मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संस्कृती

माझी बोली भाषा

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिसळपाव वर बोली भाषेत भाषेत साहित्य पाठविण्याचा संदेश मिळाल्यावर विचारात पडलो माझी बोली भाषा कुठली. घरात हि हिंदी आणि मराठी मिश्रित भाषा बोलली जाते. एकांतात विचार सुद्धा कधी हिंदीत तर कधी मराठीत करतो. शालेय शिक्षण हिंदीत आणि पुस्तके वाचून शिकलेली मराठी. या दोन्ही निश्चित माझ्या बोली भाषा नाही. कारण मला हिंदीतली कुठली हि बोली भाषा अवगत नाही. मराठीतील बोली भाषेचा प्रश्नच येत नाही. आमचे आजोबा दिल्लीत स्थायिक झाले होते. वडिलांचे शिक्षण हि दिल्लीतलेच. आमच्या वडिलांची भाषा म्हणजे उर्दू, हिंदी, मराठीचे मिश्रण.

मनावरील ते शूर्प ओरखडे १ : (ईस्टेटीची परात)

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज सकाळीच भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम ! हा लेख लिहिण्याचा योग आला, भारतीय स्त्रीच्या या आकर्षणा मागे पुर्वार्जीत मालमत्तेत स्त्रीयांना सहसा वाटा मिळत नसे -आता कायदा बदलला आहे- त्यामुळे कदाचित जिवन लढ्याच्या स्पर्धेतून येणारा पण ज्या संपत्तीवर तुमचा तांत्रिक-नैतिक दृष्ट्या अधिकार असणे अभिप्रेत नाही तिचा मोह करणारी स्त्री कुठे दृष्टीस पडली की स्त्री आदर्श असते टाईप मनात तयार झालेल्या प्रतिमांना तडे जाऊन मनावर क्वचित शूर्प ओरखडे उमटतात.

भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम !

माहितगार ·
वस्तुतः मानवजातीला सोने जड जवाहीर्‍यांसारख्या चकाकत्या वस्तुंच्या आकर्षणाचे रहस्य मानववंशास्त्राला अद्यापी पुर्णतया उलगडले नसावे. बाकी जगातल्या लोकांना सोन्याचे वेड नसतेच असे नाही पण त्यात संपत्ती प्रेम अधिक आहे, भारतीयांच्या सुवर्ण प्रेमाचे स्वरुप आभूषण प्रेमाचे असावे.

पुणेरी पगडी

Dinesh Satpute ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी नगरला असताना मित्र म्हणायचे कि तुला नगरमध्ये गाडी चालवता आली तर जगात तू कोठेही गाडी चालवू शकतोस.आम्हा नगरकरांचा हा समज किती खोटा आहे हे मला पुण्यनगरीत आल्यावर समजले.नगरमध्ये गाडी चालवताना सिग्नलला गाडी थांबल्यावर सिग्नल कळत नसल्याने गाडीवर मागे बसला आहे त्याला आम्ही 'सिग्नल आहे का?'असं विचारायचो.पुण्यात सिग्नलला थांबल्यावर 'पोलिस आहे का?'असं विचारतात. अगदी कालचीच घटना घ्या.पुण्यात हेल्मेट सक्ती करून वसुली सुरु झाली अन वादविवादांना अस तोंड फुटले कि पुणेकरांनी ऑफिसला जाण्याऐवजी ट्राफिक पोलिसाबरोबर वादविवाद करून पोलिसांनाच टोपी घातली.एकतर पुणेकरांना (दुस्र्यास )टोपी घालण्याची सवय.आज दुसरा कोण

पनिपत नंतर......

मनराव ·
लेखनविषय:
पनिपतच्या पराभवानंतर मराठी युद्ध कैद्यांचे काय झाले यावर एक लेख काल लोकसत्ताला वाचला....... २२ हजार युद्ध कैद्यांनां अहमद शहा अब्दालीने आपल्या बरोबर अफगाणिस्तानात न नेता बलुचीसस्तान मधे कलातचा खानाच्या स्वाधीन केले... त्या कैद्यांचे पुढे काय झाले याबद्द्लचा हा लेख आहे. तोच लेख मिपा बांधवांसाठी डकवत आहे....

