Skip to main content

संस्कृती

जगण्याला आधार हवा!

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 28/03/2020 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक जिल्ह्याच्या वेशीवर तात्पुरत्या निवारा शेडस उभाराव्यात व परिस्थिती धोकादायक नाही याची खात्री होईपर्यंत त्यांना तेथे आश्रय द्यावा. त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राबवावी. असे केल्यास तात्पुरते आयसोलेशन कॅम्प तयार होतील. गावेही सुरक्षित, गावकरीही सुरक्षित आणि स्थलांतरास निघणारे नागरिकही सुरक्षित राहतील. यंत्रणेवर ताण पडेल, पण अपरिहार्य परिस्थितीत तो गृहितच असतो. त्यालाच डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतात!आ

मन्त्र,स्तोत्र आणि आपण..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 28/03/2020 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धा क्रमांक:-१)वेद/पुराण स्तोत्र आणि मंत्रामधून, मंत्रांना असलेल्या स्वरांमुळे येणाऱ्या लहरींचा भौतिक,जैविक स्वरूपाचा परिणाम आपल्या (शरीरावर) होतो श्रद्धा क्रमांक:-२)वेद/पुराण मन्त्र व स्तोत्र म्हटल्यामुळे त्या त्या स्तोत्रा/मंत्रात-असलेल्या देवता विशिष्ट शक्तीच्या स्वरूपात आपल्याजवळ येतात.

बुरा न मानो होली है! (एक Holy लेखण!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 09/03/2020 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश-क्लेमर:- वाचकांना शीघ्र फलप्राप्ती व्हावी म्हणून (व आज होळी असल्यामुळेही..) सदर प्र-संग थोडा रंगवून टाकलेला आहे,मूळ रंगासह! ह्याची दखल घ्यावी. त्या:- खुरुजीईईईईईई.. मी:- खाय? (आपलं ते हे..)काय? त्या:- तुमचा नंबर द्या ना...प्लल्लल्लीईईईईईईज!!! मी:- कृपया लाडीकपणे बोलू नका! त्या:- हही हही हही ही.. गुरुजी तुमचा नंबर मिळेल का? मी:- कशाला ? (ब्याद टळावी म्हणून!) आपण माझ्या क्लायंट नाही! त्या:- बरं! हितेच एक सांगाल का- (प्लिईईईईज!) मी:- विचारा! (प्लेड!) त्या:- माझ्या ना घरी एक इव्हेंट करायचाय(फुलटॉस!) मी:- काय मॅनेजमेंट करू? (सिक्स) त्या:- हु हु हु हु हु हु!

आधुनिक निष्काम कर्मयोग

लेखक Jayant Naik यांनी मंगळवार, 03/03/2020 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
                                  आधुनिक निष्काम कर्मयोग.   कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।   मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ४७  जवळ जवळ सर्वमान्य अर्थ : तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा असू नये.

मानव प्रगल्भ अनसुय कधीच होणार नाही ?

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 28/02/2020 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
"असुं"या च्या जिद्दीने व्यवहार सिद्ध होतो असूया घर करते सुंदर सत्यास कडवट मानत खुले विनाअट प्रेम पारखे होते कल्पना आणि विचार करा.. एकपत्नी व्रताचे बंधन तोडून राधेकडे पाहिल्या बद्दल .. सीता रामाची अग्नी परीक्षा घेते रेणुका जमदग्नीचा प्राण मागते अहल्या गौतमास पत्थर होण्याचा शाप देते एखादा टिम मेंबर दुसर्‍या टिम मधून प्रेमाने खेळता पझेसिव्ह असुरक्षीत खोलवर जखमा ऐकलेत कधी? ऑनर पनिशमेंट्स ऑनर किलींग्स असूयेने पछाडलेली व्यवहार पूर्णत्वास नेऊनही प्राकृतिक प्रेमाचा निषेध करणारी अप्राकृतिक बंधने अटळच असावित का ?

#नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर आणि #वाराणासी दर्शन!

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 22/02/2020 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक महिन्यांनंतर मिपावर आले आहे... लेखन तर नाहीच पण वाचन देखील काही महिने जमलं नव्हतं. पण आता परत एकदा सगळंच सुरू करीन म्हणते. #नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर आणि #वाराणासी दर्शन! वाराणासी म्हणजेच आपली काशी आणि येथील श्रीकाशीविश्वेश्वर मंदिर! भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी #नमामिगंगे कार्यक्रमाआंतर्गत गंगा नदीला पूर्ववत निर्मळ आणि प्रदूषणरहीत करण्याचे ठरवले आणि यासाठी लगेच आर्थिक निधी उभारून हे काम २०१४मध्ये सुरू केले. अजूनही या कार्यक्रमाची पूर्तता झालेली नाही हे जरी सत्य असले तरी आजची #वाराणासी हे पूर्वीपेक्षा शतपटीने स्वच्छ शहर झालं आहे; असं सतत ऐकत होते.

