मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वावर

त्याच्या सारखा नशिबवान तोच.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकांनी अनेक शतके ह्या पृथ्वीवर पार केली आहेत आणि लोक बदलत आले आहेत. असं करत असताना त्यांच्यामध्ये नवीन विश्वास जागृत होत गेला असावा.ते गरजेप्रमाणे नवीन तंत्रज्ञान निर्माण करीत गेले असावेत. तेव्हा ते काय असावेत आणि आता काय आहेत याचा विचार केल्यावर जाणवतं की,बदल चांगला ही वाटतो आणि वाटत ही नाही. जेव्हा माणूस पहिल्यांदा बोलू शकला आणि चालू शकला तेव्हा तो दिवसभर घरांमध्ये राहिला नसावा. आपले काही दिवस बाहेर ही घालवत असणार. निसर्गाशी एकरूप होत असताना तो त्यातून आनंद ही घेत असावा. त्याच्या श्रद्धेचा देव ही त्याला निसर्गात सापडत असावा.

ढग हे माझे अनोळखे खरे मित्र.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी अनेकदा पावसावर,वादळांवर लिहिलं आहे. पण ह्या गोष्टींचा उगम करणाऱ्या ढगांवर लिहिलं नाही.आज मला माझ्या लहानपणी शेतात काम करतानाच्या आठवणी येऊन,भर पावसाळ्यात शेतात काम करत असताना पावसाची सर आल्यावर धावत घरात जाण्या अगोदर, आकाश कसं ढगाळायचं याची आठवण आली आणि ढग आठवले. मी ढगांकडे माझे अनोळखी मित्र समजून पहायचो आणि पहातो. आभाळात विहरणाऱ्या ढगांकडे विशिष्ट नजरेने त्यांच्याकडे टक लावून मला पाहावसं का वाटायचं, हेच कळत नाही. मला एक गोष्ट माहीत होती: मला माहीत होतं की हवेवर मुक्तपणे राज्य करणारे ढग सुंदर होते. ढगांचा साधेपणा आणि सौंदर्य निर्विवाद होतं.

समुद्राच्या लाटांवर माझ्या विचारांची खलबल.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कधी कधी अ-वास्तव विषयावर लिहिणं सुद्धा मनोरंजक असू शकतं.माझा खालिल लेख तसाच काहिसा नमुना आहे. मला समुद्राजवळ बसून निळ्या काळ्या लाटांकडे पाहयाला आवडतं. मला असं वाटतं की जर मी तिथे बराच वेळ बसलो आणि माझ्या “मनाला” खरोखर इकडे तिकडे फिरू दिलं तर लाटांपर्यंत पोहोचेपर्यंत वाळूमध्ये, कमी झालेल्या पाण्यात पडून, माझं मन वाळूत रूतलं जाईल. आणि पुन्हा एखादी मोठी लाट येऊन पाण्याबरोबर फरफटत जाईल. आणि माझे विचार पुन्हा एकदा समुद्रात नेले जातील. किनाऱ्यावर माझं शरीर खारट वाऱ्याची झुळूक अंगावर घेऊन, माझ्या विचारांना मंथन करणाऱ्या लाटांच्या आवाजाचा आनंद घेत राहिन .मी अनेकदा माझ्या विचारांना उभारी देतो.

काळ्या अमावास्या रात्री पाहिलेलं तारांगण

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काळ्या अमावास्या रात्री पाहिलेलं तारांगण मला आठवतं, अलीकडे मी जेव्हा कोकणात रजा घेऊन गेलो होतो, तेव्हा नेहमीच्या शिरस्त्या नुसार ,चक्क ढगा विरहीत रात्र शोधण्याच्या प्रक्रियेत, यशस्वी होत आहे असं पाहून, त्या रात्री समुद्राच्या चौपाटीवर वाळूत बसून तारे पहाण्याचा छंद पूरा करण्याच्या इराद्याने, चौपाटीवर गेलो होतो. योगायोगाने,ती अमावास्येची रात्र होती.उशिरा घरी आल्यावर,जेवण आटोपून झोपण्याच्या उद्देशाने,पाठ टेकून डोळे मिटून मनाने परत चौपाटीवर गेलो.आणि डोक्यात विचार यायला लागले. आकाशात काळ्याकुट्ट रात्री, म्हणजेच अमावास्येच्या रात्री, ताऱ्यांकडे पाहण्यात,कल्पनेच्या आधाराने त्यांच्या जवळ पोहोचण्या

प्रो.देसाई एक वल्ली

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रो.देसाई एक वल्ली प्रो.देसाईंचा माझ्या कवितेत वरचेवर संदर्भ येतो.तर हे गृहस्थ कोण असावेत? हे समजण्यासाठी त्यांची ओळख करून देणं आवश्यक आहे असं मला वाटु लागल्याने हा प्रपंच. भाऊसाहेब म्हणून मी त्यांना ओळखतो.हे गृहस्थ मुंबईच्या एका कॊलेज मधे गणिताचे प्रोफ़ेसर होते.त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मिसेस देसाई आणि प्रो.देसाई यांचं लव्ह म्यारेज होतं.ती त्यांची विद्यार्थीनी होती.

समुद्र किनाऱ्यावर वाळूत पाय खुपसून बसायला मला आवडतं.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
“लोकांना समुद्र का आवडतो? याचे कारण असं की लोकांना ज्या गोष्टींचा विचार करायला आवडतं त्या गोष्टींचा विचार करायला लावण्याची शक्ती समुद्रात असते.असं कुणी तरी म्हटलं आहे. माझा सागराच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, त्याहूनही अधिक, वाळूमध्ये बोटं खुपसून राहणं मला आवडतं. समुद्रकिनारा हे एक मजेदार, घटना घडवणारं, खेळकर आणि अस्तव्यस्तीक ठिकाण आहे, त्याच वेळी ते आश्चर्यकारकपणे सुखद, शांत, उपचार करणारं ठिकाण आहे.

दर्शननं केला प्रवास

पराग१२२६३ ·
मिरजेत दर्शन दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं.

रेवदंड्याचं दर्शन

पराग१२२६३ ·
Korlai कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.

'रोम' रंगी रंगले मन - 'तिवोली' आणि रोमचा 'किल्ला'

चित्रगुप्त ·
पुनर्जागरण काळातले थोर कलावंत- बर्निनी, मिशेलअँजेलो, राफाएल, लिओनार्दो, कारावाज्यो, आणि इतर अनेक चित्रकार, मूर्तिकार, स्थापत्यविद, लेखक, कवी, तत्वज्ञ, यांची प्रतिभा जिथे बहरली, ते चिरंतन शहर रोम.अशा या रोमच्या माझ्या अलिकडल्या भ्रमंतीत बघितलेल्या काही खास जागा आणि टिपलेले फोटो इथे देत आहे. . टायबर नदीवरील अनेक पुलांपकी एक. पलीकडे सेंट पीटर्स कॅथेड्रल दिसते आहे.

इंद्रायणीतून पहिल्यांदाच प्रवास

पराग१२२६३ ·
Indrayani at CSMT पहिल्यांदाच मुंबईला पुण्याहून संध्याकाळी जायचं होतं. मग इंद्रायणीचं आरक्षण केलं आणि प्रवासाच्या दिवशी पुणे जंक्शनवर पोहचलो. तपकिरी रंगातलं कल्याणचं WCAM-2 इंजिन आज इंद्रायणीचं सारथ्य करत होतं.