तृप्ती

स्वामी संकेतानंद ·
लेखनविषय:
काव्यरस
(कवितेत टाकू की कथेत कळले नाही तर कवितेतच टाकून मोकळा होतो...) काम्पिल्य नगरात राहणारा गरीब, पापभीरु, ईश्वर साधनेत रमलेला.. स्टिरिओटाईप्ड एक 'क्ष', दंडकारण्यात राहणाऱ्या काळ्याकभिन्न, राकट, हिंस्र.. स्टिरिओटाईप्ड एका 'य' ला पम्पा सरोवराकाठी भेटला.

दिल से सलूट....

dipak bhutekar ·
नुकताच 26 जानेवारीला गणराज्य दिना निमित्त झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्राच्या चार शुर मुलाना "भारत पुरस्कार" या सर्वोच्य राष्ट्रिय बाल शौर्य पुरस्कार साठी गौरवण्यात आले त्यात वैभव घंगारे (वर्धा) , नीलेश भिल्ल (जळगाव), मोहित दळवी (मुंबई) ह्याची शौर्य पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. तर, नागपुरच्या गौरव सहस्त्रबुध्दे (वय15) ह्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गौरवने आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या चार मित्रांना वाचवन्या साठी आपला जिव धोक्यात घातला मित्राचे प्राण तर त्याने वाचवले पण स्वतःचा जिव मात्र त्याला गमवावा लागला.

चौकस

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
निवेदक : तेंव्हा मंडळी .............. अपराध पोटात घाला चुकलं माकलं माफ करा. ( एक लहान मुलगा हेल्मेट घालून स्टेजवर येतो.) अरे हे कोण आले. ए बाळा काय हवय तुला. आणि इथं कसा आलास? ए बाळा...... अरे ए बाळा. मुलगा : ( हेल्मेट काढतो ) काय म्हणालात ओ काका अज्जिबात ऐकू आलं नाही. हेल्मेटमुळे काही ऐकूच येत नाही बघा. निवेदक: अरे मी विचारले कोण आहेस तू. इथे काय करतोयेस? ते हेल्मेट का घातले आहेस. मुलगा: ओ काका मी मीच आहे. माझी आई म्हणते की उगाच नसत्या चौकशा करणार्‍या चहाडबुचक्या माणसाना अज्जिब्बात नाव सांगायचे नाही. निवेदक: काय?

आयडीचे डू-आयडीस पत्र

नीलमोहर ·
तू उडालास... बरं झालं. आणि लवकर उडालास ते आणखीन बरं झालं. नाही तरी जिलब्या टाकत सुटायचास.... काय उपयोग होता तुझा? समज दिल्यानंतर तुझं जिलब्या टाकणं कमी होईल या आशेनं संमंनी तुला डोसही दिला. पण आधी बरा लिहीणारा तू, सुमार जिलब्या प्रतिसादांचा रतीब लावायला लागलास, का तर म्हणे डोक्याला त्रास कमी होतो. मिपाकर तुझी खेचायचे, वारंवार तुझी संपादकांकडे तक्रार करुन, मालकांना पाचारण करायचे. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले, ' ....

ब्रिटीश महासत्तेचा आधार, लंडनच्या मनोर्‍यातील द्रोण कावळे !!

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एकेकाळी ज्यांच्या सत्तेच्या प्रदेशात म्हणे सूर्य मावळत नसे आजही जागतीक पाच मोठ्या महासत्तात ज्या देशाचे नाव घेतले जाते त्या ब्रिटीश महासत्तेचा आधार कोणता ? आधार म्हणून प्रत्येकजण ब्रिटीशांची वेगवेगळी सामर्थ्यस्थाने सांगेल ज्यात त्यांची पंक्च्युआलिटी ते त्यांचे उत्कृष्ट आरमार इत्यादी पण जर कुणी लंडनच्या मनोर्‍याची माहिती घेतली तर हे सर्व खोटे आहे. भारतीयांची मुर्तीपूजा, त्यांच्या गणपतीचे दूध पिणे ते कावळ्याच्या रूपात येऊन मृतात्म्यांनी पिंड खाणे अशा अंधश्रद्धांवर केवळ भारतीयांचीच मोनोपॉली आहे असा दोष दिला जातो.