Skip to main content

समाज

बर्मा फ्रंटवरून........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 27/03/2011 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, माझ्या मराठालाईट इन्फंट्रीच्या आभ्यासादरम्यान हे एका सैनिकाने त्याच्या प्रेयसीला लिहीलेले पत्र सापडले. त्याचे भाषांतर केले आहे. सैनिकांची मनस्थिती यात बरीच समजून येते. हे पत्र बर्माहून लिहीले आहे. प्रियतमे, पंख असते तर तू उडत येथे आली असतीस असे सारखे म्हणतेस, पण खरंच तुला येथे यायला आवडेल का ? तुला आवडेल की नाही हे मला माहीत नाही पण तू येथे आलेले मला आवडणार नाही हे निश्चित. येथे येण्यात धोके आहेत, नाही असे नाही, पण याही पलीकडे काही कारणे आहेत. धोके तर आमच्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत.

अंताजीची बखर - ऐतिहासिक महत्त्वाची ऐतिहासिक कादंबरी

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 24/03/2011 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
‘मराठी ऐतिहासिक कादंबरी’ असं म्हटलं की काही ठराविक नावं समोर येतात. त्यांचा एक साचादेखील जवळपास ठरलेला असतो. एखादी ऐतिहासिक महत्त्वाची व्यक्ती किंवा घटना घ्यायची आणि अलंकृत (किंवा अगदी शब्दबंबाळ!) भाषेची खैरात करून त्या व्यक्ती/घटनेभोवती एक महिरप तयार करायची. मराठी मनाला पूज्य आणि अभिमानास्पद वाटतील अशा, म्हणजे मराठ्यांचं शौर्य वगैरे उदात्त गोष्टींची त्या कादंबरीत भलामण करायची. असं केलं म्हणजे मराठी लोक तिच्याविषयी भरभरून बोलतात.

पाणी

लेखक विकास यांनी बुधवार, 23/03/2011 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
१९९२ सालच्या "रिओ वसुंधरा शिखर परीषदेच्या" (Earth Summit) निमित्ताने २१ व्या शतकातील पर्यावरणीय समस्यांबद्दल बराच उहापोह झाला. त्यातील पर्यावरणीय बदलासंदर्भात प्रथमच घेतलेल्या काही निर्णयांमुळे ही परीषद जास्त लक्षात राहीली. याच परीषदेत "जागतीक जल दिन" चालू करण्यासंदर्भात सुचवण्यात आले आणि १९९३ पासून, दरवर्षी २२ मार्च हा "जागतिक जल दिन" म्हणत साजरा केला जाऊ लागला.

बातमी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 22/03/2011 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही हिस्स बघितला आहे का? हा तोच तो. मल्लिका शेरावतचा. बघितला आहे असे उघड उघड मान्य करणारे लोक या पृथ्वीतलावर फार कमी सापडतील. तसा हिस्स मीही बघितलेला नाही आहे. खरेच सांगतो. पण मल कथा महिती आहे. तिच ती जुनी कथा. इच्छाधारी नागिण आणि तिचा प्रतिशोध. विषयही तसा जुना आहे. यापुर्वी नागिन (सुनील दत्त, संजय खान, फिरोज खान रेखा, रीना रॉय फेम), जानी दुष्मन (डझनावारी हीरो फेम) असे बरेच चित्रपट नाग / नागिणींच्या प्रतिशोधावर येउन गेले आहेत. या सगळ्या चित्रपटातले एक समान सूत्र असे आहे की हे सगळे चित्रपट नेहेमी मल्टिस्टारर असतात. (मल्लिका शेरावतचा हिस्स सोडुन.

नीलकांत यांचा आज वाढदिवस

लेखक इंटरनेटस्नेही यांनी मंगळवार, 22/03/2011 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, आज आपल्या मिसळपाव या बेव साईटचे मालक श्री. नीलकांत यांचा आज (२२ मार्च) वाढदिवस आहे! सुरुवातीस मिपाची तांत्रिक बाजु भक्कमपणे सांभाळणारे नीलकांत, अनेक महिन्यांपासुन मिसळपाव.कॉम चा एवढा प्रचंड डोलारा एकहाती समर्थपणे चालवत आहेत. काळाबरोबर अतिशय वेगाने बदलत्या तांत्रिक आणि अन्य आव्हानांच्या आजच्या घडीला नीलकांत यांच्या शिवाय मिपा ही कल्पना सुद्धा करवत नाही. नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्या प्रथा आपण कशासाठी विसरायच्या?

लेखक योगप्रभू यांनी सोमवार, 21/03/2011 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
परवा होळी झाली आणि काल धुळवड. रस्त्यावर सगळेजण रंग खेळत होते. दिवसभर प्रसारमाध्यमांनी 'होली है' टाईप बातम्यांचा आणि नाचगाण्यांचा मारा चालवला होता. आम्ही राहतो तिथेही शेजारच्या इमारतीमधील मराठी लोक मस्त रंग खेळत होते. एकाने विचारले, 'काय रंग नाही खेळायचा का?' त्यावर मी म्हटले, ' मराठी समाजात त्यासाठी रंगपंचमीचा दिवस राखून ठेवला आहे. आम्ही होळीला रंग खेळत नाही. ती प्रथा उत्तरेकडची आहे. त्यांना करु देत त्यांच्या पद्धतीप्रमाणे. ' त्यावर त्याने माझ्याकडे 'काय मूर्ख आहे?' अशा नजरेने पाहिले आणि विचारले, 'रंगपंचमीला काही सुटी नाही.

रंगपंचमी तील अनिष्ट प्रकार

लेखक शुचि यांनी रविवार, 20/03/2011 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
रंगपंचमीचा अंगावर काटा आणणारा अनुभव लिहीते आहे. खूप वर्षे झाली त्या गोष्टीला. नवरा जहाजावर होता आणि आमचा फक्त साखरपुडा झालेला होता. मी मुंबईच्या एका महाविद्यालयात शिकत होते आणि हॉस्टेलवर रहात होते. दर शनिवारी, रवीवारी मी सासरी जाऊन रहायचे कारण नवरा एवीतेवी नव्हताच त्यामुळे आईबाबानी परवानगी दिली होती. त्यायोगे सासरच्या लोकांशी ओळख होत असे, रीतीभाती समजत असत. एका रवीवारी नेमकी रंगपंचमी आली. आणि मी परत हॉस्टेलवर निघाले. मला सासूबाईंनी जाऊ दिले. त्यांच्या लक्षात आले नसावे की या दिवशी स्त्रियांनी मुंबईत बाहेर पडणे किती धोक्याचे असते. झाले मी रेल्वे स्टेशनवर गेले, सामसूम होती.