Skip to main content

संस्कृती

महाभारताच्या राजकारणातली २ प्यादी

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 01/04/2016 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच साहना यांचा अर्जुन आणि कर्ण हा धागा वाचला. या धाग्यात वर्णलेली कथा मूळ मानल्या गेलेल्या महाभारतात सापडत नाही. पण त्यानिमित्ताने महाभारतातल्या या २ पात्रांच्या आडुन झालेले राजकारण तुमच्यासमोर आणण्याची एक संधी नक्कीच मिळाली. साधारण महाभारताच्या कथेतल्या या २ नायकांच्या सूडाच्या प्रवासातील मुख्य टप्पे सगळ्यांनाच ज्ञात आहेत. कर्ण आणी अर्जुन एकाच आईची दोन मुले दैवगतीने वेगवेगळ्या ठिकाणी वाढले.

अजून एक बार..

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 29/03/2016 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या उन्हाळ्यातली एक दुपार. टळटळत होते. बाईक घेउन निघालं. एरवी गावात आंब्या-चिंचेखालची पोरं किंवा आईस्क्रीम-कुल्फीवाला सोडल्यास विशेष लगबग नसेल. बळीराजा रानावनात झोपलेलं. दुपारचे दोन वाजत आलेलं. रस्त्यावर चिटपाखरु नव्हते. गाव नेहमीसारखंच आळसावलेलं. संध्याकाळी अजून काही कामे होती. म्हणून या भेटीकरता दुपारच उत्तम म्हणून निवडलेलं. मॅडम एका बसस्टॉपवर बसलं होतं. मला बघताच स्माईल करत उठलं. कानातले हेडफोन काढून मोबाईल पर्समध्ये ठेवलं. 'हाय' म्हणून हस्तांदोलन केलं चक्क. (असो..!) दुपार थोडी अधिकच टळटळत होतं.

पर्वचा

लेखक विद्यार्थी यांनी सोमवार, 28/03/2016 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही लहान असताना घरातील वयस्कर मंडळी (बहुतेकवेळा आजी) दिवेलागणीला आमच्याकडून पर्वचा म्हणून घेत असे. पर्वचा झाल्यानंतर मराठी वार, मराठी महिने, मराठी तिथी वैगेरे घोकून घेतले जाई. जसे मोठे झालो तसे त्यात पाढेसुद्धा सुरु झाले होते. पर्वचा म्हणण्याची परंपरा अलीकडे लोपच पावली आहे असे म्हणता येईल (अगदी माझा मुलगासुद्धा हे काही करत नाही आणि घरात आजी-आजोबा नसणे हे कारण त्यामागे असू शकते.) गम्मत म्हणून आम्ही रोज म्हणत असणारे श्लोक येथे टाकत आहे. पर्वचा म्हणण्यासाठी माझ्या मुलाच्या मागे लागण्याची प्रेरणा यातून मला होत आहे (यश कितपत मिळेल माहित नाही).

द्रौपदी वस्त्र हरण

लेखक साहना यांनी रविवार, 27/03/2016 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सर्वांना हे माहिती आहेच की युधिष्ठीर दुर्योधनाशी द्यूतात द्रौपदी हरला. दुर्योधनाने मग दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला धरून ओढत फरपटत दरबारात घेऊन यावे. तिला तिथे आणल्यावर दुर्योधनाने दुष्यासनाला द्रौपदीला विवस्त्र करायला सांगितले. द्रौपदीने सर्वांकडे मदतीची याचना केली - आपले पती, भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, परंतु कोणीही हा अन्याय, अनर्थ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या क्षणी त्या ठिकाणी कृष्णाने शपथ घेतली की तो तिथे उपस्थित असलेल्या त्या सर्व लोकांचे प्राण घेईल ज्यांनी द्रौपदीच्या या बेअब्रू होण्याचा देखावा पाहिला आणि तिची मदत केली नाही.

मेट्रो प्रवासात मनुस्मृति वर चर्चा - ब्राम्हण आणि शुद्र

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 25/03/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशातल्या एका मोठ्या प्रसिद्ध विश्वविद्यालय जेथून समाजात बदल घड्विनारे अनेक बुद्धिमंद तैयार होतात. तेथील विद्यार्थांनी मनुस्मृति जाळली. तेथे उपस्थित असलेल्या अधिकांश विद्यार्थांनी मनुस्मृति कधी वाचली हि नसेल. मनुस्मृति जाळण्याचे कारण काय बरे असेल. विद्यार्थांच्यामते शूद्रांचे शोषण करण्यासाठी ब्राह्मणांनी लिहिलेला ग्रंथ अश्यारीतीची काही त्रोटक माहितीच या ग्रंथा बाबत विद्यार्थांना असेल. कदाचित त्या वरून त्यांनी मनुस्मृति जाळण्यातचे ठरविले असेल किंवा कुणी आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर केला असेल. जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठला हि ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही.

