Skip to main content

समाज

<बरं मग>

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 29/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
श्री श्री श्री विनायक प्रभूपाद स्वामीना अर्पण. आमची प्रेरणा . http://www.misalpav.com/node/27986 काय चिरंजीव. रीझल्ट कधी आहे? १२ तारखेला. ठीक आहे. तुझा नम्बर पितळे काकाना एस एम एस केलाय. अकरा तारखेला परत एकदा करा. पप्पा काय फरक पडणार आहे एका दिवसानी. तुला नाही मला पडेल.

दु:खद बातमी

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 23/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिभावान संगितकार -श्री.आनंद मोडक यांचं निधन... https://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-prn2/t1.0-9/296378_158885857537751_1274174221_n.jpg माझ्यासाठी आनंद मोडक म्हणजे, मुक्ता आणि साजणवेळा .. मुक्ता हा चित्रपट सर्व बाबतीत श्रेष्ठ दर्जाचा होता.आणि त्यातलं आनंद मोडकांचं संगीत म्हणजे,त्या काळातही अत्यंत वेगळ..आणि चालू मराठी चित्रपट संगीतामधे उजवं,असं होतं.मला त्यातल्या गाण्यांची प्रथम ऐकल्यापासून जी भुरळ पडली ती आजही कायम आहे.

आजचा भारत आणि चित्रपट: 'वर्ल्ड वॉर झी'

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 23/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील माझ्या मित्रानो (कौतिक करणारे माझे मित्र आणि मला शिव्याशाप देणारे सुद्धा माझेच मित्र ), मी इथे मिपावर काय टंकतो, त्यामागचं पगालापन इथे देत आहे, ते तुम्ही नेहमीप्रमाणेच खेळीमेळीने, कोणताही पूर्वग्रह न बाळगता, संयमाने समजून घ्यालच, असा मला तुमच्यावर विश्वास आहेच.

गांधी जिवंत आहे...!

लेखक बाबा पाटील यांनी गुरुवार, 15/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
गांधींना मारल पण गांधीत्व अमर आहे,अश्वस्थाम्याच्या भळभळणार्‍या जखमेसारख!त्याला जिवंत ठेवण्यासाठी अजुन ही पैदा होतायेत्,कोनी तरी मंडेला,लामा आणी आण्णा कारण जो पर्यंत शोषण आणी शोषक आहेत्,तो पर्यंत त्याला निशस्त्र प्रतिकार करणारा गांधी परत परत जिवंत होणार आहे कारण प्रत्येकाच्या मनात फक्त हिंसेलाच स्थान नसत्,कुठतरी प्रेम आणी दयाळुपणाही असतो, हेच गांधीच्या पुर्नजन्माच रहस्य आहे. जो पर्यंत रक्तपात होत राहिल्,माणुस माणसाला गुलामाची वागणुक देत राहिल्,गांधीला माणसाला माणुस बनवण्यासाठी नथुरामाने गाडलेल्या थड्याग्यातुन परत परत उठावेच लागेल्,नाहीतर परत आम्ही आदिम जमान्यात जावुन पोहचु. माणसाच्या प्रेमासाठी

संधीगत वात व पक्षाघात- सामान्य लक्षणे व संयुक्त उपचार पद्धती.

लेखक बाबा पाटील यांनी शुक्रवार, 09/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
संधीवात व पॅरालिसिस करीता संयुक्त उपचार पद्धती. आजच्या धक्काधक्कीच्या दैनंदिन जिवनात मानवाला भेडसावणारी नेहमीची समस्या म्हणजे,उठता बसता जाणवनारी सांध्यांची कुरकुर,कोणाचे गुडघे दुखत असतात,कोणाची कंबर, तर कोणाची मान दुखत असते,आपल्याकडेच नव्हे तर जगात सगळीच कडे या दररोजच्या वेदनांकडे एक तर दुर्लक्ष केले जाते अथवा तात्पुरती वेदनाशामक औषधे घेतली जातात,आणी हाच प्रकार आयुष्याच्या शेवटच्या वळणावर अत्यंत त्रासदायक ठरतो.व कुंथत कुंथत आयुष्य जगण्याची वेळ आणतो.जर सुरुवातीसच म्हणजे ज्यावेळेस सांध्यांच्या तक्रारी सुरु झालेल्या असतात त्याच वेळी जर योग्य उपचार केले तर हा आजार फक्त आटोक्यातच

थरार : नको इतका जवळून !!

लेखक चिगो यांनी मंगळवार, 06/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
धिक्कार ते अधिकार नावाची माझी लेखमाला मिपावर यायला आता चार वर्ष झालीत. ह्या चार वर्षांत मिपाच्या आणि माझ्या आयुष्याच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. "अधिकारानंतरचं वाचायला उत्सुक आहे" म्हणणारे श्रामो आणि यकु माझे हे अनुभव वाचायला नाहीत, ही बोचही आहेच. पण आयुष्याच्या पुलाखालून वाहणार्‍या ह्या पाण्यात रक्ताचा गढूळ रंग आता मिसळायला पाहतोय म्हटल्यावर विचार केला की चला, काही अनुभव लिहून ठेवुयात..

आव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 06/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशाला ज्या अवघड प्रश्नांचा मुकाबला गेल्या काही वर्षांत सातत्याने करावा लागत आहे त्यांत काश्मीरातील, पाक-प्रायोजित छुप्या युद्धाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या विषयावरील, ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांचेसारख्या जाणकार व्यक्तीने लिहिलेले हे पुस्तक १०-०५-२०१४, शनिवार रोजी, पुण्यात प्रकाशित होत आहे. ह्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी माझेकडूनच करून घेतलेला आहे. तेव्हा ह्या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे.

काही लोक ना उगाच जरा जास्तच करतात प्रायव्हसी प्रायव्हसी!!

लेखक निनाद यांनी सोमवार, 05/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वी मला वाटायचे की कसली प्रायव्हसी? काही लोक ना उगाच जरा जास्तच करतात प्रायव्हसी प्रायव्हसी! माझ्या सर्च त्या काय असणार आणि त्यातून कुणाला काय फायदा असणार? पण एकदा सहज आपला गुगल इतिहास पाहिला आणि हादरलोच! माझ्या काय वाटेल त्या सर्चेस तेथे तरिखवार जपून ठेवलेल्या होत्या. अगदी एयरक्रॅश इन्वेस्टिगेशन ते नर्मदा परिक्रमा. तरी विचार केला की मग काय बिघडले? बिघडले हे की मी काय आणि कसा विचार करतो यावरून या कंपन्या माझे प्रोफाईल तयार करतात. मग मला जे 'आवडेल' तेच मला जालावर पुरवतात.