लेखन प्रेरणा- हर्षद (५० फक्त)
मिसळपाववर सदस्य होऊन १ वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला पण प्रतिसादांच्या पूढे जाऊन आपल्याला काही लिहिता येणारच नाही अशी अकारण खात्री होती. पण हर्षदनी मला प्रोत्साहन देऊन नवरात्रावर लिहीच म्हणून उद्युक्त केलं आणि आज लिहुच म्हणून रामाचं नाव घेऊन सुरुवात करतेय..
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला रामाच्या नवरात्राला सुरुवात होते. देवीच्या नवरात्रासारखीच सरळ सोपी पूजा असते. पूजेच्याही आधी वातावरणात जो उत्साह भरलेला असतो त्याने सकाळीसच राममय व्हायला होतं. घरामागच्या राम मंदिरात सकाळीच सुरेख गाणी, भजनं सुरु होतात आणि ती गुणगुणतच नवरात्राच्या तयारीला सुरुवात होते.
सकाळी सडा रांगोळी (फ्लॅटच्या दारात जमेल तशी) , आंब्याची पाने धुवून पुसून त्याचं तोरण यासगळ्या लहानपणीपासून प्रत्येक सणाला धावून धावून केलेल्या गोष्टी त्याच उत्साहाने केल्या जातात. पुरण, तळण याची तयारी सहसा आद्ल्या रात्रीच करून ठेवलेली असते. घरातल्या बाकी तयारीत जरी नवरा कधी उत्साहाने तर कधी माझी कटकट नको म्हणून मदत करत असला तरी पुरणा-वरणाच्या स्वयंपाकात त्याची मदत न घेतलेलीच बरी असते :) . असो. मग आंघोळी आटपून मी गुढी उभारण्याच्या कामात लागते. गुढीला सजवणे ही माझी अतिशय आवडीची गोष्ट आहे. गाठी, हिरवी साडी, आंब्याची पानं, कडूलिंबाचा पाला, कलश यासगळ्यानी गुढीचा मेकप करून मग नवरात्रं स्थापना होते. संकल्प सोडून रामाला नऊ दिवसाची परर्फॉर्मन्स ग्यारंटी दिली जाते ;) . काही लोकांकडे घट बसवतात आमच्याकडे मात्र नऊ दिवस अखंड दिवा ठेवण्याची पद्धत असते पण ती काही बिनचुक पाळली जात नाही तेव्हा शक्य तितका वेळ दिव्याची ज्योत तेवती ठेवण्याचा प्रयत्न असतो. मग स्वयंपाक करून आणि नैवेद्य दाखवून जेवणं करायची आणि हे सगळं सकाळी साडेनऊच्या आत कारण ऑफिसची गडबड असतेच. गुढीपाडवा असो नाहीतर रामनवमी रोजची गडबड काही चुकत नाहीच.
पुढे नऊ दिवस सकाळ संध्याकाळ आरती, रामरक्षा, प्रसाद असतो आणि नवमीला रामजन्म. बा़की सगळ्या गोष्टी गुढीपाडव्या सारख्याच असतात फक्त गुढी उभारयची नसते त्या ऐवजी रामजन्माची भर असते. रामजन्माचा प्रसाद मात्र अगदी ठरावीक असतो. सुका मेवा, खडी साखर आणि सुंठवडा मस्ट. याशिवाय मग फळं, पेढे, मिठाया वगैरे आवडीनुसार.
नवमीच्या दुसर्या दिवशी रामजन्माचं पारणं असतं. यादिवशीच्या पारंपारिक प्रथेत मात्र मी माझ्यापुरता बदल केला आहे. प्रथेनुसार सवाष्णं जेऊ घालायची असते मात्र याहीदिवशी सुटी नसतेच. म्हणून मग मी सवाष्ण जेऊ घालण्याऐवजी एखाद्या गरजू व्यक्तीला पैसे देणे किंवा दहावीतल्या एखाद्या गरजू विद्यार्थ्याला पुस्तकं घेउन गेणे असं काहीतरी करते. दहावीच्या मुलांची एप्रिल ही साधारणपणे पुस्तकं खरेदीची वेळ असते. हे करून माझ्या रामाला सवाष्ण घातल्यापेक्षा जास्त आनंद होतो याची मला खात्री आहे.
असे हे नऊ दिवस नऊ रात्र आम्हाला दैनंदिन जीवनात काहीतरी वेगळेपण, थोडासा भक्तीभाव आणि सासूबाईंनी प्रेमाने सुरु केलेल्या प्रथा त्यांच्या नंतरही पुढे नेल्याचं समाधान देउन जातात.
वाचन संख्या
4341
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
असे हे नऊ दिवस नऊ रात्र
स्वागत आहे लेखकांच्या यादित.
नाही मुर्ती नाहीए फोटोलाच
In reply to स्वागत आहे लेखकांच्या यादित. by ५० फक्त
आमच्याकडे देव्हार्यात आहेत
In reply to नाही मुर्ती नाहीए फोटोलाच by मी ऋचा
मस्त लिखाण
धन्यु! तुझं म्हणणं खरय पण हे
In reply to मस्त लिखाण by प्रचेतस
पहिला लेख मस्तच..
हो हे मात्र नक्कि खरं!
In reply to पहिला लेख मस्तच.. by गवि
चांगला लेख, फोटू कुठायत?
अगं फोटो नाही काढले यावेळी
In reply to चांगला लेख, फोटू कुठायत? by पुष्करिणी
अजून डिट्टेलवार वाचायला आवडले
छान लेखन. अजुन विस्तृत
छान लिहिलस.
बारा
ब्राह्मण -सवाष्ण
काका बरोबर आहे जेवु
In reply to ब्राह्मण -सवाष्ण by रामदास
चांगली पद्धत
वर्षातून एकदा तरी
In reply to चांगली पद्धत by सखी
प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे
''जेवु घालण्यातली मजा मला
नक्की या सगळे मिपाकर.
वा वा अगदी उत्तम लेखन. आजोळी
धन्यु परा!
In reply to वा वा अगदी उत्तम लेखन. आजोळी by परिकथेतील राजकुमार
छान नेटका लेख !!
मस्त