Skip to main content

समाज

परसूंकीच बात है...

लेखक विसुनाना यांनी सोमवार, 24/10/2011 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
"क्यों मियां, कब देते टीवी? भोत दिनां हो गये ना..." "परसूं आजाव साब, तबतलक पक्का रेडी करके रैता." "ऐसा घुमाव नक्को मियां, ये तुम्हारे परसूं का एक कौनसातोबी तारीख बताव" "पक्का परसूं, साब. परेशान नै हुनाजी" -किंवा - "ये परसूंकीच बात है, हिंया सामनेईच ठैरा था जॉर्ज बुश!" "कुछ तो बी बोलते क्या? उन्हें आके भोत सालां हो गये ना" "हौला है क्या रे? परसूं बोलेतो अपना हैदराबाद का परसूं रे. नया आया क्यारे हैदराबादमें?" जुन्या हैदराबादेत 'परसूं' या शब्दाला फार्फार महत्त्व आहे. परसों म्हणजे परवा. कालच्या काल किंवा उद्याच्या उद्या.

थँक गॉड इट्स् फ्रायडे..बट नो थँक्स..

लेखक गवि यांनी सोमवार, 24/10/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
"बेतार योजना और समन्वय स्कंध" असा बोर्ड असलेल्या हपीसात बरोब्बर चौदा वर्षांपूर्वी मी एरॉनॉटिकल रेडिओ लायसेन्सच्या परीक्षेला गेलो होतो. त्यावेळी पाचदहा टक्के पासिंग रेट असलेली ही परीक्षा.. पण तरीही त्यावेळी माझ्यासोबत असलेले सर्व शिकाऊ पायलट मित्र दिल्लीत पोचण्यापूर्वीपासूनच परीक्षेपेक्षा जास्त तीव्रतेने वाट पहात होते ती परीक्षेनंतर त्याच संध्याकाळी ठरलेल्या टीजीआय फ्रायडेमधल्या पार्टीची. मी त्यावेळी "घेत" नसल्याने, शिव शिव करुन त्या सर्वांना वसंतविहारमधे "ड्रॉप" केलं आणि तीच गाडी दिल्लीभर फिरवून तीन तासांनी परत त्यांना पिकअप करायला आलो. तेव्हा मोबाईल वगैरे काही सर्वांकडे नसायचे.

हे ssss इथं

लेखक शिल्पा ब यांनी सोमवार, 24/10/2011 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
आपण खुपदा एखाद्याशी बोलताना विचारतो कि अमुक अमुक रस्ता, बिल्डींग इ. कुठे आहे? उत्तर " हे इथंच तर आहे". ..हे इथच म्हणजे नक्की कुठं?

डॉक्टर 'क्ष'

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 24/10/2011 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, प्रत्येकजण आयुष्यात उतारचढ, आनंद, दु:ख आपापल्या परीने अनुभवत असतो. पण काही उतारचढ असे असतात की माणसाचा कस लागतो, सत्वपरीक्षा घेतो काळ. असे अनुभव न यावेत तेच बरे. नाहीतर सामान्य विचारसरणीचा माणूस गवताच्या वाळलेल्या पात्याप्रमाणे हरवून जातो त्या वादळात. ही कहाणी आहे डॉक्टर 'क्ष' यांची. माझ्या जन्मापासून ते आतापर्यंत हेच माझे फॅमिली डॉक्टर. सत्तरच्या दशकात डॉक्टरांनी 'प्रॅक्टीस' सुरु केली. त्यावेळी डॉक्टर म्हणजे फारच प्रतिष्ठित आणु दुर्मीळ कौशल्य असलेले व्यक्ती. डॉक्टरांचा जम बसला, पुण्यात त्यांची प्रॅक्टीस चांगली सुरु झाली.

प्रसारमाध्यमांचा बेजबाबदारपणा..

