मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संस्कृती

न्यूत की द्यूत?

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आकाश गेडाम आणि मोहिनी गजाभिये या नागपूरस्थीत अभ्यासकांचा Study of Vanished South Asian Board Game 'Nyout गेल्या वर्षात प्रकाशित झालेल्या छोट्याशा शोध निबंधात त्यांना वाघोरी टेकड्यांच्या पायथ्याशी चंद्रपूर जिल्ह्यातील एरवा झरी गावाच्या परिसरात (N20’38’53, E79’35’23) एका प्राचीन खेळाच्या खूणा आढळल्याचा उल्लेख आहे.

अरे संस्कार संस्कार

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
अरे संस्कार संस्कार अमेरिकेत आल्यावर हातात पडती डॉलर करा त्याचा नीट वापर !!१!! अरे संस्कार संस्कार हॉटडॉग बरा म्हणू नये मेगडॉनल्ड मधे जाऊन बरगर स्यान्डवीच खाऊ नये !!२!! अरे संस्कार संस्कार शिस्त स्वच्छ्ता ईथे पाहून तिकडे भारतात करा त्याचे डिट्टो अनुकरण !!३!! अरे संस्कार संस्कार खोटा कधी म्हणू नये रीत अन रिवाजाला छोटा कधी म्हणू नये !!४!! अरे संस्कार संस्कार घेता कर्ज क्रेडीट कार्डावर त्याच महिन्या अखेर टाका फेडून सर्व उदार !!५!! अरे संस्कार संस्कार आहे मोठा जादूगार असे जीवनाचा मंतर ठेवा त्यावर मदार !!

महात्मा गांधीं म्हणालेत, "डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल”

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी काल प्रो. देसायांना म्हणालो, “रागाची भावना, रागाची जोमाने येणारी इर्षा,जंगली राग जो तुमच्या शरीरात फोफावतो तुमच्या मुठी घट्ट करून, तुमचं मन आसूरी करतं, तुमच्यातली श्वापदांची उत्कट प्रवृत्ती बाहेर आणतो. दुसऱ्यांवर दुःख ओढवण्याची अंगातली तळमळ,असं केल्यावर वाटणारी समाधानी आणि तृप्तीची तळमळ. या सर्व सूडाच्या भावना आहेत. या सूडाच्या भावना,वैयक्तिक वेदना आणि दु:ख यांचा एक समूह आहे.

माझं challenge (आव्हान)

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आ.ई.तु.झी.आ.ठ.व.ण.ये.ते हा माझा लेख वाचत असताना किंवा वाचून झाल्यावर ,माझ्या आईची आठवण येऊन ही “ माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही किंवा मला हुंदका आला नाही” असा एखाद्या ही वाचकाने प्रतिसाद द्यावा.असं मी आव्हान करतो.Challenge देतो.

द लेडी ऑफ शालॉट : (भाग १) चित्र, कविता आणि 'आई'चा मराठी तर्जुमा.

चित्रगुप्त ·
. चित्रकारः John William Waterhouse. (1888) Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London गेल्या महिन्यात लंडनमधे दहा दिवस राहून तिथली कलासंग्रहालये बघितली. लहानपणापासून पुस्तकांमधे बघितलेली अनेक उत्तमोत्तम चित्रे प्रत्यक्ष बघण्यातली मजा भरपूर अनुभवता आली.

मानस -रामनवमी उत्सव सन १९०५

आर्या१२३ ·
लेखनप्रकार
मानस -रामनवमी उत्सव सन १९०५ स्थळ: थोरले राम मंदिर, गोंदवले वेळ- सकाळी ६ची "बाळांनो, आज समोर राममंदिराकडे नका जाऊ बरं! आज तिथे उत्सव आहे, फार गर्दी होईल! इकडून आता नदीपात्रात बैलगाड्या सोडायला जातील लोक, उगा कुठल्या बैलगाडीच्या चाकाखाली यायला नको." इकडे तिकडे हुंदडू नका.. ": थोरले रामाच्या समोरच असलेल्या पिंपळाच्या झाडाची ढोली म्हणजे आमचे घर! आई, बाबा, आणि आम्ही चार बहिणी असे आमचे छोटेखानी खारुताईंचे कुटुंब तिथे गेल्या अनेक वर्षांपासून राहतोय. आई नेहमी म्हणायची की आपले कुळाचे दैवत हे रामप्रभू. आणि म्हणायची, आपण खूप भाग्यवान आहोत कि आपण इथे, या भूमीत जन्माला आलोय.

गोष्ट होऊ घातलेल्या जहाजाची

पराग१२२६३ ·
5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत.

माझी नर्मदा परिक्रमा : शुलपाणीच्या झाडीत

Narmade Har ·
लेखनप्रकार
माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतास्थळावरील लेखांक ८२ मधील संपादित सारांश . . . आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धे गाव मध्य प्रदेश मध्ये आहे आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . मध्यप्रदेश मधील गावाला खारिया भादल किंवा खारा भादल असे म्हणतात . इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावास्यांची सेवा करतो . याच्या घरापाशी मी पोहोचलो . गावातील ज्या घरामध्ये दुकान आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते . याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती .

मानस- धुळवड

आर्या१२३ ·
मानस - धुळवड स्थळ: गोंदवले दिवस : फाल्गुनाचे. होळीपौर्णीमेचा दुसरा दिवस! वेळ : साधारण पहाटे पावणे पाचची श्रीमहाराज तसे नेहमीप्रमाणे ब्राम्ह मुहूर्तावरच उठले होते. आन्हिक आटोपून थोडा वैखरीने नामजप करून पुन्हा थोडे आडवे झालेत...आदल्या दिवशीच्या दगदगमुळे! अर्थात आत हृदयात अखंड नाम सुरू आहेच! आदल्या दिवशी पौर्णिमा, अन् होलिकादहन! इतके लोक गोंदवल्यात येणार! सगळ्यांची व्यवस्था लावणे. त्यात सध्या पाणी टंचाई! स्वयंपाकघर बांधकामासाठी काढलेले. बराच मोठा व्याप.

अधिकार

आकाश खोत ·
लेखनप्रकार
गेल्या आठवड्यात माझ्या बायकोच्या आजी देवाघरी गेल्या. बातमी कळताच आम्ही सर्व तातडीने पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला निघालो. गाडीमध्ये मी माझी बायको आणि माझे सासु सासरे होते. पूर्ण प्रवासात सतत आम्ही संभाजीनगरला आजींच्या राहत्या घरी गोळा झालेल्या नातेवाईकांशी संपर्कात होतो. एरवी पुण्याहून निघालो, नगरला पोहोचलो, नगर क्रॉस झालं, जवळ पोहोचलो एवढे अपडेट पुरेसे असतात. अशा प्रसंगी मात्र कोणालाच स्वस्थ बसवत नसतं, सतत बोलत संपर्कात रहावं वाटतं. जवळची एक व्यक्ती गेलेली असताना इतर जवळच्या व्यक्तींच्या सहवासात रहावं वाटतं. आणि यावेळेस सतत चर्चा करण्यासाठी आणखी एक विषय होता. दिवंगत आजींना मुलगा नव्हता.