Skip to main content

समाज

शिवरात्र जागवोनी...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 28/02/2014 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या दिवसाच्या निमित्ताने! नेहमी कामानिमितानी शिवरात्रीला आणि श्रावणातही, निरनिराळ्या शंकराच्या देवळात जाणे होते. भक्त मंडळी शंकराच्या गाभार्‍याला जी काहि "कळा" आणवतात. ते साहून हे लेखन घडत आहे. मी अनेकदा अनेक देवळात देवळांच्या काम पहाणार्‍या मंडळींना या बद्दल सूचना आणि सहकार्य करायचा प्रयत्न केला आहे. पण हाती आले फक्त दारुण अपयश. मंदिरवाल्यांना "ग्राहक" वाढतील या दृष्टीनी काहि सुचवलं तर तेच हवं असतं..तीथे आंम्ही स्वच्छतेचा नारा लावलेला कुणा ऐकू जावा? सकाळी देऊळ उघडल्यापासून भक्त मंडळी शंकराचा जो काही महा-देव करतात तो पहाण्यासारखा असतो!

शेजारचा फँड्री !!!

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 26/02/2014 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
फँड्रीची मी आतुरतेने वाट बघत होतो. त्यामुळे पहिल्या दिवशी पहिला शो हे माझे अगदी ठरले होते. सर्वात मागच्या दोन रांगांमध्ये आराम खुर्च्या आहेत. त्यामुळे मी आणि बायको आरामात सिनेमा सुरु होण्याची वाट बघत मस्त रेललो होतो. पहिला शो असूनही गर्दी ब-यापैकी होती. नागराजला - फँड्रीचा कथा लेखक आणि दिग्दर्शक - लगेच SMS करून अभिनंदन केले. " nashikacha pahilaach show full ! Congrats Nagraj !!!. सिनेमा सुरु झाल्यावर नेहमी प्रमाणे लोक येतेच होते.

एक झुंज तणावाशी!

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 26/02/2014 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून चालत असताना एक भिंतीवर चिटकवलेली जाहिरात नजरेस पडली. ‘स्ट्रेस मॅनेजमेंट कन्सल्टंट’ची. तसा रोजच्या संभाषणांमध्ये असंख्य वेळा आपल्या बोलण्यात हा शब्द येतो, ‘स्ट्रेस’, पण त्या संकल्पनेवर हवा तेवढा स्ट्रेस देत नसावं कुणी. म्हणूनच कदाचित अशा कन्सल्टंट्सचा जन्म होतो. पण मग हे कन्सल्टंट्स काय सांगत असावेत? असं तर नक्कीच काही नसेल जे आपल्याला ठाऊक नाही. हं, पण आपण आत्मसात केलेलं नाही असं बरंच काही असेल. असे विचार मनात चालू होते. मुळात ताण किंवा स्ट्रेस हा एखाद्या आजारासारखा असतो. जसा एखाद्या विषाणूचा प्रतिकार करण्यास माणसाचं शरीर असमर्थ ठरतं आणि मग आजार उद्भवतो.

बाबा रामदेव यांचा उदय, एक आकलन

लेखक Atul Thakur यांनी सोमवार, 24/02/2014 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा रामदेव हे नाव आता सर्वतोमुखी झालेले आहे. योगापासुन सुरुवात करुन त्यांनी राजकारणात किंवा समाजकारणात म्हणुया प्रवेश केलेला आहे. मात्र हा लेख त्यांच्या राजकारणाचा किंवा समाजकारणाचा विचार करणारा नाही. त्यांच्या उदयामागची कारणे शोधणे हा या लेखाचा उद्देश आहे. आणि ही कारणे सामाजिक आणि योगिक दृष्टीकोनातुन तपासुन पाहण्याचा मानस आहे. रामदेवांचा उदयामागची कारणे शोधणे इतके महत्वाचे आहे काय? तर याचे उत्तर हे की अनेक योगसंस्था रामदेवांच्या अगोदरपासुन कार्यरत आहेत. मग रामदेवांनाच एवढी अभूतपूर्व प्रसिद्धी मिळण्याचे कारण काय? आपल्या समाजात असे काय बदल झालेत कि रामदेवांनाच लोकांनी इतकं डोक्यावर घ्यावं?

.......!

