मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजकारण

व्हॉट्स राँग विथ यू मि. राज?

इनोबा म्हणे ·
लोकसत्ताच्या राजू परुळेकर यांनी घेतलेली राज ठाकरे यांची मुलाखत. राज यांनी उपस्थीत केलेल्या परप्रांतीयांच्या मुद्दयावरुन मिडीयावाल्यांनी केलेला पक्षपातीपणा,गुंड उत्तर भारतीय आणि त्यांचे गुंड नेते.महाराष्ट्राला मिळणारी सापत्न वागणूक...आणि बरेच काही (कट्टर मराठी) -इनोबा

शेजारचे जातियवाद व राजकारण

सतीश वळीव ·
सध्याच्या युगात जातियवाद व राजकारण आजुनही ज्वलंत समस्या आहे. मी ऐक मध्यम वर्गीय नोकरधार असुन प्रामाणिक व सरळ साधा व दुसर्‍यास उपयोगी पडनारी व्यक्ती आहे. मी मागासवर्गीय असुन शेजारच्या स्त्रीया आमच्या स्त्रीयांच्या बरोबर अंतकरनापासुन व्यवस्तीत वागत नाहीत. हे जहाले स्त्रीयांचे. पुरषांचे कही कमी नाही. इतर कोनत्याही गोष्टीत आडकाठी घालुन आम्हाला खाली खेचतात. अश्या वेळी मला ह्या सर्व गोष्टी मुळे प्रामाणिकपना व सरळ साधेपना व दुसर्‍यास उपयोगी पडने हे सर्व थांबउका असे वाटते. पन आजुन सहनशक्ती मजबुत आहे. देव हे सर्व पाहत आहे. मला एकमात्र माहीत आहे की जो कोनी चांगले वागतो त्याचे त्याला चांगलेच फळ मीळनार.

घरवाले...बाहरवाले

इनोबा म्हणे ·

जगभरातील व्यक्तिमत्वे ओळखा

देवदत्त ·
WorldPersonalities वरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू? मी ओळखलेले: महात्मा गांधी चार्ली चॅपलीन बीथोवन हिटलर सद्दाम हुसैन बिल क्लिंटन ब्रुसली अल्बर्ट आईन्स्टाईन अब्राहम लिंकन यासर अराफात मेरीलीन मॉन्ऱो जॉर्ज बुश आणखी जमल्यास लिहीन पुढे... (चित्र आंतरजालावर कुठेतरी मिळाले.)

शिक्षक दिन

इनोबा म्हणे ·
हि कविता मी संकलीत केलेली आहे.मुळ कवीची माहिती कवितेखाली दिली आहे. पाच सप्टेंबर दिन उजाडला जाऊ सत्काराला शिक्षकांच्या शाळा रंगवली हार मागविले गळ्यात घातले पुढार्‍यांच्या. करूनिया स्मित स्वारी पुढे आली भाषणास केली सुरुवात तास सव्वातास भाषण सुंदर दारुबंदीवर त्यांनी केले. त्यांच्या पाठोपाठ दुजा उठे कोणी गरिबीचा त्यांनी नारा दिला. गरिबांच्या पाठी म्हणे कोण आहे शल्य बोचते हे अंतरात तसेच दाबून धरून हृदय संपवी वक्तव्य दीनांसाठी. शेवटी म्हणाले अध्यक्ष सन्मान्य केले उपकृत बोलावून. आम्हावरी लोभ ठेवावा असाच पुढल्या खेपेस येऊ खास. शिक्षक दिनाचा ऐसा सोहळा भ्रमाचा भोपळा नित्य हाती! कविता संग्रहः शब्द मना

नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर

सागर ·
(नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर लिखित पुस्तकाचे परिक्षण बरेच दिवसांपूर्वी लिहिले होते. तेच येथे देत आहे.) मित्रांनो, मी बरीच पुस्तके वाचली आहेत."नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे त्यापैकीच एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.अलिकडेच मी या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले.अनेक पारायणे करुनही हे पुस्तक सारखे सारखे वाचावेसे वाटते.हे पुस्तक वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या अराजकतेची आठवण झाल्याशिवाय होत नाही.मित्रांनो, तुम्हीदेखील हे सुंदर पुस्तक वाचले असेलच.

पांढरपेशी कविता

ॐकार ·
पांढरपेशी कविता क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! दर्प सांगती अभिमानाने उच्छ्व

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

एक तत्व नाम

विकास ·
आपल्या संतसाहीत्यात "नामाचा महीमा" सांगीतला आहे. एखादे नाव सतत घेतले तर त्यात तसे नाम घेणारी व्यक्ती आंतर्बाह्य समरस कशी होऊ शकते याचे हे उदाहरण :-) --------- सोनियांनी देशासाठी गोळ्या झेलल्या - कोडा [ Thursday, November 01, 2007 05:44:44 pm] रांची मटा ऑनलाइन वृत्त सोनिया गांधी यांनी आपल्या देहावर गोळ्या झेलून देशासाठी प्राणाची आहुती दिली, त्यामुळे आपण सोनिया गांधी यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणे गरजेचे आहे, अशी गोंधळलेली आदरांजली झारखंडचे मुख्यमंत्री मधु कोडा यांनी वाहिली.