संस्कृती
श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये
रामनवमीनंतर येते ती हनुमान जयंती. चैत्र पौर्णिमा.
मनोजवं मारुततुल्य वेगं
जितेन्द्रीयं बुद्धीवतां वरिष्ठं
वातात्मजं वानरयुथमुख्यं
श्रीरामदूतं शरणंप्रपद्ये॥
बोलो बजरंगबलि की जय।
पवनपुत्र हनुमान की जय।
महामहोपाध्याय, जैन आणि अंगवस्त्र
अशोक जैन.. एक ज्येष्ठ वगैरे पत्रकार....
सर्व साहित्यिक वगैरे मंडळींचे पाय कसे मातीचेच असतात हे सांगणारे त्यांचा एका दिवाळी अंकातला लेख मित्राने खास रेकमेंड केल्याचे स्मरते... बर्याच थोरांची टर उडवणारा तो गंमतीदार लेख आवडला होता...
कार्ट्यांस...
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित.
(चालः चल री सजनी अब क्या सोचे)
लिही रे भावा तू अपुल्या मनचे
डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे
लिही रे...
टाकून खरडी भिक्षा मागणे
जमवून कंपू गोंधळ घालणे
असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे
लिही रे...
असेलही तुझी लेखणी धमाल
करिती इथले सगळेचि लाल
स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे
लिही रे...
लिहीले जरी तू ओतुनि तनमन
गेले जरी पुढच्या पानी ते पटकन
दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे
लिही रे...
जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी
आतल्या गोटात लावावी वरणी
भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे
लिही रे...
पुणेरी मिसळची 'सेंच्युरी'
पुण्यातील आद्य मिसळ अड्ड्यास १०० वर्षे पुर्ण होत आहेत. रवीवार पेठेतील रेल्वे बुकिंग ऑफीस शेजरी असलेले "वैद्य उपहार गृह" हे ते ठिकाण. हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर ९९ पुर्ण करून शतकी वर्षात प्रवेश करीत आहे.
या निमीत्त सकाळ मधे एक लेख आला आहे. तो पुढील प्रमाणे
पुणेरी मिसळची 'सेंच्युरी'
पुण्याची वैशिष्ट्ये अनेक. पुणेरीपण जपणारी. पुणेरी मिसळ त्याच परंपरेतली. पुणेरी मिसळ म्हटले, की हमखास तोंडावर येते वैद्यांची मिसळ.
रामाचे नवरात्र
लेखन प्रेरणा- हर्षद (५० फक्त)
मिसळपाववर सदस्य होऊन १ वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला पण प्रतिसादांच्या पूढे जाऊन आपल्याला काही लिहिता येणारच नाही अशी अकारण खात्री होती. पण हर्षदनी मला प्रोत्साहन देऊन नवरात्रावर लिहीच म्हणून उद्युक्त केलं आणि आज लिहुच म्हणून रामाचं नाव घेऊन सुरुवात करतेय..
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला रामाच्या नवरात्राला सुरुवात होते. देवीच्या नवरात्रासारखीच सरळ सोपी पूजा असते.
फोरिनची पाटलीण
एक तृप्तीचा ढेकर देउन शंकरराव पाटावरुन उठले आणि ओसरीवर येउन बसले. आता एकेक करत मंडळी येतील आणि दुपारचा चहा होइस्तोवर पंचायतीची कामं उरकुन घेता येतील असा शंकररावांचा कयास होता. शंकररावांकडे तशी गावची पाटीलकी पिढीजात होती त्यात सरपंचपद पण त्यांच्याकडेच होते. त्यामुळे ते गावात आब राखुन होते. वर्षाकाठी एकदा पालकमंत्री, शिक्षणमंत्री गावच्या शाळेला भेट देउन जातील याकडे ते जातीने लक्ष घालत त्यामुळे आजुबाजुच्या गावांमध्ये पण त्यांचा वट होता.
मिसळपाव