Skip to main content

रेखाटन

अभंग मुक्तछंद

लेखक यकु यांनी बुधवार, 25/01/2012 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
‍रचावा अभंग परि मनी मुक्तछंद चितारु क्षणरंग एकएका अफाट हे जग लोकही अफाट सुटले ते सुसाट दाहीदिशा परि एक जलाशयी जैसे येती जगपक्षी तैसे उतरती जालस्थली रोजरोज अवघे ते विश्व जाली प्रगटले नगास ते नग गेले मिळौनिया बसावे एकजागी कराव्या त्या गोष्‍टी चाखावी समष्‍टी वेद बोले स्थळाचे महात्म्य काय वर्णू मी पामर हरएक जाणे गूज जेव्हा तो सदस्य स्वये झाला जनाचे मनाचे काथ्याकुटी काठ्‍या कविंच्या कविता विडंबिती दुष्‍ट पाककृती शोभा कलेचे दालन गृहे पाकगृहे सोडून सुगरणी आल्या पायाची भिंगरी फिरविते दाही दिशा भटकत येती आश्रया भटकंतीच्या विषय अगम्य प्रतिसाद महान किती कूटगूढरम्य चर्वण चाले करीती वादावादी विषया
काव्यरस

हस्ताक्षरातील अक्षर...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 24/01/2012 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून काही लेखक मंडळी चांगल्या हस्ताक्षराचे लिपिक पदरी बाळगून असत असेही ऐकिवात आहे. सुंदर विचार प्रसवणारे साहित्यिक अक्षरलेखनात मात्र कुडमुडे का? असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे.

(जीव गुंतला)

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 19/01/2012 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ गीत : खेळ मांडला (नटरंग) प्रिय पाचोळ्या तुझ्या आठवांची मनी पानं उभी र्‍हाई साद सुन्या आभाळाची तुझे गीत गाई तरी मेघ दाटला हा पाचोळ्याच्या ठायी हरवल देह भान मावळल्या नभी झाकोळुनी हरवतो श्वास वेडापिसा वनवा ह्यो उरी पेटला...
काव्यरस

|| || माझे गाव माझे बालपण || ||

लेखक विवेकखोत यांनी गुरुवार, 01/12/2011 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
" लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा " काल अचानक गप्पाच्या ओघात लहानपणा विषयी गप्पा निघाल्या आणि मन अचानक गावाकडे चक्कर मारून आले. लहान पणाची मजा काही औरच, ती मजा, ती धमाल, तो बिनधास्त पणा मोठे पणी नाही सापडत हो. प्रत्येक गोष्टी मला आठवतात अजून. आमच्या गावाला पाणी टंचाई खूप मला तर आमच्या नळाला पाणी कधी आले ते पण आठवत नाही. नळाच्या खड्डया चा उपयोग आम्ही लपंडाव खेळायला करत असू , एखादा माणूस सहज गडप होईल असे ते खड्डे असत. मग प्रत्येक मोसमात सगळ्या मित्र मंडळीची स्वारी कुठल्या तरी शेतावर असायची.

पु.ल एक आठवण!

लेखक किसन शिंदे यांनी मंगळवार, 08/11/2011 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज ८ नोव्हेंबर! उभ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेल्या पु.ल.देशपांडे उर्फ भाईकाका यांचा ९१वा जन्मदिवस. आपल्या विनोदी साहित्याने संपुर्ण महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणारा हा अवलिया!! चि.वि.जोशी, आचार्य अत्रे यांसारख्या दिग्गज विनोदी साहित्यीकांच्या साक्षीने आपल्या विनोदी लिखानाची सुरूवात केलेल्या पुलंची साहित्य संपदा उत्तरोत्तर आणखीनच बहरत गेली. हरितात्या, नारायण, सखाराम गटणे, बोलट, अंतू बर्वा त्यांनी रेखाटलेल्या या व्यक्तीरेखा मराठी साहित्य विश्वात अजरामर झाल्या.