मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रिय श्री स्वधर्म

शरद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रिय श्री. स्वधर्म श्री. स्वधर्म, असे पहा, त्या काळी वर्ण ही संकल्पना समाजात रूढ झालेली होती. स्मृति त्यात बदल करण्यासाठी लिहलेल्या नाहीत. राजा असावा का नसावा, त्या ऐवजी लोकशाही असावी का ? हा स्मृतींचा विषयच नाही. राजा व म्हणून प्रजा आहेच, विवाहसंस्था आहे म्हणून पति व पत्नी आहेतच तसेच वर्ण आहेतच. तर यां संस्थांमधील घटकांचे एकमेकाशी संबंध कसे असावेत हे "नियम" सांगणे हे स्मृतींचे काम. आजच्या भाषेत बोलावयाचे तर स्मृति म्हणजे "घटना". आता आपण हे मान्य कराल की " घटना लिहणारा माणुस कितीही विद्वान असला वा त्याच्या बरोबर निरनिराळ्या क्षेत्रातील जाणकारांची टीम असली तरी तो सर्वांना मान्य असलेली व भविष्यातही सर्वांना मान्य होईलच अशी "अपरिवर्तनशील" घटना लिहू शकेल का ?" याचे उत्तर "नाही" आजचे उदाहरण घ्या. डॉ, अंबेडकर यांनी घटना लिहली. जुन्या काळाप्रमाणे म्हणावयाचे तर हे झाली "बाबासाहेबस्मृति". आपण पन्नास वर्षात त्यात तीनशे बदल केले. आजही शूद्रांवर अन्याय होत नाहीत का ? म्हणून तुम्ही "त्यांनी लिहलेली घटना "जाळून" टाका " असे म्हणता का ? जगातील प्रत्येक गोष्टीत बदल होत असतो; नव्हे, तो झालाच पाहिजे. डबक्यातील स्थिर पाणी म्हणजे रोग पसरविण्याची शक्यता तर खळाळणारे पाणी म्हणजे प्रत्यक्ष जीवन. तर ह्या डबक्यातील पाण्याला वाट काढून देणे हे महत्वाचे. त्यात दगड टाकणे नव्हे. आपण विचारले म्हणून माझी भुमिका परत एकदा. जे ग्रंथ आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचणे शक्य नाही, अश्या ग्रंथांचा परिचय थोडक्यात करून देणे. मनुस्मृतीचे २६८४ श्लोक तुम्ही वाचणार आहात का ? शक्य नसेल तर तुमच्याकरिता हे थोडे परिश्रम. श्री. प्रचेतस यांनी मनुस्मृति वाचली त्यांच्याकरिता हे नव्हे. मी मनुवादी आहे का ? हे सर्वस्वी असंबंचित. "न स्त्री स्वातंत्र्य.." या संदर्भात द्रौपदीची गोष्ट केवळ मनुस्मृति व महाभारत या ग्रंथातील सामाजिक स्थिती दाखविण्याकरिता. आपण केवळ टीका करावयाच्या ऐवजी भुमिका विचारण्याची आपुलकी दाखवलीत म्हणून हा पंक्तिप्रपंच आ.न. शरद . .

वाचन 10433 प्रतिक्रिया 24