Skip to main content

समाज

हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांना आदरांजली

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 27/02/2011 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
आज हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांचा ८० वा हौतात्म्यदिवस. हुतात्मा चंद्रशेखर आजाद हे हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल यांच्या नंतरचे हिंदुस्थन प्रजासत्ताक समाजवादी सेनेचे सरसेनापती. प्रखर देशभक्त, धाडसी योद्धा, कुशल संघटक या बरोबरच नेता कसा आसावा याचे हुतात्मा चंद्रशेखर आजाद हे उत्कृष्ठा उदाहरण आहेत. एकदा देशकार्यात स्वत:ला झोकुन दिल्यानंतर कुठल्याही भावनांना थारा नाही हे त्यांनी वेळोवेळी आपल्या सहकार्‍यांना समजावलं. एकदा सहज हुतात्मा भगतसिंह त्यांना म्हणाले होते की त्यांनी त्यांच्या घरचा ठावटिकाणा द्यावा म्हणजे जर दुर्दैवाने वेळ आलीच तर इतर सहकारी त्यांच्या घरच्यांची वास्तपुस्त घेऊ शकतील.

वि दा सावरकर

लेखक अवलिया यांनी शनिवार, 26/02/2011 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
विनायक दामोदर सावरकर. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम यशस्वी होण्यासाठी ज्या अनेकांचे योगदान लाभले त्यातील एक अग्रणी नाव. या नावाचा उल्लेख केल्याखेरीज भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची कथा पूर्ण सांगितली जाणार नाही. राजकारण, विज्ञान, साहित्य, समाजकारण, धर्म इत्यादी जवळपास सर्वच क्षेत्रात सावरकरांनी आपल्या विचारांचा ठसा उमटवला आहे यात शंका नाही. दूरदृष्टी असलेला द्रष्टा नेता हे बिरुद ज्या थोड्या लोकांना शोभुन दिसते अशांपैकी एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर.

सार्‍या जातींना खड्यात जावूद्या

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 23/02/2011 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
सार्‍या जातींना खड्यात जावूद्या
सार्‍या जातींना खड्यात जावूद्या आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||धृ|| नका कुणी हो जातपात मानू नव्या कल्पना अंमलात आणू जुने विचार मसणात जावूद्या आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||१|| ह्या जातींनी काय नाय केलं माणसामाणसात भांडन लावून दिलं सख्खेशेजारी वैरी होती एकमेकांचे गळे कापती मी उच्च तू निच ते म्हणती असलं वाईट वागणं तुम्ही थांबवा या जातींना खड्यात जावूद्या ||२|| ब्राम्हण, मराठा, शिंपी, सोनार तेली तांबोळी कुणगर, महार कोळी कोष्टी कोकणा भामटा भिल्ल रामोशी मातंग बेमटा किती जात
काव्यरस

प्रिय विनील,

लेखक श्रावण मोडक यांनी बुधवार, 23/02/2011 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र.

गुरुदत्तः तीन अंकी शोकांतिका - एक अभिजात मराठी पुस्तक

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 22/02/2011 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुरुदत्त आवडलेले पुष्कळ लोक भेटतात. व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्तानं ‘टाईम’मासिकानं काही दिवसांपूर्वी जी रोमँटिक चित्रपटांची यादी जाहीर केली, तीत ‘प्यासा’चं नाव पाहून अनेक भारतीयांना आनंद झाला. तो आनंद ठीकच होता.

शिवजयंतीची 'वरात'

लेखक महेश_कुलकर्णी यांनी सोमवार, 21/02/2011 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ : शनिवार १९ फेब्रुवारी २०११, संध्याकाळ ठिकाण : छोटेसे तरुण गणेशोत्सव मंडळ. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सरकारी जयंती (अनेक तिथी असल्यामुळे नक्की कोणते ते नमूद केले). सर्व शिवभक्तांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण.

कुर्‍हाडीचा दांडा

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 21/02/2011 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
कुर्‍हाडीचा दांडा काही दिवसापूर्वी मला माझ्या एका मित्राने एक बातमी सांगितली. "महाराष्ट्र शासनाने कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेला शेतकरी प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झाला आहे." खरे तर ही दु:खद बातमी. ज्याच्या कुणाच्या नशिबात हा भोग आलाय, त्याच्याबद्दल हळहळ आणि मनात सहानुभूती निर्माण करणारी बातमी. पण ही बातमी ऐकताना मला मात्र अजिबात दु:ख झाले नाही किंवा ऐकल्यावर माझ्या मनाच्या कोणत्याच कोपर्‍यात तीळभरही सहानुभूती निर्माण झाली नाही, उलट ही बातमी मला आनंदच(असूरी?) देऊन गेली.

डेफिनेशन बदललेला मित्र

लेखक विनायक पाचलग यांनी रविवार, 20/02/2011 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
मला अत्यंत जीवाभावाचा असा मित्र नाही. म्हणजे मित्र आहेत बरेच, पण ते सगळे नेहमीच्या भाषेत दुसऱ्या वर्तुळातले. जय-वीरू टाईप किंवा दो हंसो का जोडा टाईप मित्र आजपर्यंत तरी मला नाही. निकोप नसलेली स्पर्धा, शालेय राजकारण, संशयी वातावरण आणि या सगळयातुन हरवलेली निखळता अशी अनेक कारणे त्याला आहेत, आणि त्याची जाणीवही मला आहे. पण, तरीही असा कोणीतरी मित्र नसल्याची खंत कुठे ना कुठे तरी मला आहे, आणि का असु नये?