शिवाजी महाराज आणि स्त्रियांचा आदर

लेखक अनाहूत यांनी गुरुवार, 20/02/2020 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतात्सु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः शिवाजी महाराज कि जय . सगळा आसमंत दुमदुमून गेला या गर्जनांनी . सगळीकडे उत्साह भरून राहिला आहे. शिवाजी महाराज , काय आहे या माणसामध्ये जे इतके वर्ष होऊन गेले म्हणजे अगदी इ.स. १६३० ते १६८० चा काळ तो. आज १९ फेब्रुवारी २०२० , शिवजन्मापासून ३९० वर्ष होऊन गेलीत पण त्यानंतरही इतक्या अठरा-पगड जातीमधे मानान घेतलं जाणार नाव . काय कारण असेल कि इतके शूर-वीर होऊन गेले , इतके शासक होऊन गेले पण शिवाजी महाराजांची पातळी कोणी गाठू शकाल नाही.

श्री अमृतानुभव अध्याय तिसरा - वाचाऋणपरिहार

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 30/01/2020 03:20 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्रीराम समर्थ || बाहेर एकदम जोरदार पाऊस कोसळतोय . नदीच्या दुथडी भरुन वाहणार्‍या पाण्याचा खळखळाट अगदी इथवर ऐकु येतोय , नदी धुसरशीच दिसत आहे पण तिचं अस्तित्व अगदी सुस्पष्ट जाणवत आहे. अधुन मधुन जोरदार विजा कडाडत आहेत अन त्याच्या प्रकाशात निमिषार्धच नदी चा प्रवाह उजळुन निघतोय. आणि आपण हे सारं अनुभवतोय ह्या जुनाट शिवालयाच्या आसर्‍याला बसुन ! जुनेच पण प्रशस्त आणि आत्ता ह्या वेळेला तर अगदीच निर्जन. अगदीच नाही म्हणायला मंदिराच्या दुसर्‍या कोपर्‍यात बसलेले ते २ ४ सन्यासी आहेत , पण त्यांचीही काही बडबड नाही , ते त्यांच्या गांजासेवनात सुखाने तल्लीन झाले आहेत.

महाराष्ट्राचा गवगवा वाढत आहे

लेखक माहितगार यांनी बुधवार, 08/01/2020 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी मागे एक महाराष्ट्रीय स्त्री जेव्हा देशाची लाज काढते ? :( नावाचा लेख लिहिला. इंटरेस्टींगली संदर्भाचा व्हिडीओ कदाचित माजी पाकिस्तानी राजदूतांनी चुक उमगल्या नंतर कधितरी हळूवार डिलीट केला त्यामुळे त्या लेखात पोक्ळी निर्माण झाली होती. त्याच महाराष्ट्रीयन स्त्री लेखिकेस स्वदेश विरोधाचे काम सध्या कसे चालू आहे हे माहित नाही पण केवळ स्वदेश विरोध पुरेसा नसतो त्याचा गवगवाही झाला पाहिजे तर गवगवा चालू ठेवणारे आणखी नव्या मराठी कथालेखिकेचे नाव पुढे आले आहे. तर सदर मराठी लेखिका हिवाळ्याची गार हवा खाण्यासाठी बाहेर निघते.

नाताळ, नववर्ष आणि पॉप संगीत

लेखक सुधीर कांदळकर यांनी मंगळवार, 31/12/2019 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही सूर अवखळ मनाला बेईमान बनवतात. ते कानी आले की मनाला फुलपाखरांचे मोहक पंख फुटतात. स्पॅनिश गिटार टणकारले वा सेक्साफोन फणकारले की असे होते. ऍकॉर्डिअनमधून रेशीमलहरी बाहेर पडल्या की मग आपले आपण राहात नाही. मन स्मृतींच्या फुलपाखरांवर स्वार होते, कालाचे अदृश्य तट विरघळून जातात आणि ते सूर आपल्याला गतकाळात घेऊन जातात. ते स्वर कानी आले की प्रथम आठवतो तो नाताळ आणि त्यापाठोपाठ येणारा नववर्षोत्सव. एके काळी पॉप संगीताशिवाय हे उत्सव साजरे होत नसत. धीरू पटेल आणि बाळ्या नाईक यांच्यामुळे गुजराती जवाहर मर्चंट, कन्नडिग रत्नाकर आचार्य, इ. नवे मित्र मिळाले.