श्रीदुर्गानवरात्रीउत्सव - क्षत्रिय उपासना

लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व भाविकांना दुर्गा नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वत्र अगदी धामधुम चालु आहे. देवींचे मंडप, तिथली गर्दी, गरबा वगैरे नेहमीचाच गोंगाट. आपले भोडला , घागरी फुंकणे, गोंधळ वगैरे मराठी प्रकार काळाच्या ओघात हळुहळु विस्मरणात चालले आहेत. कालाय तस्मै नमः || मुळात खरेतर हा सण शक्तीउपासनेचा. शक्तीचा, बलाचा, ताकतीचा उत्सव. पण ते सारंच लोप पावत चालले आहे किंबहुना कधीच लोप पावले आहे. आता काय तर नऊ दिवस संगीबेरंगी कपडे घालुन मिरवणे अन पुरुषांन्नी फ्रॉक सदृष झ्यंकीप्यँकी कपडे घालुन उच्छृंखल गाण्यावर नाचणे असे काहीसे स्वरुप आले ह्या सणाला. अन त्यातही बोलायची काही सोय राहिली नाही.

देखणं चेन्नई सेंट्रल

MGR Chennai Central पूर्वीच्या मद्रास प्रांताची राजधानी असलेलं चेन्नई महानगर संपूर्ण दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात असे. अतिशय प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अनेक खुणा या शहरात आजही पाहायला मिळतात. चेन्नई शहराच्या इतिहासाची ओळख त्यातून नव्या पिढीला होत असते.

मिसळपाव दिवाळी अंक - २०२३ - आवाहन

लेखन पाठवण्यासाठी मुदत दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत वाढवली आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

राम राम, मिपाकर. श्रीगणेश लेखमाला पार पडली, की मिपाच्या पडद्यामागील मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपा दिवाळी अंकाचे. मराठी आंतरजालावर आणि छापील दिवाळी अंकांचे साहित्य विश्वामधे दिवाळी अंकांची समृद्ध आणि अभिमानास्पद अशी परंपरा आहे. गेल्या अनेक दशकांपासून विविध विषयांना वाहिलेले दर्जेदार दिवाळी अंक दरवर्षी असतात, आपल्याही मिपाचा दिवाळी अंक प्रत्येक वर्षी असतो.

श्री गणेशोत्सव - काही ऐतिहासिक कविता - भाग ३

लेखनविषय:
लेखनप्रकार
हे सारं अघळपघळ आहे. कोठेही विचारांचा लीनीयर फ्लो नाही , एकसंधता नाही . असण्याची गरजही नाही. हे सारं स्वांतःसुखाय आहे, आपल्याला कोणाला काहीच पटवुन द्यायचं नाही, हे सारं आपल्या स्वत्:च्याच आनंदासाठी चाललेलं आहे. _________________________________________________________ श्री गणेशोत्सवाचे दिवस . एकदम प्रसन्न वातावरण . ऑफिसातही थोडा निवांत वेळ . त्यामुळे मग दुपारी असे काहीही तरी स्वर्गीय वाचावयास मिळते . ऐतिहासिक कविता पाहता पाहता मोरोपंतांच्या १०८ रामायणांचा उल्लेख वाचायला मिळाला. अर्काईव्ह.ऑर्ग वर जरा शोधाशोध केली तेंव्हा मोरोपंतांच्या अफाट काव्याचा विस्तार दिसला !

250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक

PBG1 राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंट ही भारतीय भूदलातील एक ऐतिहासिक रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला, तो नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रीट्रिट पाहायला बसलेलो असताना.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ७

लेखनविषय:
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ६

लेखनविषय:
गावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक सुशिक्षीत समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो. तो – आज काय सुट्टी आहे का? ते – नाही. तो – मग कामावर का जात नाही ? ते – कामावर ? कामावर कशाला जायचे ? तो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे…. ते – बरं पुढे ? तो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल…. ते –बरं मग? तो – मग काय, निवान्त बसता येईल .. ते – मग आत्ता आम्ही निवान्तच बसलोय की…..

अंतरंग – भगवद्गीता – भाग ५

लेखनविषय:
लेखनप्रकार
मोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय. माझ्यासाठी काही करायचंच असेल तर फक्त थोडा बाजूला सरक कारण तुझ्यामुळे माझा सूर्यप्रकाश अडतोय.

फोरिए सीरीज - अजुन एक चिंतन

लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रस्तावना : सर्वप्रथम म्हणजे मी काही उच्च शिक्षित गणितज्ञ वगैरे नाहीये, थोडंफार स्टॅटिस्टिक्स शिकलो आहे, अ‍ॅप्लाईड मॅथेमॅटिक्स नाही, प्युअर तर नाहीच नाही. ह्या आधी केलेले अन अन ह्यानंतर होणारे सर्व लेखन हे वरवरील आकलनावर आधारित असुन हेच अंतिम सत्य आहे असा काही माझा दावा नाही. कोणी वेल ट्रेन्ड गणितज्ञ यदाकदाचित हे वाचेल अन ह्या अर्धवट ज्ञानाची खिल्ली उडवेल तर त्याला काही ही हरकत नाही. आणि दुसरं म्हणजे हे सारं स्वांतःसुखाय अर्थात स्वतःच्या समाधानाकरता आहे.

वार्तालाप: दुराशेच्या धार्मिक पोथी

लेखनप्रकार
श्रवणी लोभ उपजेल तेथे विवेक केंचा असेल तेथे. बैसली दुराशेची भुते तया अधोगती. समर्थ म्हणतात जो व्यक्ती सांसारिक उद्देश्यांच्या पूर्तीसाठी उदाहरण धन-संपत्ती, सुख- समाधान, सत्ता, ऐश्वर्य इत्यादी प्राप्तिसाठी पोथ्या वाचतो, कथा श्रवण करतो, कथेतील देवतेला प्रसन्न करण्यासाठी अन्न जल ग्रहण न करता पोथीत दिलेल्या विधिनुसार उपवास इत्यादी करतो, त्याच्या नशिबात फक्त दुराशा येणार. कधी कधी जे आहे ते ही हातातून जाते. उदा. हजार मोदकांची आहुती दिली तर इच्छित फलप्राप्ती होईल. तो आहुती देतो, पण फळ मिळत नाही. कारण, उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः.
Subscribe to संस्कृती