लेखक श्रीरंग यांनी रविवार, 23/10/2011 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुणे मिरर पान क्र.२ वरील बातमी वाचली आणी तळपायाची आग मस्तकात गेली. काही महिन्यांपूर्वी हिंजवडी येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार करणार्या तीघांना जन्मठेप झाल्याच्या बातमीबरोबरील फोटो पाहून कोणत्याही सामान्य माणसाला चीड आल्याशिवाय राहणार नाही. शिक्षा झालेला गुन्हेगार एखाद्या ऑलिंपिक विजेत्याच्या थाटात हात उंचावून, जमलेल्यांना निगरगट्टपणे अभिवादन करत होता. मुळात, बलात्कारासारखा नीच गुन्हा करून एका स्त्रीच्या व तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याची राखरांगोळी करणार्या हरामखोरांना अतिशय निर्घ्रुण शिक्षेची तरतूद असायला हवी.

आली आली हो दिवाळी-

लेखक विदेश यांनी रविवार, 23/10/2011 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली हो दिवाळी सांगे दारी ही रांगोळी स्वागतास सज्ज राहू प्रकाशात घरोघरी ! सुसंवादी भेटीत त्या काव्य शास्त्र विनोदाच्या - एकमेकांना देऊ या शुभकामना मनीच्या ! करू विना आवाजाने छान दिवाळी साजरी , ठेवू प्रदूषणमुक्त वसुंधरा ही गोजिरी ! गोडधोड चवदार खमंगशा फराळात- भूक गोरगरीबांची नित्य घेऊया ध्यानांत !

एका नवीन देवस्थानाचा जन्म

लेखक सन्जोप राव यांनी शनिवार, 22/10/2011 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
'एका नवीन देवस्थानाचा जन्म' ही व्यंकटेश माडगूळकरांची एक जमलेली कथा आहे. माणदेशातील एका लहानशा गावात ही कथा घडते. जून महिन्यातल्या एका सकाळी त्या गवात एक भला मोठा वानर येतो. वैराण, रखरखीत माणदेशात झाडेझुडे कमीच, त्यामुळे असले प्राणी बघायची काही त्या गावकर्‍यांना सवय नसते. त्यातून हा वानर चक्क मारुतीच्या देवळातच घुसतो. आणि मग येऊन एका झाडावर निवांत ऊन खात बसतो. हे बघणार्‍या गावकर्‍यांना मग तर काय साक्षात हनुमान आपल्या गावात आला असे वाटायला लागते. पण शाळेला येणार्‍या मुलांपैकी एक गुलाम मुलगा त्या माकडाला एक भिर्रकन धोंडा फेकून मारतो. मग तो माकड चिडतो आणि उंच पिंपळाच्या झाडावर जाऊन बसतो.

दोन प्रसंग

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 21/10/2011 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग १: स्थळ: एका हाफिसातील क्यांटिन कर्मचारी१: काय रे कशी होती तुझी दिल्ली व्हिजिट? कर्मचारी२: अरे मस्त! फ्यामिलीला घेऊन गेलो होतो. काम फक्त २ दिवस होतं. बाकी २ दिवस दिल्ली त भटकलो क१: वा! आता मेट्रोमुळे भटकणं सोपंही झालंय नाही क२: हो यार! बर्‍याच वर्षांपूर्वी स्वतःच वाहन नसल्याने तिथल्या रिक्षावाल्यांना इतके पैसे दिले होते की त्यात नवी रिक्षा आली असती दोघे: हा हा हा क१: अरे त्या ट्रीपचा वेगळा अलाऊंस असतो ना? क२: हो तर म्हणून तर जातो.

काही नोंदी अशातशाच... - ८

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 18/10/2011 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
या नोंदी लिहायच्या की नाही, असा प्रश्न माझा मलाच पडला. या विषयावर याआधी दोन-तीनदा लेखन झालं आहेच. त्यातली मूळची तथ्यं नवी नाहीत. मग का लिहायचं? प्रश्नाचं स्वाभाविक उत्तर 'नको' असंच होतं. पण एक चाळा म्हणून या दोन दिवसांच्या अनुभवांकडे पाहिलं. थोडं तटस्थपणे. तेव्हा असं लक्षात आलं की, काही गोष्टी आपल्याच संचितात नव्यानं जमा झालेल्या आहेत. त्यांची कुठं तरी नोंद झाली पाहिजे. मग हेही लक्षात आलं की, काही वाचकांना तरी खचितच काही गोष्टी नव्यानं कळतील. लिहायचं, हे ठरलं. हे मनोगत नाही, किंवा स्पष्टीकरणही नाही.