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 24/02/2014 03:53 या दिवशी प्रकाशित केले.
कशाचा तमाशा होइल ठावं नाही भावा. कशाचा तमाशा होइल ठावं नाही भावा, माझ काळीज काढुन टांगल तरी खुळं वाजवतय पावा. कधी यायच भान म्हणते मी कधी यायच भान म्हणते मी पण सांग मला त्यानंतर जीवंत असेन का रे मी? कुठल्यातरी आशेवर कुठल्यातरी आशेवर पावल तरी उचलतात दिसत नसली सुखं तरी बळ वाढवुन जातात नऊ महिन्याच वज्ज नऊ महिन्याच वज्ज माय शेजीच घर बघुन वाहते. नऊ महिन्याच वज्ज माय शेजीच घर बघुन वाहते काय ठाव तिला काय ठाव तिला त्या वज्ज्याचा नशिब दगड करु पाहते. कुठं हसु उमलत कुठं हसु उमलत साजरा मुखडा बघुन. कुठं डोळं पाझरतात काळजाच तुकडं होउन. सगळ आतल्या आत सगळ आतल्या आत नुसत सोसायच तमाशा होउ नये म्हणुन आतल्य

वसुधैव कुटुंबकम

लेखक आयुर्हित यांनी रविवार, 23/02/2014 03:21 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या टीव्ही वर सुरु असलेली झी एंटरटेनमेंट इंटरप्राईस ची ही जाहिरात आहे ||वसुधैव कुटुंबकम|| The world is my family
Taxonomy upgrade extras

अजंठा ...........भाग-१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 23/02/2014 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire हे चित्र प्रत्येक भागावर असेल........ अजंठा : ‘त्या काळ्याकुळकुळीत कातळावर पडलेली उन्हं हळुहळु लालसर होऊ लागली आणि त्या अर्धवर्तुळाकार घोड्याच्या नालेचा आकार असलेल्या घळीच्या दुसऱ्या टोकाला सुर्यबिंब मावळू लागले. त्या सुर्याच्या रेंगाळणाऱ्या किरणांनी प्रथम बुद्धाच्या चरणकमलांचे दर्शन घेतले.

सामान्य ज्ञानाची छोटीशी चाचणी

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 22/02/2014 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य ज्ञानाची छोटीशी चाचणी (लोक्सभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर) जितेन्द्र आव्हाड (राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष) भास्कर जाधव (राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष) गणेश नाइक (नवी मुंबई, मंत्री) विनायक मेटे ( राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष) संजय निरुपम (खासदार) छगन भुजबळ (सार्वजनिक बांधकाम, गृह अशी खाती सांभाळलेले मंत्री) विनायक निम्हण(आमदार, पुणे) आणि नारायण राणे(मंत्री) या सर्वांमधे एक समान धागा आहे, कोणता ते ओळखा व्य. नि. करा

...आपुले मरण पाहिले म्या डोळा…....!!!!!!

लेखक विनोद१८ यांनी बुधवार, 19/02/2014 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, नुकताच माझ्या वाचनात दै. लोकसत्ता मधला एक अतिशय सुन्दर असा लेख आला. डॉ. ऋजुता पाटील-कुशलकर यानी आपले जीवघेण्या आजारातील अनुभव कथन केले आहे, त्याचा दर्जा उच्च आहे, विचार करायला लावणारा आहे म्हणुनच मिपावर प्रत्येकाने तो वाचावा असा आग्रह आहे. त्याची लिन्क खाली दिली आहे. http://www.loksatta.com/chaturang-news/the-deathbed-experience-373284/4… तो वाचुन प्रतिक्रिया काय द्यावी हे सुचत नाही, फक्त डॉ.

शिवरायांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने... मित्रांनो

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 19/02/2014 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसाचे संस्मरण सकाळ मधील अप्रतीम लेखाने या झाले. महाराजांच्या रयतेसाठी मनात असलेल्या सुयोग्य शासनाच्या संकल्पना साकार करायला आपल्याा सारख्या इतिहास संशोधकाने विविध प्रकारे प्रेरणा द्यावी. ही विनंती. काही वर्षांपूर्वी प्रताप गडावरील भेट व चर्चा यांच्या आठवणी ताज्या झाल्या. विंगकमांडर शशिकांत ओक. ... असे तिथे दिलेल्या प्रतिसादातून म्हटले आहे...