पूर्वी

लेखक शैलेन्द्र यांनी बुधवार, 23/03/2016 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी म्हणे जग फार फार छान होत पिंपळाला सोन्याचं खर खर पान होत पूर्वी म्हणे विमान आमचे आकाशात उडायचे धनुष्याच्या लढाईनंतर तिथून फुलं पडायचे बाण घेवून आमचे ऋषी समुद्राला नडायचे साध्याश्या गाईसाठी पण राजाशी लढायचे पूर्वी म्हणे शेतात सकस अन्न पिकायचे बालपणी बचावलेले शंभर वर्ष टिकायचे एका एका गर्भाचे शंभर क्लोन करायचे मोठे मोठे राजे साध्या क्षयाने मरायचे आत्ता आत्ता चाळीत माणुसकी नांदत होती रोज सकाळी नळावर पाण्यासाठी भांडत होती आपल्या वाट्याची मिलो प्रेमाने कांडत होती भरलेल्या एसटीमधून गावो गाव सांडत होती जे होते जसे होते त्याला आपला नमस्कार जिथे आहोत बरे आहोत नको आता माघार आमचं

आंतरजातीय विवाह

लेखक निकुंज यांनी मंगळवार, 22/03/2016 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
काल एका मैत्रीनीचा मेसेज आला. एक कविता पाठवली होती. "चुक कोणाची? माझी का त्याची?". खोदुन विचारल्यावर तीने सांगितल. एका मुलावर तीच प्रेम होत अजूनही आहे. दोघही एकमेकावर मनापासुन प्रेम करत होते, अजुनही करतात. एकमेकांनी घरी सगळ काही घरी सांगितलं. पण घरच्यांनी विरोध केला. कारण एकच दोघांची जात वेगळी म्हणुन. पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता. त्यांची गोष्ट ऐकताना १८५० च्या काळ चालु असल्या सारख मला वाटत होत. लग्नासाठी अजुनही मुलगा आणि मुलगी एकच जातीची असायला पाहिजे हे मला माहितच नव्हत.

होळी रे होळी

लेखक विद्यार्थी यांनी रविवार, 20/03/2016 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
चहा पिताना नजर सहजच कालनिर्णयवर पडली आणि बुधवारी होळी आहे हे लक्षात आले आणि मन लहानपणच्या आठवणींमध्ये गेले. "चला रे होळीची वर्गणी गोळा करूयात", देशपांड्यांचा मिलिंद ओरडला. "किती मागायची वर्गणी यावर्षी? पंचवीस रुपये मागूयात, माहितीयेना मागच्या वर्षी पैसे कमी पडले होते?" मिल्या बोलतच होता. "ए मिल्या तुझा बाप दहा रुपये द्यायला खळखळ करतो आणि तू पंचवीस रुपयांच्या गोष्टी करतोयस", माझा टोमणा. "वीस रुपये मला ठीक वाटतात". ठरले तर मग, यावर्षी वीस रुपये वर्गणी.

सायलेंट ऑबझव्हर, सोनोग्राफी, आणि सेक्स रेशो तसेच बायल्ये

लेखक गॅरी शोमन यांनी शुक्रवार, 11/03/2016 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातल्या एक माणसाने अथक प्रयत्न करुन सायलेंट ऑबझर्व्हर नावाचे एक सयंत्र शोधुन काढले त्याचा सत्कार "चला हवा येऊ द्या" कार्येक्रमात ८ मार्च च्या दिवशी अनेक स्त्रीयांनी केला हे आपण पाहीले असेल. परदेशात नोकरी करुन भारतात स्थायीक झालेल्या माणसाने हे उपकरण शोधले जे सोनोग्राफी मशीनने काय काय दाखवले ते रेकॉर्ड करते. हे रेकॉर्डींग पाहिले की समजते की सोनोग्राफी सेंटर्स ना सेक्स रेशो संदर्भात किती सामाजीक जाणिव आहे.

शब्दांची ताकद

लेखक shawshanky यांनी मंगळवार, 01/03/2016 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या खोल गाभाऱ्यात काय घडतंय त्याचा उपसा करून इतरांसमोर ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शब्द. कितीतरी अक्षरांचे निरर्थक तुकडे गोळा केले, की शब्दाची निर्मिती होते. पण समर्पक अर्थाचे भार वाहणारे, पेलणारे आणि तोलणारे शब्द किती वापरावे लागतात .शब्द धीर देतात, हसवतात, रडवतात आणि कधी कधी जखमीही करतात. धारदार हत्यारांनी केलेल्या वारापेक्षाही शब्दांनी झालेली जखम अतिशय खोल आणि सतत भळभळून वाहणारी असते.शब्दांनी मने उभी राहतात. मनामुळे माणूस उभा राहतो.