Skip to main content

राजकारण

अल कायदाचे तीन नंबरचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद कालवश!

Published on 07/06/2010 - 20:29 प्रकाशित मुखपृष्ठ
अल कायदाचे तीन नंचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद कालवश! मी २३ जून २००९ साली लिहिलेला अल कायदाचे तीन नंबरचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद यांची माहिती देणारा लेख लिहिला होता. http://www.misalpav.com/node/8315 गेल्या आठ-दहा दिवसापूर्वी आलेल्या वृत्ताप्रमाणे द्रोणाचार्यांच्या हातून त्यांची अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील प्रदेशात हत्या करण्यात आली. त्यांच्याबरोबर त्याचे कुटुंबीयही मारले गेल्याचे वृत्त आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5482

घरगुती सावरकर

Published on 28/05/2010 - 17:06 प्रकाशित मुखपृष्ठ
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.

याद्या 40058

एक प्रचंड अस्वस्थ करणारा लेख

Published on 28/05/2010 - 09:51 प्रकाशित मुखपृष्ठ
लोकप्रभात आलेला ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांचा http://www.loksatta.com/lokprabha/20100604/suraksha.htm हा लेख प्रचंड अस्वस्थ करून गेला...त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देशात तुकडे झाल्यातच जमा आहेत...सुमारे ३ कोटी बांगलादेशी आपल्या देशात आहेत...इस्लामीकरण वाढत आहे त्याचबरोबर भारतविरोधी कारवायाही वाढत आहेत...खरं तर मी असे लेख वाचायचे सोडून दिलेले आहे कारण आपला नुसताच संताप होतो आणि काहीच करता येत नाही हि जाणीव काही केल्या जात नाही...पण चुकून हा लेख वाचला...खरंच इतकी भयानक परिस्थिती आहे?

याद्या 6889

सोनिया गांधी : एक चरित्र

Published on 22/05/2010 - 10:14 प्रकाशित मुखपृष्ठ
भारतात अनेक व्यक्तींबद्द्ल लोकांना आकर्षण आहे, उत्सुकता आहे, पण जर याची क्रमवारी लावायची ठरवली तर सोनिया गांधींचा क्रमांक फार वरचा ठरावा. सोनिया स्वतः मिडीयासमोर फारच कमी येतात. त्यांनी दिलेल्या मुलाखतीही मोजक्या. जनतेला त्या दिसतात, त्यांचे विचार कळतात ते फक्त जाहीर सभांतून अथवा त्यांच्या निर्णयातून. अश्यावेळी देशातील एका प्रमुख पक्षाच्या अध्यक्षा व त्यांच्या मर्जीनूसार पंतप्रधानपदही ठरविण्याची ताकद असलेल्या महिलेविषयी कुतुहल नसेल तरच नवल. अश्या वेळी जेव्हा वाचनालयात "सोनिया" हे सोनिया गांधींचे चरित्र दिसल्यावर ते घेतल्याशिवाय रहावलं नाहि.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 16589

~*~*~*~ राजीव'जींना भावपूर्ण श्रद्धांजली ~*~*~*~

Published on 21/05/2010 - 10:25 प्रकाशित मुखपृष्ठ
राजीव गांधी!... आपल्या सर्वांचं एक आदरणीय आणि लाडकं व्यक्तिमत्व! भारताचे यशस्वी -माजी पंतप्रधान! २१ मे १९९१, रोजी रात्री, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तामिळनाडू येथे घडवून आणलेल्या मानवी बॉम्ब-हल्ल्यात झालेला राजीव'जींचा मृत्यू केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण विश्ववासीयांना मोठा मानसिक आघात देऊन गेला!..... राजीवजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! ..... *~*~*~* STILL WE MISS YOU.... RAJEEV'JI...... LOVE YOU.......

याद्या 55576

राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - तंत्राचा जाहीर निषेध

Published on 11/05/2010 - 13:59 प्रकाशित मुखपृष्ठ
राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - यज्ञ तंत्राचा जाहीर निषेध मिठाच्या आहूतींनी वरुण देवरायाला आळवण्याच्या हास्यास्पद प्रकाराला प्रतिबंध करावा.
आज (दि ११ मे २०१०) राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त दै. सकाळ पेपरमधे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वरुण यंत्राचा वापर हा लेख पान १ व११ वाचून...
मित्र हो, ही आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची क्रूर चेष्टा तर नाहीना असे विचारावेसे वाटू लागले. बिरबल-अकबराच्या गोष्टीतील 'खिचडी पकाने के लिए' अती दूर ठेवलेली चूल काही कामाची नाही.

याद्या 33101

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

Published on 08/05/2010 - 08:25 प्रकाशित मुखपृष्ठ
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

याद्या 5860