विकासाच्या गोष्टी. .
मोखाड्यातलं एकदम दरीतला पाडा ' आमले ' गाव. जंगलात वसलेलं. वाड्याहुन खोडाळ्याकडे जाणार्या बाजुला हमरस्ता सोडुन दरीत उतरायचं. इनमिन ६५ कुटुंब. गावाशेजारुन वाहणार्या नदीमुळे पावसाळ्यातला चार महिने बाहेरच्या जगाशी संपर्क नाही अशी अवस्था होती, अगदी मागच्या वर्षापर्यंत.
आता नदीवर लोखंडी पुल टाकलाय चालत जाण्यासाठी.
मिसळपाव
दिवाळीचं वातावरण सुरु झालं कि आजही आठवते ती आम्ही साजरी केलेली एक आगळी वेगळी दिवाळी. ही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझे आजोबा (आईचे वडील) शिक्षण उपसंचालक म्हणून रिटायर झाल्यानंतर एका आश्रमशाळेत जाऊन राहत होते. रिटायरमेंटनंतरच आयुष्य सामाजिक कामात वाहून द्यायचं त्यांनी ठरवलं होतं. डोमरी,कोठिंबा आणि यमगरवाडी या तीन गावातल्या आश्रमशाळांशी ते जोडले गेले. त्यांच्या कामात होईल तो वाटा ते उचलत होते. त्यांच्याकडून आम्ही नेहमी तिथले खूप किस्से ऐकायचो. ते आम्हाला म्हणायचे अरे ते आयुष्य येऊन बघा एकदा तरी.