धूळ झटकल्यावर मात्र, दिसले नागडे सत्य . वादळाने मुखवट्या बरोबरच चेहरे देखील ओरबाडून नेले होते ......... समोर उभ्या होत्या अमानवी कवट्या अजूनही स्वत:ला माणूस म्हणवणाऱ्या! ........... ........... मी देखील त्यांतच होतो काय? हे कळणे शक्यच नव्हते! माणसांनी सगळे आरसे वादळाआधीच फोडून टाकले होते.... ....

पॅरिस भ्रमंती: वैभवशाली प्रासाद, संग्रहालये आणि कलाकृती (भाग १: फॉन्तेनब्लो)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 20/06/2016 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
. वरील चित्रः फोंतेनब्लो प्रासाद आणि संग्रहलय. संग्रहालये बघण्याची माझी आवड फार जुनी. म्हणजे अगदी वयाच्या पाचव्या -सहाव्या वर्षी सालारजंग म्युझियम बघितले, त्याची मनावर अमिट छाप पडली. पुढे शाळकरी वयात इंदुरातल्या म्युझियममध्ये जवळ जवळ रोजच जाऊ लागलो. (त्या काळातील आठवणी इथे वाचा) शिवाय मुंबईचे प्रिन्स ऑफ वेल्स अधून मधून बघायला मिळायचे.

मुंबई लोकलने प्रवास कसा करावा?

लेखक साधा मुलगा यांनी शनिवार, 18/06/2016 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईची रेल्वे लोकल(उपनगरीय रेल्वे सेवा) हा मुंबईच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. १६ एप्रिल १८५३ साली पहिल्यांदा भारतातच नव्हे तर आशिया खंडामध्ये सर्वात पहिले रेल्वेची गाडी धावली ती मुंबईतच. तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा रेल्वेचा प्रवास थक्क करणारा आहे. आज जी काही मुंबईची प्रगती झाली,विकास झाला त्यात मुंबईच्या लोकल रेल्वेचा मोठा वाटा आहे. जरा का मुंबईत रेल्वे नसती तर मुंबईची कशी आणि किती प्रगती झाली असती याबाबत शंकाच आहे. मुंबईच्या दळणवळणाचा विचार केल्यास रेल्वेचा प्रवास मुंबईमध्ये अतिशय स्वस्तातला आणि कमी वेळात होणारा आहे.